शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

९ तासांत रेणा प्रकल्पात १४ टक्के जलसाठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST

सोमवारपासून सर्वदूर पाऊस होत आहे. त्यामुळे तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होत आहे. रेणा प्रकल्प क्षेत्रात ...

सोमवारपासून सर्वदूर पाऊस होत आहे. त्यामुळे तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होत आहे. रेणा प्रकल्प क्षेत्रात जरी पाऊस कमी असला तरी अंबाजोगाई व परळी तालुक्यातील दोन धरण शंभर टक्के भरल्याने अतिरिक्त पाणी सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे रेणा प्रकल्पात केवळ ९ तासांत १४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

सोमवारी दिवसभर या प्रकल्पात १५ टक्के पाणीसाठा होता. रात्री पावसामुळे प्रकल्पात पाणी येण्यास सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी ६ वा. पासून पाण्याचा ओघ वाढला. दुपारी ३ वा. पर्यंत प्रकल्पात १४ टक्क्यांनी वाढ होऊन एकूण २९.१४ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिवंत पाणीसाठा ५.९९ दलघमी व एकूण पाणीसाठा ७.१२० दलघमी झाला आहे.

सकाळपासून वेग वाढला...

अंबाजोगाई व परळी तालुक्यातील मुरंबी आणि जोगाईवाडी धरण शंभर टक्के भरले आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग होऊन हे पाणी रेणा प्रकल्पात येत आहे. रात्री १२ वा. पासून रेणा धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली. सकाळी ६ वा. पासून पाण्याचा वेग वाढला. दुपारी २.३० वा. पर्यंत जिवंत पाणीसाठा ५.९९ दलघमी तर एकूण पाणीसाठा ७.१२० दलघमी असा झाला आहे, असे रेणा मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.

दोन मंडळात अतिवृष्टी...

रेणापूर तालुक्यात गत २४ तासांत सरासरी ५९.९ मिमी पाऊस झाला आहे. रेणापूर मंडळात ३५, पोहरेगाव- ५२, पानगाव- ८४, कारेपूर- ६५.३ आणि पळशी मंडळात ६३ मिमी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे.