शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

३५०४ जागांसाठी ७१०० अर्ज; आयटीआयकडे वाढला विद्यार्थ्यांचा कल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST

लातूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांकडे सर्वाधिक असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत औद्योगिक ...

लातूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांकडे सर्वाधिक असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या संधीमुळे विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढला आहे. जिल्ह्यात ३ हजार ५०४ जागांसाठी ७ हजार १०० विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. दरम्यान, अद्यापही अर्ज प्रकिया सुरूच असल्याने विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लातूर जिल्ह्यात ११ शासकीय, तर ८ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. दोन्ही संस्था मिळून ३ हजार ५०४ जागा आहेत. प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जाणार आहेत. दाेन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तत्काळ नोकरीची संधी असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआयकडे वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाही अर्जात वाढ झाली आहे.

अर्ज स्थिती - एकूण जागा - ३५०४

आलेले अर्ज - ७१००

जिल्ह्यात आयटीआय - ११ शासकीय

०८ खासगी

प्रवेश क्षमता - शासकीय - २८००

खासगी ७०४

विद्यार्थी म्हणतात...

आयटीआय केवळ दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. नोकरीच्या संधी असल्याने आयटीआयला प्रवेश घेण्याचे नियोजन आहे. टर्नर, फिटरला पसंती असून, अर्ज भरला आहे. गुणवत्ता यादी कधी जाहीर होते याची प्रतीक्षा लागली आहे.

- फैजोद्दीन खतीब

विज्ञान, कला, वाणिज्य या शाखांकडे सर्वांचा ओढा असतो. मात्र, आयटीआय केल्यावरही नोकरीच्या संधी आहेत. त्यामुळे या वर्षी आयटीआयला प्रवेश घेण्याचे निश्चित केले असून, अर्जही भरला आहे.

- नरेश चोले

म्हणून वाढला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद...

गेल्या काही वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आयटीआयकडे प्रवेशाला पसंती देत आहेत.

- प्रा. सारिका जटाळ

शासकीय, खासगी, महावितरण, एस.टी. महामंडळ या संस्थांमध्ये आयटीआय केलेल्यांना नोकरीच्या संधी असतात. अनेक विद्यार्थी आयटीआय झाल्यावरही शिक्षण सुरूच ठेवतात. त्यामुळे आयटीआयकडे प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत आहे. - सतीश सातपुते

गतवर्षीपेक्षा प्रतिसाद वाढला...

मागील वर्षी कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले.

या वर्षी दहावीची परीक्षा न झाल्याने अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुणांकन करण्यात आले आहे. त्यामुळे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. गुण जास्त असल्याने आयटीआय प्रवेशासाठी स्पर्धा असणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा असल्याने आतापर्यंत सात हजार १०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

एकंदरीत मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी आयटीआयकडे विद्यार्थ्यांचे सर्वाधिक अर्ज आले आहेत.