शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

रानडुकरांचा फळझाडावर हल्ला, ६५० झाडांचे झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST

घोणसी येथील शेतकरी दीपक बब्रुवान आब्रे यांनी आपल्या शेतात ९ महिन्यांपूर्वी आंबा ३२०, जांब १३० आणि जांभूळ १०० झाडांची ...

घोणसी येथील शेतकरी दीपक बब्रुवान आब्रे यांनी आपल्या शेतात ९ महिन्यांपूर्वी आंबा ३२०, जांब १३० आणि जांभूळ १०० झाडांची तर बाळाजी कोंडिबा गोदाजी यांनी ५० आंब्याच्या झाडाची लागवड केली होती. ९ महिन्यांपासून रोपांना खत, ठिंबकद्वारे पाणी देऊन आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे जपले होते. शिवारातील ऊस कारखान्याला गेल्याने शिवार उघडे पडले असून, रानडुकरांना खाण्यासाठी काही उरलेच नाही. परिणामी, रानडुकरांच्या कळपाने आता हिरव्या रोपावर हल्ला चढविला आहे. दरम्यान, दहा महिन्यांपासून रोपाची जोपासणा करून झाडे गुडघ्याला आली होती. विविध नमुन्याची फळाची झाडे लावून कायमस्वरूपी उत्पन्न घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, झाडाला फळ लागण्याआधीच रानडुकरांनी झाडांची नासाडी करून रान काळेभोर केले आहे. रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्यात यावी, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक काेंडी...

शेतीत कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने कष्ट करूनही पदरात काहीच पडत नाही. शेतीत कायमस्वरूपी उत्पन्न मिळावे यासाठी साडसहाशे विविध फळाची लाखो रुपयांचा खर्च करत झाडांची लागवड केली हाेती. मात्र, रानडुकरांच्या कळपाने शेतातील एकही झाड शिल्लक ठेवले नाही. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने रानडुकरांचा बदोबस्त करून, सदर शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी दीप आंब्रे यांनी केली आहे.