शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जि.प. अध्यक्ष कॉंग्रेसचा की राष्ट्रवादीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:25 IST

विद्यमान अध्यक्ष बजरंग पाटील आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांना २ जानेवारी २०२१ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे ...

विद्यमान अध्यक्ष बजरंग पाटील आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांना २ जानेवारी २०२१ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये बेळगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही वर्षे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्याचा निर्णय झाल्याचे छातीठोकपणे काही सदस्य सांगत आहेत.

तर दुसरीकडे मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री असताना आपल्या कार्यकर्त्याला या पदावर बसवल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावा राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून केला जात आहे. त्यामुळे नेत्यांनी स्पष्ट केल्याशिवाय नेमके काय ठरले होते हे कळणे अशक्य आहे.

जर खरोखरच हे पद कॉंग्रेसकडे राहणार असेल तर सतेज पाटील आपल्या गटाकडेच हे पद ठेवणार हे उघड सत्य आहे. त्यामुळे सरिता खोत, अरुण सुतार, भगवान पाटील यांची नावेे चर्चेत आहेत. मात्र, वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या आणि पी. एन. पाटील गटाला संधी देण्याचे ठरले, तर पांडुरंग भांदिगरे यांचे नाव पुढे येऊ शकते. मात्र, जर अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला तर साहजिकच युवराज पाटील यांचे नाव अग्रभागी असेल, परंतु त्याच पदावर जयवंतराव शिंपी यांचाही दावा असेल. कॉंग्रेसकडे अध्यक्ष पद गेल्यास शाहूवाडी तालुक्यातील सदस्य विजय बोरगे यांनी उपाध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे. या दोन्ही पदांचा काय निर्णय होताे त्यावर उर्वरित सभापतींच्या राजीनाम्याचा निर्णय अपेक्षित आहे.

सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू असल्याने नेते आणि पदाधिकारीही त्यामध्ये गुंतले आहेत. मुदत संपण्यादिवशीच या दोघांचे राजीनामे घेतले जाणार की ग्रामपंचायत मतमोजणीनंतर ही प्रक्रिया सुरू होणार हेदेखील अजून निश्चित झालेले नाही.

चौकट

भगवान पाटील यांचा दाखला तयार

अध्यक्षपद हे इतर मागाससाठी आरक्षित असल्यामुळे गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी आपला दाखला तयार ठेवला आहे. इतर इच्छुकांना ‘गोकुळ’मध्ये संधी दिली जाणार असेल तर ऐनवेळी पाटील यांनी आपले नाव पुढे आल्यास अडचण नको म्हणून हा दाखला तयार ठेवला आहे. पुन्हा गगनबावडा तालुक्याला संधी दिली जाईल का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

चौकट

राजाराम कारखाना, ‘गोकुळ’चे संदर्भ

पालकमंत्री सतेज पाटील यांना राजाराम साखर कारखाना आणि ‘गोकुळ’ची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत ठेवण्यासाठी हे पद राष्ट्रवादीलाही दिले जाऊ शकेल असाही एक मतप्रवाह आहे. कसबा सांगाव येथील युवराज पाटील यांचा राजाराम साखर कारखाना कार्यक्षेत्रात चांगला संपर्क असल्याने मग त्यांना संधी दिली जाऊ शकेल.