शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

मावलगावात मोहोरांनी बहरली आमराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:48 IST

अहमदपूर : गावातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत गावाचा कायापालट करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी तालुक्यातील मावलगाव येथील ग्रामपंचायतीने पुढाकार ...

अहमदपूर : गावातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत गावाचा कायापालट करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी तालुक्यातील मावलगाव येथील ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन विविध रोपांची लागवड केली. सध्या येथील अमराई मोहोराने बहरली आहे.

अहमदपूर तालुक्यातील मावलगाव हे १ हजार २७४ लोकसंख्येचे गाव असून, ग्रामपंचायतीने शासन योजना राबविण्याबरोबरच सरपंचांनी स्वखर्चातून गाव विकासासाठी मदत केली आहे. गावातील अबालवृध्दांसाठी उद्यान, ज्येष्ठांना बसण्यासाठी सिमेंट बाकडे, गावातील संपूर्ण घरांना एकच रंग, धोबीघाट, ओपन जीम, प्रत्येक कुटुंबाच्या नळास मीटर, गावात विविध ठिकाणी हात धुण्यासाठी वॉश बेशीन, मोफत दळण, गावात बंदिस्त गटारी, प्रत्येक कुटुंबात शौचालयाचा वापर, सीसीटीव्ही कॅमेरे, मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रोत्साहापर मदत असे विविध उपक्रम ग्रामपंचायतीकडून राबविले जात आहेत. याशिवाय एक गाव - एक स्मशानभूमी, आठ - अ रजिस्टरला कुटुंबप्रमुख म्हणून महिलांचे नाव, रस्त्यावर पेव्हर ब्लॉक, गावातील चौकाचौकात एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. गावात तीन ठिकाणी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

शोषखड्ड्याच्या माध्यमातून सांडपाण्याचे १०० टक्के व्यवस्थापन करीत डासमुक्त गाव करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घंटागाडीद्वारे कचरा जमा केला जातो. कचरा जमा करण्यासाठी २५० कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले आहे. युवकांसाठी मोफत वाचनालय अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी सरपंच रुक्मिण संपते, उपसरपंच नीलावती केंद्रे, ग्रामसेवक सचिन तावरे, चेअरमन रमेश कासले, मल्लिकार्जुन स्वामी, रंगनाथ पाटील, रामचंद्र केंद्रे, गणपतराव संपते, विद्याबाई राचमले, अनिल कदम, सतीश कासले, अशोक भदाडे आदी परिश्रम घेत आहेत.

कॅरिबॅगमुक्तीकडे वाटचाल...

शासनाच्या कॅरिबॅगमुक्त उपक्रमात सहभागी होऊन गाव कॅरिबॅगमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. गावात विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून, काही कामे स्वखर्चाने केल्याचे सरपंच रुक्मिण संपते यांनी सांगितले.

पर्यावरणाचे रक्षण...

मावलगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने गावात फुले, फळांची व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यात आंबा १५०, नारळ ८०, चिकू २००, पेरु १५०, जांभूळ २००, चिंच १०० तसेच फुलांची २ हजार, तर इतर झाडे २,५०० अशी झाडे लावण्यात आली आहेत. सध्या आंब्याची झाडे मोहोराने बहरली आहेत. यंदा ग्रामस्थांना आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.