शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

दोन वर्षांपूर्वी खरोसा पाणीपुरवठा पुनरुज्जीवनाला मंजुरी; योजना रखडलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST

खरोसा : औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील ६ गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सहा खेडी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली ...

खरोसा : औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील ६ गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सहा खेडी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, थकीत वीज बिलामुळे ९ वर्षांपासून ती बंद आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी ४ कोटी ३५ लाखांच्या अंदाजपत्रकास २०१८ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली; परंतु अद्यापही योजना सुरू न झाल्याने ९ गावांचा पाणी प्रश्न बिकट बनला आहे.

औसा तालुक्यातील खरोसा व परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा आणि तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत ऑगस्ट २००६ मध्ये साडेअकरा कोटी खर्चून सहा खेडी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. ही योजना निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पातून कार्यान्वित झाली होती. प्रारंभी, या योजनेंतर्गत खरोसा, शेडोळ, किनीनवरे, तांबरवाडी, चलबुर्गा, जावळी या गावांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर आनंदवाडी, जाऊ, मोगरगा, अशा तीन गावांना यात समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे ही योजना नऊ गावांसाठी सुरू झाली.

गत पावसाळ्यात चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे मसलगा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. मात्र, ९ गावांच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा योजनेतील ९ गावांत सार्वजनिक हातपंप ६६, बोअर २५ आणि विहिरी १६ आहेत. एवढे पाण्याचे स्रोत असतानाही चलबुर्गा गाव वगळता उर्वरित आठही गावांना कमी- अधिक प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत.

सदरील पाणीपुरवठा योजना लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी खरोश्यासह इतर गावांच्या ग्रामस्थांकडून होत आहे. त्यामुळे खरोसा सहा खेडी पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सादर केला होता. त्यास शासनाने डिसेंबर २०१८ मध्ये मंजुरीही दिली. त्याअंतर्गत ४ कोटी ३५ लाखांच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली. शासनाच्या मंजुरीमुळे वर्षभरात विद्युत मोटारी जलवाहिनी, जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र, अशी ५० टक्के दुरुस्तीची कामे झाली. उर्वरित कामे कोरोनाच्या संसर्गामुळे आणि वीज जोडणी नसल्यामुळे थांबली असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सांगण्यात आले.

मसलगा प्रकल्पात ४४ टक्के उपयुक्त पाणी

मसलगा प्रकल्पात ४४.८२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

मसलगा धरणावरील एकूण थकबाकीच्या निम्मी ५२ लाख ५६ हजार ८४६ आणि खरोसा डोंगरावरील जलशुद्धीकरण केंद्राची एकूण वीज थकबाकीच्या निम्मी ७ लाख ५० हजार ७३९ रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाने ९ फेब्रुवारी २०२१ रोजी भरल्याचे प्राधिकरणकडून सांगण्यात येते. उर्वरित ५० टक्के वीज बिल थकबाकी राज्य सरकार भरणार असल्याचे सांगितले जात आहे. महावितरणने वीजजोडणी केल्यास पुढील दुरुस्तीची कामे पूर्ण होऊन पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी आशा आहे.