शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

१४ हजार ६५६ व्यक्तींना केले आत्महत्येपासून परावृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST

लातूर : ताण- तणाव, नैराश्य, चिंता, व्यसनाधिनतेमुळे मानसिक आघात होऊन आपली जीवनयात्रा संपविण्याच्या विचारात असलेल्यांची प्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष भेट ...

लातूर : ताण- तणाव, नैराश्य, चिंता, व्यसनाधिनतेमुळे मानसिक आघात होऊन आपली जीवनयात्रा संपविण्याच्या विचारात असलेल्यांची प्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर देत मानसिक स्वास्थ सुधारण्यात आले आहे. त्यामुळे अडीच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील १४ हजार ६५६ जण आत्महत्येपासून परावृत्त झाले आहेत.

लातूर जिल्ह्यात नेहमी नैसर्गिक संकट कोसळते. त्यामुळे शेतकऱ्यांत नैराश्य निर्माण होते. या नैराश्यातून काही शेतकरी दूर होतात; मात्र काही जण आपली जीवनयात्रा संपवितात. हे दुष्टचक्र रोखण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सन २०१५ पासून प्रेरणा प्रकल्प सुरू केला आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्याबरोबरच औषधोपचार देण्यात येतात, तसेच वर्षभरातून दोनदा आशा स्वयंसेविकामार्फत गृहभेटी देऊन समुपदेशन करण्यात येत आहे.

सन २०१९-२० मध्ये जिल्ह्यात ७०, सन २०२०- २१ मध्ये ४५ तर चालू वर्षातील पाच महिन्यांत १२ शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले आहे. दरम्यान, या प्रेरणा प्रकल्पांतर्गत सदरील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची व त्यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन समुपदेशन करण्यात आले, तसेच औषधोपचार देण्यात आले. त्यामुळे सन २०१९- २० मध्ये ३ हजार ८५२, २०२०- २१ मध्ये १० हजार ५४२ तर चालू वर्षात २६२ जण आत्महत्येपासून परावृत्त झाले आहेत.

नैराश्यावेळी मानसिक आधार गरजेचा...

राष्ट्रीय गुन्हे अभिलेख संस्थेने सन २००४- १४ या कालावधीत दरवर्षी एक लाख जणांनी आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे. आत्महत्येचे दूरगामी परिणाम कुटुंब, मित्र, समाजावर होतात. तणावपूर्ण जीवनशैली, वाढती स्पर्धा, अपेक्षांचे ओझे, एकत्रित कुटुंबाची मोडतोड अशा कारणांमुळे मानसिक आधार मिळत नाही. त्यामुळे नैराश्य निर्माण होते. मनातील नकारात्मकतेची भावना टोकास जाते, तेव्हा आत्महत्या केली जाते. नैराश्य आल्यानंतर त्याचे नातेवाइकांना संकेत दिले जातात. अशावेळी मनमोकळा संवाद साधणे आवश्यक असते, तसेच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला व समुपदेशन घेतल्यास आत्महत्येसारख्या घटना रोखता येऊ शकतात.

- डॉ. आशिष चेपुरे, मनोविकार तज्ज्ञ, विभागप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.