शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

दोन वर्षांपूर्वी खरोसा पाणीपुरवठा पुनरुज्जीवनाला मंजुरी; योजना रखडलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST

खरोसा : औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील ६ गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सहा खेडी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली ...

खरोसा : औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील ६ गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सहा खेडी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, थकीत वीज बिलामुळे ९ वर्षांपासून ती बंद आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी ४ कोटी ३५ लाखांच्या अंदाजपत्रकास २०१८ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली; परंतु अद्यापही योजना सुरू न झाल्याने ९ गावांचा पाणी प्रश्न बिकट बनला आहे.

औसा तालुक्यातील खरोसा व परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा आणि तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत ऑगस्ट २००६ मध्ये साडेअकरा कोटी खर्चून सहा खेडी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. ही योजना निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पातून कार्यान्वित झाली होती. प्रारंभी, या योजनेंतर्गत खरोसा, शेडोळ, किनीनवरे, तांबरवाडी, चलबुर्गा, जावळी या गावांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर आनंदवाडी, जाऊ, मोगरगा, अशा तीन गावांना यात समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे ही योजना नऊ गावांसाठी सुरू झाली.

गत पावसाळ्यात चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे मसलगा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. मात्र, ९ गावांच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा योजनेतील ९ गावांत सार्वजनिक हातपंप ६६, बोअर २५ आणि विहिरी १६ आहेत. एवढे पाण्याचे स्रोत असतानाही चलबुर्गा गाव वगळता उर्वरित आठही गावांना कमी- अधिक प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत.

सदरील पाणीपुरवठा योजना लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी खरोश्यासह इतर गावांच्या ग्रामस्थांकडून होत आहे. त्यामुळे खरोसा सहा खेडी पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सादर केला होता. त्यास शासनाने डिसेंबर २०१८ मध्ये मंजुरीही दिली. त्याअंतर्गत ४ कोटी ३५ लाखांच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली. शासनाच्या मंजुरीमुळे वर्षभरात विद्युत मोटारी जलवाहिनी, जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र, अशी ५० टक्के दुरुस्तीची कामे झाली. उर्वरित कामे कोरोनाच्या संसर्गामुळे आणि वीज जोडणी नसल्यामुळे थांबली असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सांगण्यात आले.

मसलगा प्रकल्पात ४४ टक्के उपयुक्त पाणी

मसलगा प्रकल्पात ४४.८२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

मसलगा धरणावरील एकूण थकबाकीच्या निम्मी ५२ लाख ५६ हजार ८४६ आणि खरोसा डोंगरावरील जलशुद्धीकरण केंद्राची एकूण वीज थकबाकीच्या निम्मी ७ लाख ५० हजार ७३९ रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाने ९ फेब्रुवारी २०२१ रोजी भरल्याचे प्राधिकरणकडून सांगण्यात येते. उर्वरित ५० टक्के वीज बिल थकबाकी राज्य सरकार भरणार असल्याचे सांगितले जात आहे. महावितरणने वीजजोडणी केल्यास पुढील दुरुस्तीची कामे पूर्ण होऊन पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी आशा आहे.