शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

'बड्या' थकबाकी वसुलीविनाच वर्ष सरले

By admin | Updated: April 8, 2015 00:35 IST

जिल्हा बँक : न्यायालयीन प्रक्रियेमुळे अडचण; व्यवस्थापन खर्च मात्र आवाक्यात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या २०१४-१५ या आर्थिक वर्षात बड्या टॉप टेन थकबाकीदारांकडून एक रुपयाचीही वसुली झालेली नाही. ही वसुली न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने बॅँकेला वसुलीबाबत काहीच हातपाय हलविता आले नाहीत. ‘एन. पी. ए.’ तरतुदीमधील वसुली न झाल्याने बॅँकेचा संचित तोटा १०० कोटींवर आहे. यावर्षी बॅँकेला २५२ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. बड्या थकबाकीदारांमुळे जिल्हा बॅँक अडचणीत आली. गेल्या पाच वर्षांत प्रशासकांनी दत्त-आसुर्ले साखर कारखान्याची वसुली करून बॅँकेला अतिदक्षता विभागातून बाहेर काढले; पण बॅँक अजूनही सदृढ झालेली नाही. गेल्या वर्षभरात बॅँकेच्या प्रशासनाने वसुलीबरोबर व्यवहार वाढविण्यासाठी प्रयत्न केले. बॅँकेच्या ठेवी व कर्जे वाढली; पण वसुली झाली नाही. मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली होणे अपेक्षित होते. ती झाली नसल्याने बॅँक अजूनही रुळांवर येऊ शकलेली नाही. दौलत सहकारी साखर कारखान्याकडून ६० कोटी येणे आहे. कारखान्याचा ताबा न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने पेच निर्माण झाला होता. आता न्यायालयीन पेच सुटला, चालविण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली; पण हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, याबाबत साशंकता आहे. गायकवाड कारखाना चालविण्यास दिला, हंगाम संपला तरी बॅँकेचे पैसे आले नाहीत. तंबाखू समूह, मका स्टार्च, भुदरगड नागरी पतसंस्था अशा विविध संस्थांकडून वर्षभरात एक रुपयाची वसुली झालेली नाही. परिणामी बॅँकेचा एन. पी. ए. कमी झालाच नाही. या आर्थिक वर्षात बॅँकेला सुमारे २५२ कोटींची एन. पी. ए.ची तरतूद करावी लागणार आहे. रिझर्व्ह बॅँकेने मार्च २०१५ पर्यंत बॅँकेला सात टक्के सी. आर. ए. आर. पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. या आर्थिक वर्षात बॅँकेचा सी. आर. ए. आर. आठ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मार्च २०१७ पर्यंत तो नऊ टक्क्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. प्रशासकांनी प्रशासकीय खर्चाला कात्री लावल्याने हा खर्च तीन टक्क्यांपेक्षा खाली येऊ शकतो. भुदरगड नागरी पतसंस्थेकडे सुमारे १३ कोटींचे येणे बाकी आहे. पतसंस्थेच्या जागा विक्रीतील पैसे जमा आहेत; पण न्यायालयाच्या आदेशाशिवाय काहीच व्यवहार करता येत नसल्याने वसुली होऊ शकलेली नाही. यासाठी बॅँकेने सहकार आयुक्तांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. हे १३ कोटी वसूल झाले, तर बॅँकेचा संचित तोटा ९४ कोटींपर्यंत राहू शकतो, अन्यथा तो १०० कोटींच्या पुढे जाईल, असे समजते. बॅँक अजूनही सक्षम झालेली नाही, तोपर्यंत बॅँकेची निवडणूक लागल्याने येणाऱ्या संचालक मंडळासमोर आव्हानांचा डोंगर आहे. संचालकांनी आपली मानसिकता बदलून काम केले, तरच आगामी वर्ष-दोन वर्षांत बॅँक पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.(प्रतिनिधी)