शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांचा फळझाडावर हल्ला, ६५० झाडांचे झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST

घोणसी येथील शेतकरी दीपक बब्रुवान आब्रे यांनी आपल्या शेतात ९ महिन्यांपूर्वी आंबा ३२०, जांब १३० आणि जांभूळ १०० झाडांची ...

घोणसी येथील शेतकरी दीपक बब्रुवान आब्रे यांनी आपल्या शेतात ९ महिन्यांपूर्वी आंबा ३२०, जांब १३० आणि जांभूळ १०० झाडांची तर बाळाजी कोंडिबा गोदाजी यांनी ५० आंब्याच्या झाडाची लागवड केली होती. ९ महिन्यांपासून रोपांना खत, ठिंबकद्वारे पाणी देऊन आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे जपले होते. शिवारातील ऊस कारखान्याला गेल्याने शिवार उघडे पडले असून, रानडुकरांना खाण्यासाठी काही उरलेच नाही. परिणामी, रानडुकरांच्या कळपाने आता हिरव्या रोपावर हल्ला चढविला आहे. दरम्यान, दहा महिन्यांपासून रोपाची जोपासणा करून झाडे गुडघ्याला आली होती. विविध नमुन्याची फळाची झाडे लावून कायमस्वरूपी उत्पन्न घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, झाडाला फळ लागण्याआधीच रानडुकरांनी झाडांची नासाडी करून रान काळेभोर केले आहे. रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्यात यावी, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक काेंडी...

शेतीत कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने कष्ट करूनही पदरात काहीच पडत नाही. शेतीत कायमस्वरूपी उत्पन्न मिळावे यासाठी साडसहाशे विविध फळाची लाखो रुपयांचा खर्च करत झाडांची लागवड केली हाेती. मात्र, रानडुकरांच्या कळपाने शेतातील एकही झाड शिल्लक ठेवले नाही. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने रानडुकरांचा बदोबस्त करून, सदर शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी दीप आंब्रे यांनी केली आहे.