शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

जिल्ह्यातील ७ रक्तपेढ्यांमध्ये आठवडाभर पुरेल एवढाच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST

गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. सध्या तर कोरोनाचा आलेख उंचावत आहे. गेल्या वर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने ...

गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. सध्या तर कोरोनाचा आलेख उंचावत आहे. गेल्या वर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य शासनाने रक्तदानाचे आवाहन केले होते. लॉकडाऊनमुळे शहरातील नागरिक गावाकडे आल्याने आणि त्यांनी समाजात जनजागृती केल्याने रक्तदानाचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे तुटवडा जाणवणे कमी झाले होते.

कोरोना प्रतिबंधासाठी शासनाच्या वतीने १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्याचबरोबर कोराेनाचा संसर्ग वाढत आहे. दरम्यान, कोविड लसीचा पहिला डोस घेतल्यापासून २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवसांनंतर रक्तदान करावे, अशा शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्याचा परिणाम रक्त संकलनावर झाला आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट येण्यापूर्वी प्रत्येक रक्तपेढ्यांत महिन्याकाठी २०० ते ३०० रक्त पिशव्यांचे संकलन होत असे. मात्र, आता ५० ते ६० रक्त पिशव्या संकलित होत असल्याचे दिसून येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये चांगल्या प्रमाणात रक्तसाठा झाला होता. मात्र, हा रक्तसाठा केवळ आठवडाभर पुरेल एवढाच असल्याचे रक्तपेढ्यांच्या प्रमुखांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

शासकीय रक्तपेढीत चार दिवसांचा साठा...

कोरोनाच्या संकटापूर्वी शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रक्तपेढीत महिन्याकाठी ३०० ते ४०० रक्तपिशव्यांचे संकलन होत असे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसीकरणामुळे रक्त संकलनाचे प्रमाण ४० ते ५० वर येऊन पोहोचले आहे. चार दिवस पुरेल एवढाच साठा आहे. लसीकरणापूर्वी रक्तदान करणे तसेच युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे शासकीय रक्तपेढीचे प्रमुख डॉ. उमेश कानडे यांनी सांगितले.

माऊली ब्लड बँक...

गेल्या वर्षी दर महिन्यास ४०० ते ५०० पिशव्या रक्त संकलन होत असे. मात्र, आता संकलनाचे प्रमाण निम्यापेक्षा कमी झाले आहे. आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. लसीकरणापूर्वी रक्तदान करणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. त्यामुळे रक्तपुरवठा करणे शक्य होईल, असे माऊली ब्लड बँकचे अध्यक्ष उमाकांत जाधव यांनी सांगितले.

डॉ. भालचंद्र ब्लड बँक...

पूर्वी २०० ते ३०० जण दर महिन्यास रक्तदान करीत असत. आता रक्तदानाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. शिवजयंती, काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरांमुळे काही प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध झाला आहे, असे डॉ. भालचंद्र ब्लड बँकेकडून सांगण्यात आले.

श्रीमती सरस्वती कराड ब्लड बँक...

कोरोनाच्या संकटापूर्वी महिन्यास २०० ते ३०० पिशव्या रक्त संकलित होत असे. आता हे प्रमाण ४० ते ५० वर येऊन पोहोचले आहे. ७ ते ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असून मागणी वाढली आहे. रक्तदानासाठी युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक ठरत असल्याचे ब्लड बँकेकडून सांगण्यात आले.

लसीकरणाअगोदर करा रक्तदान...

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. शासनाच्या मार्गदर्शक निर्देशानुसार कोविड लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते. त्यामुळे लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे. रक्तदानासाठी प्रशासनाबरोबर सामाजिक संस्थांकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. युवकांनीही रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा. तसेच विविध सोसायट्यांनी आपल्या भागात रक्तदान शिबिर घेतल्यास त्याचा काही प्रमणात फायदा होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.