भारत सरकारच्या प्रौढ व अल्पसंख्याक विभागाच्या साक्षर भारत कार्यक्रमांतर्गत सन २०१२ ते मार्च २०१८ या कालावधीत प्रौढ साक्षरता वर्गासाठी चाकूर तालुक्यातील १४४ तर जिल्ह्यातील १ हजार ५७२ प्रेरकांनी निरक्षरांना साक्षर करण्याचे काम तुटपुंज्या मानधनावर केले. सन २०१८ पासून हा कार्यक्रम बंद असल्याने प्रेरकांच्या हाताला काम नाही. दरम्यान, थकीत मानधनही दिले जात नाही. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून हाताला काम नाही. त्यातच महागाई वाढली आहे. अशा परिस्थितीत जगणे कठीण झाले असून शासनाने थकीत मानधन तात्काळ देऊन बेरोजगार प्रेरकांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर भुजंग अर्जुने, निशिकांत शिंदे, अफजलपाशा शेख, अंकुश दांडगे, गोविंद दीक्षित, दत्ता मुंडे, उध्दव दुवे, उषा शिंदे, मंगेश तोडकरी, रेणुका तोडकरी, नरेंद्र घुगे, खलील शेख, नागरगोजे, शिवाजी कांबळे, मारोती पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी पोलीस नाईक स्वामी, गोमारे, पोकॉ. जोशी यांनी बंदोबस्त ठेवला होता.
कॅप्शन : थकीत मानधनासाठी चाकूर तहसील कार्यालयासमोर बुधवारी प्रेरकांनी काळ्या फिती लावून सरकारवर संताप व्यक्त केला.