शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

यंदा मान्सून येणार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:22 IST

कोल्हापूर : महाराष्ट्रात मान्सूनचा पॅटर्न पूर्णपणे बदलला असून उशिरा येऊन नोव्हेंबर, डिसेंबर लांबण्याची गेल्या दोन वर्षांपासूनची परंपरा यावर्षीदेखील ...

कोल्हापूर : महाराष्ट्रात मान्सूनचा पॅटर्न पूर्णपणे बदलला असून उशिरा येऊन नोव्हेंबर, डिसेंबर लांबण्याची गेल्या दोन वर्षांपासूनची परंपरा यावर्षीदेखील कायम राखली जाणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी वर्तवला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवठ्यात मान्सून सक्रिय होणार असून तत्पूर्वी जून व जुलैमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असणार आहे. आताही राज्यात विशेषत: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात गारपीट वाढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने १ जूनला केरळमध्ये तर ८ जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल आणि सरासरीच्या १०३ टक्के बरसेल असा सुधारित अंदाज वर्तवला आहे. पण नेमका याला छेद देणारा अंदाज हवामान तज्ज्ञ प्रा. जोहरे यांनी वर्तवला आहे. जाेहरे हे सातत्याने बदलते वातावरण, अवकाळी, गारपीट या पावसाचा भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून सूक्ष्म अभ्यास करून निरीक्षणे नोंदवत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून ऑगस्टमध्येच सक्रिय झाला होता व १५ नोव्हेंबरपर्यंत लांबला होता. शिवाय त्यांनी गारपिटीचे वर्तवलेले अंदाजदेखील तंतोतंत खरे ठरले होते. यावर्षीदेखील त्यांनी असाच विदर्भ व कोकणात कमी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. यातही जून जुलैमध्ये पाऊस गडगडून येईल. ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत मान्सूनची तीव्रता जास्त राहणार आहे.

चौकट ०१

कोल्हापुरात गारपीट का?

कोल्हापुरात कधीही गारपीट नसे. वळीवात कधीतरी गारांचा पाऊस पडे; पण यावर्षी दोन महिन्याच्या अंतराने भुदरगडमधील धनगरवाडा व कागल तालुक्यातील चिकोत्रा खोऱ्यात मुख्यत: नंद्याळमध्ये प्रचंड गारा कोसळून रस्ते व शेते पांढरी शुभ्र बनली. याबाबत जोहरे यांनी ही तर सुरुवात आहे, येथून पुढे सवय करून घ्यावी लागेल, असे मत नोंदवले. वातावरण बदलामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात कुभोनिंब ढगांची निर्मिती जास्त प्रमाणात झाली असून येथून पुढे सातत्याने गारपिटीचा सामना करावा लागणार आहे.

चौकट ०२

गारपीट का होते?

बाष्पीभवन वाढल्याचा हा परिणाम आहे. वातावरणात आर्द्रता वाढली असून जमिनीपासून दोन ते १५ किलोमीटर उंचीवर कुभोनिंब ढगांची निर्मिती वाढली आहे. हे ढग वाढण्यामागे कमी झालेली झाडे हे एक महत्त्वाचे कारण आहे. उद्योगधंद्याच्या उत्सर्जनामुळे बाष्पीभवनाची तीव्रता कमी होते, पण सध्या लॉकडाऊनमुळे तेही कमी असल्याने बाष्पीभवन, अभिसरण वाढण्याला चांगलाच हातभार लागला असून उत्सर्जन वाढून त्याचे रूपांतर गारांमध्ये होत असल्याचे निरीक्षणही जोहरे नोंदवतात.

चौकट ०३

पीक पॅटर्न बदलावा लागणार

मान्सून ऑगस्टमध्ये सुरू होऊन तो नोव्हेबर, डिसेंबरपर्यंत लांबेल, असा अंदाज असल्याने पीक पॅटर्नमध्येही आता बदल करावा लागणार असल्याचे जाेहरे सांगतात. पेरणी जूनऐवजी जुलैमध्ये करावी लागणार आहे. पाऊस दोन महिने पुढे सरकला असल्याने त्या अनुषंगाने पीक प्रकार व पेरणी पद्धत निवडावी लागणार आहे.