शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

मांजरा प्रकल्पावरील १८ पाणीपुरवठा योजनांसाठी महिन्याला लागते दोन दलघमी पाणी

By हणमंत गायकवाड | Updated: June 8, 2023 18:06 IST

मान्सून रखडल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज

लातूर :लातूर शहरासह मांजरा प्रकल्पावर एकूण १८ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यात अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब, शिराढोण, मुरुड, येडेश्वरी शुगर, गंगा शुगर, नायगाव, आवाड शिरपुरा, धनेगाव, करजगाव, कोथळा, युसुफवडगाव आणि केज-धारूर बारा गावे पाणीपुरवठा योजना आदी गावांचा समावेश आहे. या सर्व गावांसाठी एकूण दोन दलघमी पाणी महिन्याला लागते. सद्यस्थितीत मान्सूनचा विचार करता, उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.

मांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत २४ % म्हणजे ४२ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. मृत पाणीसाठा ४७ % असून, वर्षभराच्या लागणाऱ्या पाण्याचे नियोजन केले असता, २५ दलघमी लागणार आहे. धरणात ४२ दलघमी पाणीसाठा जिवंत आहे. पुढल्या पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पाणी पुरवू शकते. परंतु पावसाळा लांबणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मान्सून रखडला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा विचार करता पाण्याचे नियोजन धरण प्रशासनाकडून करण्यात आले असून, काटकसरीने वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सध्या शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. आतापर्यंत उन्हाळ्यात तीन रोटेशन झाले आहेत. रोटेशनचे टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आता पिण्यासाठीच उपलब्ध पाणी साठ्याचा वापर होणार आहे.

कोणत्या योजनेला किती लागते महिन्याला पाणी....!लातूर शहराला १.५ दलघमी, अंबाजोगाई ०.३ दलघमी, लातूर एमआयडीसी ३५ दलघमी, केज ०.०५ दलघमी, कळंब १० दलघमी असा एकूण १८ पाणीपुरवठा योजनांसाठी महिन्याला दोन दलघमी पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो.

महिन्याला ७० लाखांची पाणीपट्टी...मांजरा प्रकल्पातून लातूर शहरासह एकूण १८ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यासाठी महिन्याला ६० ते ७० लाखांची पाणीपट्टी आकारली जाते. परंतु वसुलीसंबंधित एजन्सीकडून नगण्य आहे. वसुलीला प्रतिसाद नाही. एकट्या लातूर महानगरपालिकेकडे थकबाकी २४ कोटींची आहे. अंबाजोगाई शहराकडे चार आणि लातूर एमआयडीसीकडे चालू थकबाकी सहा कोटींची असल्याचे शाखा अभियंता सूरज निकम यांनी सांगितले.

पाणीपट्टी वसुलीला अत्यल्प प्रतिसाद...।पाणीपट्टी वसुलीची मोहीम कडक राबविली जात नसल्यामुळे संबंधित संस्थांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टीची थकबाकी आहे. मोठ्या गावाकडे लाखोंची थकबाकी आहे. त्यांनी पाणीपट्टी वसुलीला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

अभूतपूर्व पाणी टंचाई लक्षात ठेवा...गतवर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडला होता. एक जूनपासूनच धरणामध्ये नव्याने पाणीसाठा सुरू झाला होता. जुलै महिन्यापासून सर्वाधिक पाणीसाठा होत गेला. यंदा मात्र मान्सून पुढे जाईल, असे संकेत आहेत. त्यामुळे चिंतेचे ढग आहेत. प्राप्त पाणी जपून वापरण्याची गरज आहे. २०१६ सालात लातूर शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणlaturलातूर