प्रकाश पाटील -- कोपार्डे --शुगर केन कंट्रोल आॅर्डर १९६६ कलम ब (३) नुसार एफआरपीप्रमाणे दर देणे कायद्याने कारखान्यांवर बंधनकारक आहे. हंगाम २०१४-१५ च्या साखर उताऱ्यावर हंगाम २०१५/१६ च्या हंगामातील ऊसदर द्यावा लागणार आहे. मागील हंगामातील साखर उताऱ्यानुसार व एफआरपीतील प्रतिक्विंटल वाढीनुसार जिल्ह्यातील साखर कारखान्यांना द्याव्या लागणाऱ्या एफआरपीच्या टक्क्यात वाढ झाल्याने शुगर लॉबीत अस्वस्थता पसरली आहे.केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने हंगाम २०१५-१६ च्या हंगामातील उसासाठी उचित व लाभकारी मूल्यात (एफआरपीने) केवळ १०० रुपये प्रतिटन वाढ केली असून, पहिल्या ९.५ टक्के उताऱ्यासाठी २३०० रुपये प्रतिटन ऊसदर जाहीर करण्यात आला आहे. ९.५ टक्क्यांच्या पुढील प्रति एक टक्का उताऱ्यासाठी २४२ रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. यातून पुन्हा तोडणी वाहतूक किमान ५०० रुपये वजा करण्यात येते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम २०१४-१५ मधील साखर उतारा पाहिल्यास तो १२ टक्क्यांपासून १३.३० टक्के इतका आहे. यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना किमान २५०० ते २७३० रुपयांप्रमाणे एफआरपी ऊस तोडणी व वाहतूक वजा जाता बसणार आहे. साखरेच्या दरात झालेली घसरण, साखरेचा शिल्लक साठा यामुळे २०१४-१५ च्या हंगामातील शेतकऱ्यांची थकीत रक्कम केंद्र शासनाच्या सॉफ्ट लोनमधून भागविताना कारखानदारांची मोठी दमछाक झाली आहे. हंगाम २०१५-१६ साठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना प्रतिटनप्रमाणे बसणारी एफआरपी (यातून तोडणी-वाहतूक खर्च वजा केलेला नाही)कारखान्याचे हंगाम त्यानुसार बसणारी नाव२०१४-१५ चा हंगाम २०१५-१६साखर उताराएफआरपी (रु.)वारणा साखर कारखाना१२.५१३०२८.४२पंचगंगा इचलकरंजी१३.०३३१५४.२६कुंभी-कासारी, कुडित्रे१३.०३३१५४.२६बिद्री१३.०४३१५६.६८भोगावती१२.५५३०३८.१०दत्तशिरोळ१२.४४३०११.४८गडहिंग्लज हरळी१२.१५२९४१.३०शाहू-कागल१२.६६३०६४.७२जवाहर, हुपरी१२.४४३०११.४८छ.राजाराम, बावडा११.९९२८८०.४०आजरा शेतकरी१२.५०३०९८.६०उदय गायकवाड, बांबवडे१२.५१३०२८.४२मंडलिक हमिदवाडा१२.९४३१३२.४८शरद, नरंदे१२.९१३१२५.२२डी. वाय. पाटील, पळसंबे१२.२५२९६३.०८दत्त दालमिया, आसुर्ले१३.३४३२२९.२८गुरुदत्त, टाकळी१३.२२३२००.२४इको केन१२.४३३००९.०६हेमरस१३.३३३२२६.८६महाडिक शुगर्स१२.४२३००६.६४सेनापती संताजी१२.९२३१२८.६४
जिल्ह्यातील ‘एफआरपी’च्या टक्क्यांत यंदा वाढ
By admin | Updated: September 26, 2015 00:18 IST