शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

१४ हजार ६५६ व्यक्तींना केले आत्महत्येपासून परावृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST

लातूर : ताण- तणाव, नैराश्य, चिंता, व्यसनाधिनतेमुळे मानसिक आघात होऊन आपली जीवनयात्रा संपविण्याच्या विचारात असलेल्यांची प्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष भेट ...

लातूर : ताण- तणाव, नैराश्य, चिंता, व्यसनाधिनतेमुळे मानसिक आघात होऊन आपली जीवनयात्रा संपविण्याच्या विचारात असलेल्यांची प्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर देत मानसिक स्वास्थ सुधारण्यात आले आहे. त्यामुळे अडीच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील १४ हजार ६५६ जण आत्महत्येपासून परावृत्त झाले आहेत.

लातूर जिल्ह्यात नेहमी नैसर्गिक संकट कोसळते. त्यामुळे शेतकऱ्यांत नैराश्य निर्माण होते. या नैराश्यातून काही शेतकरी दूर होतात; मात्र काही जण आपली जीवनयात्रा संपवितात. हे दुष्टचक्र रोखण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सन २०१५ पासून प्रेरणा प्रकल्प सुरू केला आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्याबरोबरच औषधोपचार देण्यात येतात, तसेच वर्षभरातून दोनदा आशा स्वयंसेविकामार्फत गृहभेटी देऊन समुपदेशन करण्यात येत आहे.

सन २०१९-२० मध्ये जिल्ह्यात ७०, सन २०२०- २१ मध्ये ४५ तर चालू वर्षातील पाच महिन्यांत १२ शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले आहे. दरम्यान, या प्रेरणा प्रकल्पांतर्गत सदरील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची व त्यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन समुपदेशन करण्यात आले, तसेच औषधोपचार देण्यात आले. त्यामुळे सन २०१९- २० मध्ये ३ हजार ८५२, २०२०- २१ मध्ये १० हजार ५४२ तर चालू वर्षात २६२ जण आत्महत्येपासून परावृत्त झाले आहेत.

नैराश्यावेळी मानसिक आधार गरजेचा...

राष्ट्रीय गुन्हे अभिलेख संस्थेने सन २००४- १४ या कालावधीत दरवर्षी एक लाख जणांनी आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे. आत्महत्येचे दूरगामी परिणाम कुटुंब, मित्र, समाजावर होतात. तणावपूर्ण जीवनशैली, वाढती स्पर्धा, अपेक्षांचे ओझे, एकत्रित कुटुंबाची मोडतोड अशा कारणांमुळे मानसिक आधार मिळत नाही. त्यामुळे नैराश्य निर्माण होते. मनातील नकारात्मकतेची भावना टोकास जाते, तेव्हा आत्महत्या केली जाते. नैराश्य आल्यानंतर त्याचे नातेवाइकांना संकेत दिले जातात. अशावेळी मनमोकळा संवाद साधणे आवश्यक असते, तसेच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला व समुपदेशन घेतल्यास आत्महत्येसारख्या घटना रोखता येऊ शकतात.

- डॉ. आशिष चेपुरे, मनोविकार तज्ज्ञ, विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.