शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

काळेवाडीच्या नागरिकांना पाण्यात कसरत करीत शोधावी लागतेय वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

रेणापूर नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्र. १चा भाग असलेल्या काळेवाडीची लोकसंख्या १२०० आहे. गावात जिल्हा परिषद शाळेसह चार रस्ते आहेत. ...

रेणापूर नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्र. १चा भाग असलेल्या काळेवाडीची लोकसंख्या १२०० आहे. गावात जिल्हा परिषद शाळेसह चार रस्ते आहेत. मात्र, गावात नागरी सुविधा अद्याप उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नाल्या, पक्के रस्ते नाहीत. पाऊस झाला की, गावातील रस्त्यावर पाणी साचते. पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी सुविधा नसल्यामुळे ते रस्त्यावरच जमा होऊन तुंबत आहे.

सोमवारपासून शहरासह तालुक्यात संततधार पाऊस होत आहे. त्यामुळे काळेवाडीतील चारही रस्त्यांवर पाणी साचले आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळयोजना कार्यान्वित नाही. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हातपंप आहे. त्या हातपंपाचे पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. सततच्या पावसामुळे गावातील सर्व रस्त्यावर पाणी साचले आहे. तसेच कुंभार गल्ली, रेणापूर- काळेवाडी- टाकळगाव रस्ता, मुख्य चौकात पाणी तुंबले आहे. या पाण्यातून नागरिकांना रस्ता शोधावा लागत आहे. नागरी सुविधांसाठी ग्रामस्थांनी वारंवार नगरपंचायत, तहसील कार्यालयासह लोकप्रतिनिधींना साकडे घातले. परंतु, अद्याप प्रश्न संपुष्टात आला नाही. नगरपंचायतीने तत्काळ याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी काळेवाडीतील प्रदीप काळे, उमाकांत येनतफळे, दीपक काळे, गोविंद काळे, प्रमोद गायकवाड, मोरेश्वर मोरे, विजयकुमार येनतफळे, अभिलाष काळे, शरद मोरे, लक्ष्मण काळे, श्रीमंत काळे, बापू देवळकर, राजकुमार नरवटे, भागवत वडजकर, भरत काळे आदींनी केली आहे.