सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा डाटा गोळा करण्यासाठी तातडीने कारवाई सुरू करा, असे राज्य सरकारला सातत्याने सांगितले जात होते. मात्र, आघाडी सरकारने यासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत. राज्य सरकारच्या धोरणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय पाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी व तत्काळ ओबीसी समाजाला सन्मानाने आरक्षण मिळावे, आरक्षणाशिवाय कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका घेण्यात येऊ नयेत, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निलंगा येथे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, शहर अध्यक्ष ॲड. वीरभद्र स्वामी, शरद पेटकर, तालुका अध्यक्ष नामदेव काळे, शहराध्यक्ष भाऊसाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य काळे, उपाध्यक्ष युवराज पवार, कमोद लोभे, पिंटू पांचाळ, शफिक सौदागर, माधव पटणे, तमन्ना माडीबोने, तुकाराम माळी, मंचक पांचाळ, भगीरथ वरवडे, दिगंबर जाधव, विष्णुपंत आतरेड्डी, खादीम मिनाज, जब्बार सौदागर, आकाश पेठकर, प्रशांत पाटील, पाशा मिया आतार, अविनाश बिराजदार, अर्जुन पौळ, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसी आरक्षणासाठी निलंगा येथे भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST