शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

विम्याशिवाय धावतात ७0 हजार वाहने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:18 IST

लातूर जिल्ह्यात ५ लाख ४३ हजार ५०८ विविध संवर्गांतील वाहने आहेत. त्यात सर्वाधिक ४ लाख ४ हजार ८८८ दुचाकींचा ...

लातूर जिल्ह्यात ५ लाख ४३ हजार ५०८ विविध संवर्गांतील वाहने आहेत. त्यात सर्वाधिक ४ लाख ४ हजार ८८८ दुचाकींचा समावेश आहे. त्यानंतर मोटार कार, जीप, टॅक्सी आदी चारचाकी वाहनांची संख्या जवळपास ६० हजारांच्या घरात आहे. याशिवाय, ऑटोरिक्षांची संख्याही २० हजारांहून अधिक आहे. अनेक वाहनधारक केवळ नोंदणी करीत असतानाच विमा काढतात. एकदा का मुदत संपली की, अनेकजण विमा भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. वाहन कोणतेही असो अपघात झाल्यास त्यात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी विमा कंपनी हा खूप मोठा आधार आहे; परंतु केवळ टॅक्सी, परवानाधारक ऑटोरिक्षा, अवजड वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो, प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स हेच वाहनधारक विमा काढण्यासाठी तत्पर आहेत. सर्वाधिक वापरात असलेल्या दुचाकींचा विमा एकदा संपला की, पुन्हा काढला जात नसल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातील १०० पैकी जवळपास २५ ते ३० दुचाकी विम्याविना धावत असल्याचे आढळून आले आहे.

विमा हा वाहनांसोबतच स्वत:च्या सुरक्षेसाठीही महत्त्वाचा घटक असतानाही याकडे होणारे दुर्लक्ष धोकादायक आहे.

एकंदरित, रस्त्यावर विम्याशिवाय किती वाहने धावतात, याबाबतची अधिकृत नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे नसते. मात्र, वाहतूक पोलीस, परिवहन विभागाच्या पथकाकडून रस्त्यावर वाहनांची तपासणी केली जाते. अशावेळी बहुतांश दुचाकी, ट्रॅक्टर तसेच खाजगी वापरात असलेल्या अनेक चारचाकी वाहनधारकांकडेही विमा काढण्यात आला नसल्याचे आढळून आले आहे. विमा हा अपघातात सर्वाधिक आर्थिक बळ देणारा घटक आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वत:चेच नुकसान करून घेण्यासारखे आहे. त्यामुळे स्वत:बरोबर इतरांच्या सुरक्षेसाठीही रस्ते अपघातात विमा महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले.

परवानाधारक वाहने दरवर्षी फिटनेस तसेच अन्य कामांसाठी येतात. त्यांच्याकडे विमा असल्याशिवाय नोंदणीच होत नाही. वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या विम्याकडे दुर्लक्ष करू नये. - विजय पाटील,

उपप्रादेशिक परिवहन

अधिकारी, लातूर