शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

मावलगावात मोहोरांनी बहरली आमराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:48 IST

अहमदपूर : गावातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत गावाचा कायापालट करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी तालुक्यातील मावलगाव येथील ग्रामपंचायतीने पुढाकार ...

अहमदपूर : गावातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत गावाचा कायापालट करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी तालुक्यातील मावलगाव येथील ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन विविध रोपांची लागवड केली. सध्या येथील अमराई मोहोराने बहरली आहे.

अहमदपूर तालुक्यातील मावलगाव हे १ हजार २७४ लोकसंख्येचे गाव असून, ग्रामपंचायतीने शासन योजना राबविण्याबरोबरच सरपंचांनी स्वखर्चातून गाव विकासासाठी मदत केली आहे. गावातील अबालवृध्दांसाठी उद्यान, ज्येष्ठांना बसण्यासाठी सिमेंट बाकडे, गावातील संपूर्ण घरांना एकच रंग, धोबीघाट, ओपन जीम, प्रत्येक कुटुंबाच्या नळास मीटर, गावात विविध ठिकाणी हात धुण्यासाठी वॉश बेशीन, मोफत दळण, गावात बंदिस्त गटारी, प्रत्येक कुटुंबात शौचालयाचा वापर, सीसीटीव्ही कॅमेरे, मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रोत्साहापर मदत असे विविध उपक्रम ग्रामपंचायतीकडून राबविले जात आहेत. याशिवाय एक गाव - एक स्मशानभूमी, आठ - अ रजिस्टरला कुटुंबप्रमुख म्हणून महिलांचे नाव, रस्त्यावर पेव्हर ब्लॉक, गावातील चौकाचौकात एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. गावात तीन ठिकाणी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

शोषखड्ड्याच्या माध्यमातून सांडपाण्याचे १०० टक्के व्यवस्थापन करीत डासमुक्त गाव करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घंटागाडीद्वारे कचरा जमा केला जातो. कचरा जमा करण्यासाठी २५० कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले आहे. युवकांसाठी मोफत वाचनालय अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी सरपंच रुक्मिण संपते, उपसरपंच नीलावती केंद्रे, ग्रामसेवक सचिन तावरे, चेअरमन रमेश कासले, मल्लिकार्जुन स्वामी, रंगनाथ पाटील, रामचंद्र केंद्रे, गणपतराव संपते, विद्याबाई राचमले, अनिल कदम, सतीश कासले, अशोक भदाडे आदी परिश्रम घेत आहेत.

कॅरिबॅगमुक्तीकडे वाटचाल...

शासनाच्या कॅरिबॅगमुक्त उपक्रमात सहभागी होऊन गाव कॅरिबॅगमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. गावात विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून, काही कामे स्वखर्चाने केल्याचे सरपंच रुक्मिण संपते यांनी सांगितले.

पर्यावरणाचे रक्षण...

मावलगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने गावात फुले, फळांची व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यात आंबा १५०, नारळ ८०, चिकू २००, पेरु १५०, जांभूळ २००, चिंच १०० तसेच फुलांची २ हजार, तर इतर झाडे २,५०० अशी झाडे लावण्यात आली आहेत. सध्या आंब्याची झाडे मोहोराने बहरली आहेत. यंदा ग्रामस्थांना आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.