शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

उदगीरच्या मार्केट यार्डात नवीन सोयाबीनची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:25 IST

उदगीर तालुक्यात मागील काही वर्षापासून सोयाबीन हे खरिपाचे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेले आहे. कमी पावसावर चांगले उत्पादन ...

उदगीर तालुक्यात मागील काही वर्षापासून सोयाबीन हे खरिपाचे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेले आहे. कमी पावसावर चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकरीसुद्धा सोयाबीनच्या उत्पादनाकडे लक्ष देत आहेत. तालुक्यात यावर्षी खरिपाच्या एकूण ६४ हजार हेक्टर पैकी ४४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. काही दिवसाच्या खंडा मुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. परंतु अधूनमधून पडणाऱ्या जुलै महिन्यातील पावसामुळे सोयाबीनच्या पिकाला मोठा आधार मिळाला. ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील शेतकरी समाधानी झालेला आहे. मागील वर्षाच्या हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात सोयाबीनला विक्रमी दहा हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने व खाद्य तेलाचे दर वाढत असल्याने सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या बाजारात चांगल्या प्रतीचा माल ८ हजार ६०० रुपये क्विंटलच्या दराने विक्री होत असल्याने व निसर्गाने अशीच कृपा ठेवली तर पुढील आठवड्यात सोयाबीनच्या मोठ्या प्रमाणात राशी सुरु होतील व बाजारात आवक वाढेल अशी आशा व्यापारी करीत आहेत.

ऐन पेरणीच्या वेळी बाजारातुन खाजगी कंपनीचे बियाणे घेऊन पेरावे लागले. १५ जूनला सोयाबीनची पेरणी शेतात केले होती. दीड बॅगमध्ये सोयाबीनचे झालेले आहे. बॅगला १० पोत्याचा उतारा प्राप्त झाला असुन, दर सुद्धा उत्तम मिळाल्याने समाधान आहे. व्यंकट मारुती म्हेत्रे, शेतकरी