शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मानव कल्याणासाठी ईश्वराचे सहाय्यक बना;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST

लातूर: आपल्या व समाजाच्या हितासाठी ईश्वरीय आदेशाचे आयुष्यात पालन करणे गरजेचे आहे. समाजहितासाठी स्वतःला तयार करणे आवश्यक असून, ईश्वराचा ...

लातूर: आपल्या व समाजाच्या हितासाठी ईश्वरीय आदेशाचे आयुष्यात पालन करणे गरजेचे आहे. समाजहितासाठी स्वतःला तयार करणे आवश्यक असून, ईश्वराचा मानव कल्याणासाठी जो संदेश आहे़. त्याला समजून तो अंमलात आणला तर आम्ही निश्चितच ईश्वराचे सहाय्यक बनू, असे प्रतिपादन जमाअतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तौफिक असलम खान यांनी केले.

शहरातील हमीदिया मस्जिद येथे जमाअते इस्लामी हिंद द्वारा आयोजित ’कूनू अन्सारूल्लाह अर्थात अल्लाहचे सहाय्यक बना’ या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तौफिक असलम खान म्हणाले, आज देशामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत, एक दिवसही असा जात नाही की महिलांविरूद्ध हिंसा किंवा बलात्कार होत नाही. व्याजाच्या विळख्याने अनेक लोकांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, श्रीमंत लोक गरीबांची लूट करीत आहेत, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, सरकार स्वतःच्या बळावर समाजाचे व्यापक हित साध्य करू शकत नाही. नागरिकांनाही सरकारच्या मदतीसाठी पुढे यावे लागेल असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचा आरंभ मुफ्ती अब्दुल्लाह यांच्या कुरआन प्रवचनाने झाला. प्रास्ताविक शहराध्यक्ष अशफाक अहेमद यांनी केले. एम.आय.शेख यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद आरीफ यांनी जमाअते इस्लामी हिंदचा परिचय करून दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष मिसबाहुद्दीन हाश्मी, शहराध्यक्ष अशफाक अहेमद, जिल्हाउपाध्यक्ष आरीफ शेख, अर्शद फलाही, अन्वरूल्लाह इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.