शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

मांजरा प्रकल्पावरील १८ पाणीपुरवठा योजनांसाठी महिन्याला लागते दोन दलघमी पाणी

By हणमंत गायकवाड | Updated: June 8, 2023 18:06 IST

मान्सून रखडल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज

लातूर :लातूर शहरासह मांजरा प्रकल्पावर एकूण १८ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यात अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब, शिराढोण, मुरुड, येडेश्वरी शुगर, गंगा शुगर, नायगाव, आवाड शिरपुरा, धनेगाव, करजगाव, कोथळा, युसुफवडगाव आणि केज-धारूर बारा गावे पाणीपुरवठा योजना आदी गावांचा समावेश आहे. या सर्व गावांसाठी एकूण दोन दलघमी पाणी महिन्याला लागते. सद्यस्थितीत मान्सूनचा विचार करता, उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.

मांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत २४ % म्हणजे ४२ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. मृत पाणीसाठा ४७ % असून, वर्षभराच्या लागणाऱ्या पाण्याचे नियोजन केले असता, २५ दलघमी लागणार आहे. धरणात ४२ दलघमी पाणीसाठा जिवंत आहे. पुढल्या पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पाणी पुरवू शकते. परंतु पावसाळा लांबणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मान्सून रखडला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा विचार करता पाण्याचे नियोजन धरण प्रशासनाकडून करण्यात आले असून, काटकसरीने वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सध्या शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. आतापर्यंत उन्हाळ्यात तीन रोटेशन झाले आहेत. रोटेशनचे टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आता पिण्यासाठीच उपलब्ध पाणी साठ्याचा वापर होणार आहे.

कोणत्या योजनेला किती लागते महिन्याला पाणी....!लातूर शहराला १.५ दलघमी, अंबाजोगाई ०.३ दलघमी, लातूर एमआयडीसी ३५ दलघमी, केज ०.०५ दलघमी, कळंब १० दलघमी असा एकूण १८ पाणीपुरवठा योजनांसाठी महिन्याला दोन दलघमी पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो.

महिन्याला ७० लाखांची पाणीपट्टी...मांजरा प्रकल्पातून लातूर शहरासह एकूण १८ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यासाठी महिन्याला ६० ते ७० लाखांची पाणीपट्टी आकारली जाते. परंतु वसुलीसंबंधित एजन्सीकडून नगण्य आहे. वसुलीला प्रतिसाद नाही. एकट्या लातूर महानगरपालिकेकडे थकबाकी २४ कोटींची आहे. अंबाजोगाई शहराकडे चार आणि लातूर एमआयडीसीकडे चालू थकबाकी सहा कोटींची असल्याचे शाखा अभियंता सूरज निकम यांनी सांगितले.

पाणीपट्टी वसुलीला अत्यल्प प्रतिसाद...।पाणीपट्टी वसुलीची मोहीम कडक राबविली जात नसल्यामुळे संबंधित संस्थांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टीची थकबाकी आहे. मोठ्या गावाकडे लाखोंची थकबाकी आहे. त्यांनी पाणीपट्टी वसुलीला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

अभूतपूर्व पाणी टंचाई लक्षात ठेवा...गतवर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडला होता. एक जूनपासूनच धरणामध्ये नव्याने पाणीसाठा सुरू झाला होता. जुलै महिन्यापासून सर्वाधिक पाणीसाठा होत गेला. यंदा मात्र मान्सून पुढे जाईल, असे संकेत आहेत. त्यामुळे चिंतेचे ढग आहेत. प्राप्त पाणी जपून वापरण्याची गरज आहे. २०१६ सालात लातूर शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणlaturलातूर