शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७ रक्तपेढ्यांमध्ये आठवडाभर पुरेल एवढाच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST

गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. सध्या तर कोरोनाचा आलेख उंचावत आहे. गेल्या वर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने ...

गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. सध्या तर कोरोनाचा आलेख उंचावत आहे. गेल्या वर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य शासनाने रक्तदानाचे आवाहन केले होते. लॉकडाऊनमुळे शहरातील नागरिक गावाकडे आल्याने आणि त्यांनी समाजात जनजागृती केल्याने रक्तदानाचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे तुटवडा जाणवणे कमी झाले होते.

कोरोना प्रतिबंधासाठी शासनाच्या वतीने १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्याचबरोबर कोराेनाचा संसर्ग वाढत आहे. दरम्यान, कोविड लसीचा पहिला डोस घेतल्यापासून २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवसांनंतर रक्तदान करावे, अशा शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्याचा परिणाम रक्त संकलनावर झाला आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट येण्यापूर्वी प्रत्येक रक्तपेढ्यांत महिन्याकाठी २०० ते ३०० रक्त पिशव्यांचे संकलन होत असे. मात्र, आता ५० ते ६० रक्त पिशव्या संकलित होत असल्याचे दिसून येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये चांगल्या प्रमाणात रक्तसाठा झाला होता. मात्र, हा रक्तसाठा केवळ आठवडाभर पुरेल एवढाच असल्याचे रक्तपेढ्यांच्या प्रमुखांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

शासकीय रक्तपेढीत चार दिवसांचा साठा...

कोरोनाच्या संकटापूर्वी शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रक्तपेढीत महिन्याकाठी ३०० ते ४०० रक्तपिशव्यांचे संकलन होत असे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लसीकरणामुळे रक्त संकलनाचे प्रमाण ४० ते ५० वर येऊन पोहोचले आहे. चार दिवस पुरेल एवढाच साठा आहे. लसीकरणापूर्वी रक्तदान करणे तसेच युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे शासकीय रक्तपेढीचे प्रमुख डॉ. उमेश कानडे यांनी सांगितले.

माऊली ब्लड बँक...

गेल्या वर्षी दर महिन्यास ४०० ते ५०० पिशव्या रक्त संकलन होत असे. मात्र, आता संकलनाचे प्रमाण निम्यापेक्षा कमी झाले आहे. आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. लसीकरणापूर्वी रक्तदान करणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. त्यामुळे रक्तपुरवठा करणे शक्य होईल, असे माऊली ब्लड बँकचे अध्यक्ष उमाकांत जाधव यांनी सांगितले.

डॉ. भालचंद्र ब्लड बँक...

पूर्वी २०० ते ३०० जण दर महिन्यास रक्तदान करीत असत. आता रक्तदानाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. शिवजयंती, काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरांमुळे काही प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध झाला आहे, असे डॉ. भालचंद्र ब्लड बँकेकडून सांगण्यात आले.

श्रीमती सरस्वती कराड ब्लड बँक...

कोरोनाच्या संकटापूर्वी महिन्यास २०० ते ३०० पिशव्या रक्त संकलित होत असे. आता हे प्रमाण ४० ते ५० वर येऊन पोहोचले आहे. ७ ते ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असून मागणी वाढली आहे. रक्तदानासाठी युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक ठरत असल्याचे ब्लड बँकेकडून सांगण्यात आले.

लसीकरणाअगोदर करा रक्तदान...

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. शासनाच्या मार्गदर्शक निर्देशानुसार कोविड लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी रक्तदान करता येते. त्यामुळे लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे. रक्तदानासाठी प्रशासनाबरोबर सामाजिक संस्थांकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. युवकांनीही रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा. तसेच विविध सोसायट्यांनी आपल्या भागात रक्तदान शिबिर घेतल्यास त्याचा काही प्रमणात फायदा होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.