शहरं
Join us  
Trending Stories
1
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
2
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
3
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
4
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
5
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
6
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
7
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
8
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
9
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
10
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
11
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
12
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
13
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
14
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
15
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
16
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
17
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
18
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
19
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
20
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा

३५०४ जागांसाठी ७१०० अर्ज; आयटीआयकडे वाढला विद्यार्थ्यांचा कल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST

लातूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांकडे सर्वाधिक असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत औद्योगिक ...

लातूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांकडे सर्वाधिक असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या संधीमुळे विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढला आहे. जिल्ह्यात ३ हजार ५०४ जागांसाठी ७ हजार १०० विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. दरम्यान, अद्यापही अर्ज प्रकिया सुरूच असल्याने विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लातूर जिल्ह्यात ११ शासकीय, तर ८ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. दोन्ही संस्था मिळून ३ हजार ५०४ जागा आहेत. प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जाणार आहेत. दाेन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तत्काळ नोकरीची संधी असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआयकडे वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाही अर्जात वाढ झाली आहे.

अर्ज स्थिती - एकूण जागा - ३५०४

आलेले अर्ज - ७१००

जिल्ह्यात आयटीआय - ११ शासकीय

०८ खासगी

प्रवेश क्षमता - शासकीय - २८००

खासगी ७०४

विद्यार्थी म्हणतात...

आयटीआय केवळ दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. नोकरीच्या संधी असल्याने आयटीआयला प्रवेश घेण्याचे नियोजन आहे. टर्नर, फिटरला पसंती असून, अर्ज भरला आहे. गुणवत्ता यादी कधी जाहीर होते याची प्रतीक्षा लागली आहे.

- फैजोद्दीन खतीब

विज्ञान, कला, वाणिज्य या शाखांकडे सर्वांचा ओढा असतो. मात्र, आयटीआय केल्यावरही नोकरीच्या संधी आहेत. त्यामुळे या वर्षी आयटीआयला प्रवेश घेण्याचे निश्चित केले असून, अर्जही भरला आहे.

- नरेश चोले

म्हणून वाढला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद...

गेल्या काही वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आयटीआयकडे प्रवेशाला पसंती देत आहेत.

- प्रा. सारिका जटाळ

शासकीय, खासगी, महावितरण, एस.टी. महामंडळ या संस्थांमध्ये आयटीआय केलेल्यांना नोकरीच्या संधी असतात. अनेक विद्यार्थी आयटीआय झाल्यावरही शिक्षण सुरूच ठेवतात. त्यामुळे आयटीआयकडे प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत आहे. - सतीश सातपुते

गतवर्षीपेक्षा प्रतिसाद वाढला...

मागील वर्षी कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले.

या वर्षी दहावीची परीक्षा न झाल्याने अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुणांकन करण्यात आले आहे. त्यामुळे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. गुण जास्त असल्याने आयटीआय प्रवेशासाठी स्पर्धा असणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा असल्याने आतापर्यंत सात हजार १०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

एकंदरीत मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी आयटीआयकडे विद्यार्थ्यांचे सर्वाधिक अर्ज आले आहेत.