शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

काळेवाडीच्या नागरिकांना पाण्यात कसरत करीत शोधावी लागतेय वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

रेणापूर नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्र. १चा भाग असलेल्या काळेवाडीची लोकसंख्या १२०० आहे. गावात जिल्हा परिषद शाळेसह चार रस्ते आहेत. ...

रेणापूर नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्र. १चा भाग असलेल्या काळेवाडीची लोकसंख्या १२०० आहे. गावात जिल्हा परिषद शाळेसह चार रस्ते आहेत. मात्र, गावात नागरी सुविधा अद्याप उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नाल्या, पक्के रस्ते नाहीत. पाऊस झाला की, गावातील रस्त्यावर पाणी साचते. पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी सुविधा नसल्यामुळे ते रस्त्यावरच जमा होऊन तुंबत आहे.

सोमवारपासून शहरासह तालुक्यात संततधार पाऊस होत आहे. त्यामुळे काळेवाडीतील चारही रस्त्यांवर पाणी साचले आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळयोजना कार्यान्वित नाही. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हातपंप आहे. त्या हातपंपाचे पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. सततच्या पावसामुळे गावातील सर्व रस्त्यावर पाणी साचले आहे. तसेच कुंभार गल्ली, रेणापूर- काळेवाडी- टाकळगाव रस्ता, मुख्य चौकात पाणी तुंबले आहे. या पाण्यातून नागरिकांना रस्ता शोधावा लागत आहे. नागरी सुविधांसाठी ग्रामस्थांनी वारंवार नगरपंचायत, तहसील कार्यालयासह लोकप्रतिनिधींना साकडे घातले. परंतु, अद्याप प्रश्न संपुष्टात आला नाही. नगरपंचायतीने तत्काळ याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी काळेवाडीतील प्रदीप काळे, उमाकांत येनतफळे, दीपक काळे, गोविंद काळे, प्रमोद गायकवाड, मोरेश्वर मोरे, विजयकुमार येनतफळे, अभिलाष काळे, शरद मोरे, लक्ष्मण काळे, श्रीमंत काळे, बापू देवळकर, राजकुमार नरवटे, भागवत वडजकर, भरत काळे आदींनी केली आहे.