लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : लातूर शहरासह कळंब, धारूर, केज, अंबाजोगाई, लातूर एमआयडीसी तसेच मुरुड, औसा एमआयडीसी आदी मोठ्या शहरांना पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात यंदाही चांगला संचय होत आहे. जून महिन्यापासून प्रकल्पात ४३.१०५ दलघमी नवीन पाणीसाठ्याचा संचय झाला आहे. सध्या धरणात ५१.२३ टक्के एकूण पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ३८.२५ टक्के झाला आहे.
पावसाळ्यापूर्वी मांजरा प्रकल्पात ७१.७१७ दलघमी पाणीसाठा होता. आता ११४.८२२ दलघमी पाणीसाठा झाला आहे. जवळपास ४३.१०५ दलघमी नवीन पाण्याची भर प्रकल्पात पडली आहे. त्यामुळे लातूरसह धारूर, केज, कळंब, अंबाजोगाई, मुरुड, लातूर आणि औसा एमआयडीसीसह छोट्या-मोठ्या शहरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सध्या प्रकल्पात ६७.६९२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, पाणी पातळी ६३९.१० मीटरवर आली आहे. एकूण पाणीसाठा ५१.२३८ तर उपयुक्त पाणीसाठा ३८.२५ टक्के इतका झाला आहे.
प्रकल्पातील पाण्याची सद्यस्थिती....
एकूण साठा : ११४.८२२ दलघमी
उपयुक्त पाणीसाठा : ६७.६९२ दलघमी
पाणी पातळी : ६३९.१० मीटर
एकूण पाणीसाठा : ५१.२३८ टक्के
उपयुक्त पाणीसाठा : ३८.२५ टक्के
जूनपासूनची आवक : ४३.१०५ दलघमी
प्रकल्पीय क्षमता...
एकूण पाणीसाठा : २२४.०९४ दलघमी
उपयुक्त पाणीसाठा : १७६.९६४ दलघमी
मृत पाणीसाठा : ४७.१३० दलघमी
पूर्ण संचय पातळी : ६४२.३७ मीटर