शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
3
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
4
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
5
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
6
दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
7
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
8
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
9
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
10
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
11
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
12
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
13
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
14
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
15
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
16
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
17
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
18
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
19
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
20
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा प्रकल्पावरील १८ पाणीपुरवठा योजनांसाठी महिन्याला लागते दोन दलघमी पाणी

By हणमंत गायकवाड | Updated: June 8, 2023 18:06 IST

मान्सून रखडल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज

लातूर :लातूर शहरासह मांजरा प्रकल्पावर एकूण १८ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यात अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब, शिराढोण, मुरुड, येडेश्वरी शुगर, गंगा शुगर, नायगाव, आवाड शिरपुरा, धनेगाव, करजगाव, कोथळा, युसुफवडगाव आणि केज-धारूर बारा गावे पाणीपुरवठा योजना आदी गावांचा समावेश आहे. या सर्व गावांसाठी एकूण दोन दलघमी पाणी महिन्याला लागते. सद्यस्थितीत मान्सूनचा विचार करता, उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.

मांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत २४ % म्हणजे ४२ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. मृत पाणीसाठा ४७ % असून, वर्षभराच्या लागणाऱ्या पाण्याचे नियोजन केले असता, २५ दलघमी लागणार आहे. धरणात ४२ दलघमी पाणीसाठा जिवंत आहे. पुढल्या पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पाणी पुरवू शकते. परंतु पावसाळा लांबणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मान्सून रखडला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा विचार करता पाण्याचे नियोजन धरण प्रशासनाकडून करण्यात आले असून, काटकसरीने वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सध्या शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. आतापर्यंत उन्हाळ्यात तीन रोटेशन झाले आहेत. रोटेशनचे टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आता पिण्यासाठीच उपलब्ध पाणी साठ्याचा वापर होणार आहे.

कोणत्या योजनेला किती लागते महिन्याला पाणी....!लातूर शहराला १.५ दलघमी, अंबाजोगाई ०.३ दलघमी, लातूर एमआयडीसी ३५ दलघमी, केज ०.०५ दलघमी, कळंब १० दलघमी असा एकूण १८ पाणीपुरवठा योजनांसाठी महिन्याला दोन दलघमी पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो.

महिन्याला ७० लाखांची पाणीपट्टी...मांजरा प्रकल्पातून लातूर शहरासह एकूण १८ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यासाठी महिन्याला ६० ते ७० लाखांची पाणीपट्टी आकारली जाते. परंतु वसुलीसंबंधित एजन्सीकडून नगण्य आहे. वसुलीला प्रतिसाद नाही. एकट्या लातूर महानगरपालिकेकडे थकबाकी २४ कोटींची आहे. अंबाजोगाई शहराकडे चार आणि लातूर एमआयडीसीकडे चालू थकबाकी सहा कोटींची असल्याचे शाखा अभियंता सूरज निकम यांनी सांगितले.

पाणीपट्टी वसुलीला अत्यल्प प्रतिसाद...।पाणीपट्टी वसुलीची मोहीम कडक राबविली जात नसल्यामुळे संबंधित संस्थांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टीची थकबाकी आहे. मोठ्या गावाकडे लाखोंची थकबाकी आहे. त्यांनी पाणीपट्टी वसुलीला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

अभूतपूर्व पाणी टंचाई लक्षात ठेवा...गतवर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडला होता. एक जूनपासूनच धरणामध्ये नव्याने पाणीसाठा सुरू झाला होता. जुलै महिन्यापासून सर्वाधिक पाणीसाठा होत गेला. यंदा मात्र मान्सून पुढे जाईल, असे संकेत आहेत. त्यामुळे चिंतेचे ढग आहेत. प्राप्त पाणी जपून वापरण्याची गरज आहे. २०१६ सालात लातूर शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणlaturलातूर