शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; नुकसानीच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

लातूर : शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाईल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासात कंपनीला कळविण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली असून, ...

लातूर : शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाईल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासात कंपनीला कळविण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली असून, आता यासाठी सहा पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने कृषी विभाग, विमा कंपनी, तहसील कार्यालय व दत्तक बँकेकडे सादर करता येणार आहेत.

जिल्ह्यात मध्यंतरी झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ७२ तासात पिकांचे नुकसान विमा कंपनीस कळविणे आवश्यक असले तरी, त्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत होती. ही बाब लक्षात घेता, शासनाच्यावतीने नवीन सहा पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती तात्काळ देण्यास मदत होणार असून, नुकसानीची आर्थिक मदत मिळण्यास सहकार्य होणार आहे.

फोटो कॅप्शन...

रेणापूर तालुक्यात पडलेल्या पावसामुळे पिकात पाणी साचले होते. त्यामुळे शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आधी काय होते दोन पर्याय...

१. पूर्वी शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करून पीक नुकसानीची माहिती द्यावी लागत होती. अनेकदा टोल फ्री क्रमांक लागत नसल्याने गैरसोय होत होती.

२. शेतकऱ्यांना ७२ तासाच्या आता माहिती देणे बंधनकारक आहे. पूर्वी त्यासाठी मोबाईल ॲपद्वारे पिकांच्या नुकसानीचा फोटो आणि अर्जात माहिती भरावी लागत होती.

हे आहेत सहा नवीन पर्याय...

१. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज कृषी विभागात सादर करता येईल.

२. ज्या बँकेकडून पीक कर्ज घेतले आहे. त्या बँकेतही अर्ज कागदपत्रांसह भरता येणार आहे.

३. तहसील कार्यालयातही नुकसानीचा प्रस्ताव दाखल करता येणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता गरजेची आहे.

४. विमा कंपनीच्या कार्यालयातही नुकसानीची माहिती अर्जासह शेतकऱ्यांना सादर करता येणार आहे.

५. विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अर्ज क्रमांक सांगून नुकसानीची माहिती देता येईल.

६. ही सर्व माहिती ७२ तासात देणे गरजेचे आहे. विमा कंपनीच्या ई-मेलचा पर्यायही उपलब्ध आहे.

पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान...

जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.

८२ तासांचा अवधी...

विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती देण्यासाठी सहा पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या पर्यायांद्वारे ७२ तासात माहिती देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी या पर्यांयांचा अवलंब करून ७२ तासात अर्ज करावेत.

- संतोष भोसले, विमा कंपनी प्रतिनिधी