शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

जळकोटातील २५ हजारांपैकी १२० मजुरांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST

जळकोट : तालुक्यात मजुरांची संख्या जवळपास २५ हजार असली तरी सध्या प्रशासनाच्या वतीने केवळ १२ कामे सुरू असून, त्यावर ...

जळकोट : तालुक्यात मजुरांची संख्या जवळपास २५ हजार असली तरी सध्या प्रशासनाच्या वतीने केवळ १२ कामे सुरू असून, त्यावर १२० मजूर आहेत. बहुतांश मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने मजुरांचे शहरांकडे स्थलांतर होत असल्याचे दिसून येत आहे.

जळकोट तालुका हा डोंगरी व माळरानाचा म्हणून ओळखला जातो. तालुक्यात केवळ खरीप हंगाम घेतला जातो. सिंचनाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने शेतकरी शेतीबरोबर पशुपालन व्यवसाय करीत आहेत. तसेच तालुक्यात वाड्यातांड्यांची संख्या अधिक असून, ऊसतोड कामगारांची संख्याही जास्त आहे. दरम्यान, तालुक्यात एकूण मजूर जवळपास २५ हजार असून, त्याची महसूल प्रशासनाकडे नोंद आहे.

दरम्यान, तहसील कार्यालयाकडून कामे कमी करून ती वनविभागाकडे देण्यात आली आहेत. मात्र, तालुक्यात वनविभागाच्या रोपवाटिका व इतर कामे कुठे सुरू आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे. पंचायत समितीकडून घरकूल, शोषखड्ड्यांसह अन्य १२ कामे सुरूर असून, त्यावर केवळ १२० मजूर काम करीत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तालुक्यातील मजूर मुंबई, पुणे, सोलापूर, निजामाबाद अशा मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होत असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील माळहिप्परगा, रावणकोळा, अतनूर, गव्हाण, चिंचोली, शिवाजीनगर तांडा, पोमा तांडा, फकरु तांडा, भवानीनगर तांडा, शेलदरा, वांजरवाडा, केकतशिंदगी, उमरगा रेतू, वडगाव, सोनवळा, मंगरूळ, लाळी खु., लाळी बु. आदी गावांमध्ये मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या तालुक्यात शेतीकामेही नाहीत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.

गावागावांत कामे उपलब्ध करा...

जळकोट तालुका हा खरिपाचा म्हणून ओळखला जातो. सध्या शेतीतही काही कामे नाहीत. त्यामुळे शासनाने रोहयोअंतर्गत तसेच वनविभाग, तहसील, कृषी कार्यालयामार्फत कामे सुरू करावीत. गाव तिथे मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे. मजुरांच्या मुलांचे शिक्षण मोफत करावे. मजुरांचे स्थलांतर थांबवावे, अशी मागणी हरिभाऊ राठोड, संजय हांडे, सुभाष भोसले, रमेश पारे, नागनाथ शेट्टी, अनिल गायकवाड, संग्राम कदम, माधव होनराव, प्रहार संघटनेचे अध्यक्ष संग्राम गायकवाड यांनी केली आहे.