शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

'बड्या' थकबाकी वसुलीविनाच वर्ष सरले

By admin | Updated: April 8, 2015 00:35 IST

जिल्हा बँक : न्यायालयीन प्रक्रियेमुळे अडचण; व्यवस्थापन खर्च मात्र आवाक्यात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या २०१४-१५ या आर्थिक वर्षात बड्या टॉप टेन थकबाकीदारांकडून एक रुपयाचीही वसुली झालेली नाही. ही वसुली न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने बॅँकेला वसुलीबाबत काहीच हातपाय हलविता आले नाहीत. ‘एन. पी. ए.’ तरतुदीमधील वसुली न झाल्याने बॅँकेचा संचित तोटा १०० कोटींवर आहे. यावर्षी बॅँकेला २५२ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. बड्या थकबाकीदारांमुळे जिल्हा बॅँक अडचणीत आली. गेल्या पाच वर्षांत प्रशासकांनी दत्त-आसुर्ले साखर कारखान्याची वसुली करून बॅँकेला अतिदक्षता विभागातून बाहेर काढले; पण बॅँक अजूनही सदृढ झालेली नाही. गेल्या वर्षभरात बॅँकेच्या प्रशासनाने वसुलीबरोबर व्यवहार वाढविण्यासाठी प्रयत्न केले. बॅँकेच्या ठेवी व कर्जे वाढली; पण वसुली झाली नाही. मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली होणे अपेक्षित होते. ती झाली नसल्याने बॅँक अजूनही रुळांवर येऊ शकलेली नाही. दौलत सहकारी साखर कारखान्याकडून ६० कोटी येणे आहे. कारखान्याचा ताबा न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने पेच निर्माण झाला होता. आता न्यायालयीन पेच सुटला, चालविण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली; पण हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, याबाबत साशंकता आहे. गायकवाड कारखाना चालविण्यास दिला, हंगाम संपला तरी बॅँकेचे पैसे आले नाहीत. तंबाखू समूह, मका स्टार्च, भुदरगड नागरी पतसंस्था अशा विविध संस्थांकडून वर्षभरात एक रुपयाची वसुली झालेली नाही. परिणामी बॅँकेचा एन. पी. ए. कमी झालाच नाही. या आर्थिक वर्षात बॅँकेला सुमारे २५२ कोटींची एन. पी. ए.ची तरतूद करावी लागणार आहे. रिझर्व्ह बॅँकेने मार्च २०१५ पर्यंत बॅँकेला सात टक्के सी. आर. ए. आर. पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. या आर्थिक वर्षात बॅँकेचा सी. आर. ए. आर. आठ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मार्च २०१७ पर्यंत तो नऊ टक्क्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. प्रशासकांनी प्रशासकीय खर्चाला कात्री लावल्याने हा खर्च तीन टक्क्यांपेक्षा खाली येऊ शकतो. भुदरगड नागरी पतसंस्थेकडे सुमारे १३ कोटींचे येणे बाकी आहे. पतसंस्थेच्या जागा विक्रीतील पैसे जमा आहेत; पण न्यायालयाच्या आदेशाशिवाय काहीच व्यवहार करता येत नसल्याने वसुली होऊ शकलेली नाही. यासाठी बॅँकेने सहकार आयुक्तांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. हे १३ कोटी वसूल झाले, तर बॅँकेचा संचित तोटा ९४ कोटींपर्यंत राहू शकतो, अन्यथा तो १०० कोटींच्या पुढे जाईल, असे समजते. बॅँक अजूनही सक्षम झालेली नाही, तोपर्यंत बॅँकेची निवडणूक लागल्याने येणाऱ्या संचालक मंडळासमोर आव्हानांचा डोंगर आहे. संचालकांनी आपली मानसिकता बदलून काम केले, तरच आगामी वर्ष-दोन वर्षांत बॅँक पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.(प्रतिनिधी)