शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. अध्यक्ष कॉंग्रेसचा की राष्ट्रवादीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:25 IST

विद्यमान अध्यक्ष बजरंग पाटील आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांना २ जानेवारी २०२१ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे ...

विद्यमान अध्यक्ष बजरंग पाटील आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांना २ जानेवारी २०२१ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये बेळगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही वर्षे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्याचा निर्णय झाल्याचे छातीठोकपणे काही सदस्य सांगत आहेत.

तर दुसरीकडे मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री असताना आपल्या कार्यकर्त्याला या पदावर बसवल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावा राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून केला जात आहे. त्यामुळे नेत्यांनी स्पष्ट केल्याशिवाय नेमके काय ठरले होते हे कळणे अशक्य आहे.

जर खरोखरच हे पद कॉंग्रेसकडे राहणार असेल तर सतेज पाटील आपल्या गटाकडेच हे पद ठेवणार हे उघड सत्य आहे. त्यामुळे सरिता खोत, अरुण सुतार, भगवान पाटील यांची नावेे चर्चेत आहेत. मात्र, वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या आणि पी. एन. पाटील गटाला संधी देण्याचे ठरले, तर पांडुरंग भांदिगरे यांचे नाव पुढे येऊ शकते. मात्र, जर अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला तर साहजिकच युवराज पाटील यांचे नाव अग्रभागी असेल, परंतु त्याच पदावर जयवंतराव शिंपी यांचाही दावा असेल. कॉंग्रेसकडे अध्यक्ष पद गेल्यास शाहूवाडी तालुक्यातील सदस्य विजय बोरगे यांनी उपाध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे. या दोन्ही पदांचा काय निर्णय होताे त्यावर उर्वरित सभापतींच्या राजीनाम्याचा निर्णय अपेक्षित आहे.

सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू असल्याने नेते आणि पदाधिकारीही त्यामध्ये गुंतले आहेत. मुदत संपण्यादिवशीच या दोघांचे राजीनामे घेतले जाणार की ग्रामपंचायत मतमोजणीनंतर ही प्रक्रिया सुरू होणार हेदेखील अजून निश्चित झालेले नाही.

चौकट

भगवान पाटील यांचा दाखला तयार

अध्यक्षपद हे इतर मागाससाठी आरक्षित असल्यामुळे गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी आपला दाखला तयार ठेवला आहे. इतर इच्छुकांना ‘गोकुळ’मध्ये संधी दिली जाणार असेल तर ऐनवेळी पाटील यांनी आपले नाव पुढे आल्यास अडचण नको म्हणून हा दाखला तयार ठेवला आहे. पुन्हा गगनबावडा तालुक्याला संधी दिली जाईल का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

चौकट

राजाराम कारखाना, ‘गोकुळ’चे संदर्भ

पालकमंत्री सतेज पाटील यांना राजाराम साखर कारखाना आणि ‘गोकुळ’ची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत ठेवण्यासाठी हे पद राष्ट्रवादीलाही दिले जाऊ शकेल असाही एक मतप्रवाह आहे. कसबा सांगाव येथील युवराज पाटील यांचा राजाराम साखर कारखाना कार्यक्षेत्रात चांगला संपर्क असल्याने मग त्यांना संधी दिली जाऊ शकेल.