शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
13
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
14
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
15
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
16
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

मावलगावात मोहोरांनी बहरली आमराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:48 IST

अहमदपूर : गावातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत गावाचा कायापालट करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी तालुक्यातील मावलगाव येथील ग्रामपंचायतीने पुढाकार ...

अहमदपूर : गावातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत गावाचा कायापालट करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी तालुक्यातील मावलगाव येथील ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन विविध रोपांची लागवड केली. सध्या येथील अमराई मोहोराने बहरली आहे.

अहमदपूर तालुक्यातील मावलगाव हे १ हजार २७४ लोकसंख्येचे गाव असून, ग्रामपंचायतीने शासन योजना राबविण्याबरोबरच सरपंचांनी स्वखर्चातून गाव विकासासाठी मदत केली आहे. गावातील अबालवृध्दांसाठी उद्यान, ज्येष्ठांना बसण्यासाठी सिमेंट बाकडे, गावातील संपूर्ण घरांना एकच रंग, धोबीघाट, ओपन जीम, प्रत्येक कुटुंबाच्या नळास मीटर, गावात विविध ठिकाणी हात धुण्यासाठी वॉश बेशीन, मोफत दळण, गावात बंदिस्त गटारी, प्रत्येक कुटुंबात शौचालयाचा वापर, सीसीटीव्ही कॅमेरे, मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रोत्साहापर मदत असे विविध उपक्रम ग्रामपंचायतीकडून राबविले जात आहेत. याशिवाय एक गाव - एक स्मशानभूमी, आठ - अ रजिस्टरला कुटुंबप्रमुख म्हणून महिलांचे नाव, रस्त्यावर पेव्हर ब्लॉक, गावातील चौकाचौकात एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. गावात तीन ठिकाणी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

शोषखड्ड्याच्या माध्यमातून सांडपाण्याचे १०० टक्के व्यवस्थापन करीत डासमुक्त गाव करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घंटागाडीद्वारे कचरा जमा केला जातो. कचरा जमा करण्यासाठी २५० कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले आहे. युवकांसाठी मोफत वाचनालय अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी सरपंच रुक्मिण संपते, उपसरपंच नीलावती केंद्रे, ग्रामसेवक सचिन तावरे, चेअरमन रमेश कासले, मल्लिकार्जुन स्वामी, रंगनाथ पाटील, रामचंद्र केंद्रे, गणपतराव संपते, विद्याबाई राचमले, अनिल कदम, सतीश कासले, अशोक भदाडे आदी परिश्रम घेत आहेत.

कॅरिबॅगमुक्तीकडे वाटचाल...

शासनाच्या कॅरिबॅगमुक्त उपक्रमात सहभागी होऊन गाव कॅरिबॅगमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. गावात विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून, काही कामे स्वखर्चाने केल्याचे सरपंच रुक्मिण संपते यांनी सांगितले.

पर्यावरणाचे रक्षण...

मावलगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने गावात फुले, फळांची व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यात आंबा १५०, नारळ ८०, चिकू २००, पेरु १५०, जांभूळ २००, चिंच १०० तसेच फुलांची २ हजार, तर इतर झाडे २,५०० अशी झाडे लावण्यात आली आहेत. सध्या आंब्याची झाडे मोहोराने बहरली आहेत. यंदा ग्रामस्थांना आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.