शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नोकरीच्या आमिषाने युवकांची फसवणूक

By admin | Updated: September 25, 2016 01:22 IST

आजरा पोलिसांत गुन्हा : उत्तूर, गडहिंग्लज, राधानगरीच्या युवकांचा समावेश

उत्तूर : महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलव्यवस्थापन मंडळ पनवेल, महामंडळे, आदी ठिकाणी नोकरी लावतो म्हणून असंख्य युवकांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेऊन नोकरीचे आमिष दाखवले. मात्र, नोकरी न मिळाल्यामुळे फसगत झाल्याची तक्रार सुनील बाळू पोवार यांनी आजरा पोलिसांत दिली. याबाबतची अधिक माहिती अशी, पोवार व त्यांचे नातेवाईक रामदास गोविंद पाटील (रा. सुरुपली, ता. करवीर), उत्तम शिवाजी गुरव (रा. बेगवडे, ता. भुदरगड) यांना राजू भेंडे, संतोष विष्णू नाईक (रा. उत्तूर, ता. आजरा), मकबूल महमद अली नदाफ (झोंड गल्ली, गडहिंग्लज), संपत तुकाराम सनस (रा. केंजळ, ता. जावळी. जि. सातारा) यांनी महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलव्यवस्थापन मंडळ पनवेल व महामंडळात नोकरी लावतो म्हणून पैसे घेतले. तसेच बोगस आॅर्डर दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पनवेल येथे जलसंधारण खात्यात पंप आॅपरेटर, तर कऱ्हाड, सातारा येथे महामंडळात विविध खात्यात नोकरी लावतो म्हणून मोठ्या प्रमाणात नियुक्तीचे बोगस आदेश दिले. आदेश पाहून युवक नोकरीच्या ठिकाणी गेले असता आरोपीकडून वेगवेगळी उत्तरे येऊ लागली. गेली दोन वर्षे हे युवक नोकरीच्या प्रतीक्षेत होते. आरोपी पैसे परत देत नसल्याने व नोकरीची शाश्वती नसल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. सनस हा सातारा येथे बांधकाम विभागात नोकरीस आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सातारा, गडहिंग्लजकडे रवाना झाले आहे. यामध्ये नेमकी किती युवकांची फसगत झाली आहे, हे मात्र समजू शकले नाही. मात्र, हा आकडा फार मोठा आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र कदम, हवालदार शंकर कोळी, अनिल गाडीवड्ड , सुधाकर हुले करीत आहेत. प्रत्येकी पाच लाख ! गेली दोन वर्षे सरकारी नोकरीसाठी कर्ज काढून युवकांनी नोकरीसाठी पाच लाखांपासून पुढे पैसे दिले. मात्र, अद्याप नोकरी नाही. गडहिंग्लज, उत्तूर, राधानगरी, भुदरगड या परिसरातील युवकांचा यामध्ये समावेश आहे. नोकरीच्या जाळ्यात युवकांना ओडण्यासाठी एजंट, पोट एजंट यांची साखळी उत्तूर परिसरात असल्याचे बोलले जात आहे, अशा एजंटाचे धाबे दणाणले आहेत. फसगत झालेल्या युवकांना नेमणुकीचे आदेश बोगस दिल्याने कार्यालयात हजर करून घेतले नाही. आदेश पत्र एकच व नियुक्त्या सारख्याच त्यामुळे युवकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. थेट नियुक्ती नसल्याने फसगत झाल्याचे युवकांच्या लक्षात आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. अनेक युवक एजंट, पोट एजंट यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते. यातून लाखो रुपयांची माया एजंटांनी जमा केल्याचे समजते.