शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; नुकसानीच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST

लातूर : शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाईल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासात कंपनीला कळविण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली असून, ...

लातूर : शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाईल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासात कंपनीला कळविण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली असून, आता यासाठी सहा पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने कृषी विभाग, विमा कंपनी, तहसील कार्यालय व दत्तक बँकेकडे सादर करता येणार आहेत.

जिल्ह्यात मध्यंतरी झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ७२ तासात पिकांचे नुकसान विमा कंपनीस कळविणे आवश्यक असले तरी, त्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत होती. ही बाब लक्षात घेता, शासनाच्यावतीने नवीन सहा पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती तात्काळ देण्यास मदत होणार असून, नुकसानीची आर्थिक मदत मिळण्यास सहकार्य होणार आहे.

फोटो कॅप्शन...

रेणापूर तालुक्यात पडलेल्या पावसामुळे पिकात पाणी साचले होते. त्यामुळे शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आधी काय होते दोन पर्याय...

१. पूर्वी शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करून पीक नुकसानीची माहिती द्यावी लागत होती. अनेकदा टोल फ्री क्रमांक लागत नसल्याने गैरसोय होत होती.

२. शेतकऱ्यांना ७२ तासाच्या आता माहिती देणे बंधनकारक आहे. पूर्वी त्यासाठी मोबाईल ॲपद्वारे पिकांच्या नुकसानीचा फोटो आणि अर्जात माहिती भरावी लागत होती.

हे आहेत सहा नवीन पर्याय...

१. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज कृषी विभागात सादर करता येईल.

२. ज्या बँकेकडून पीक कर्ज घेतले आहे. त्या बँकेतही अर्ज कागदपत्रांसह भरता येणार आहे.

३. तहसील कार्यालयातही नुकसानीचा प्रस्ताव दाखल करता येणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता गरजेची आहे.

४. विमा कंपनीच्या कार्यालयातही नुकसानीची माहिती अर्जासह शेतकऱ्यांना सादर करता येणार आहे.

५. विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अर्ज क्रमांक सांगून नुकसानीची माहिती देता येईल.

६. ही सर्व माहिती ७२ तासात देणे गरजेचे आहे. विमा कंपनीच्या ई-मेलचा पर्यायही उपलब्ध आहे.

पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान...

जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.

८२ तासांचा अवधी...

विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती देण्यासाठी सहा पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या पर्यायांद्वारे ७२ तासात माहिती देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी या पर्यांयांचा अवलंब करून ७२ तासात अर्ज करावेत.

- संतोष भोसले, विमा कंपनी प्रतिनिधी