शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

साखळी बंधाऱ्यांसाठी ८ कोटी

By admin | Updated: August 12, 2014 01:58 IST

औसा/किल्लारी/लामजना : लातूर जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात साखळी बंधाऱ्यांसाठी ८ कोटींची मदत केली जाईल,

औसा/किल्लारी/लामजना : लातूर जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात साखळी बंधाऱ्यांसाठी ८ कोटींची मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे दिली.लामजना येथील चौरस्त्यावर आ. बसवराज पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर होते. मंचावर माजी मुख्यमंत्री आ.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री अमित देशमुख, आमदार बसवराज पाटील, आ. वैजनाथ शिंदे, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचा लोकाभिमुख कारभार चालवीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कमजोर माणसांमध्ये जिद्द निर्माण केली. सध्याचे सरकार त्या विचारातूनच राज्यकारभार चालवीत आहे. सर्वसामान्यांना बरोबर घेऊन सर्वधर्मसमभाव जोपासला जात आहे. सध्या मराठवाड्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात साखळी बंधाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल. (वार्ताहर)आमदार बसवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्रात सर्वात मोठा पुतळा लामजना चौरस्त्यावर उभारला आहे. तो महाराष्ट्राला प्रेरणा देणारा ठरेल, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवरायांनी लोकाभिमुख प्रशासन कसे चालवायचे, याचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी महाराष्ट्रधर्म वाढविला.