शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
2
भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
3
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
6
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
7
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
8
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
9
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
10
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
11
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
12
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
13
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
14
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
15
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
16
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
17
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
18
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
19
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
20
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

'बड्या' थकबाकी वसुलीविनाच वर्ष सरले

By admin | Updated: April 8, 2015 00:35 IST

जिल्हा बँक : न्यायालयीन प्रक्रियेमुळे अडचण; व्यवस्थापन खर्च मात्र आवाक्यात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या २०१४-१५ या आर्थिक वर्षात बड्या टॉप टेन थकबाकीदारांकडून एक रुपयाचीही वसुली झालेली नाही. ही वसुली न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने बॅँकेला वसुलीबाबत काहीच हातपाय हलविता आले नाहीत. ‘एन. पी. ए.’ तरतुदीमधील वसुली न झाल्याने बॅँकेचा संचित तोटा १०० कोटींवर आहे. यावर्षी बॅँकेला २५२ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. बड्या थकबाकीदारांमुळे जिल्हा बॅँक अडचणीत आली. गेल्या पाच वर्षांत प्रशासकांनी दत्त-आसुर्ले साखर कारखान्याची वसुली करून बॅँकेला अतिदक्षता विभागातून बाहेर काढले; पण बॅँक अजूनही सदृढ झालेली नाही. गेल्या वर्षभरात बॅँकेच्या प्रशासनाने वसुलीबरोबर व्यवहार वाढविण्यासाठी प्रयत्न केले. बॅँकेच्या ठेवी व कर्जे वाढली; पण वसुली झाली नाही. मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली होणे अपेक्षित होते. ती झाली नसल्याने बॅँक अजूनही रुळांवर येऊ शकलेली नाही. दौलत सहकारी साखर कारखान्याकडून ६० कोटी येणे आहे. कारखान्याचा ताबा न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने पेच निर्माण झाला होता. आता न्यायालयीन पेच सुटला, चालविण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली; पण हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, याबाबत साशंकता आहे. गायकवाड कारखाना चालविण्यास दिला, हंगाम संपला तरी बॅँकेचे पैसे आले नाहीत. तंबाखू समूह, मका स्टार्च, भुदरगड नागरी पतसंस्था अशा विविध संस्थांकडून वर्षभरात एक रुपयाची वसुली झालेली नाही. परिणामी बॅँकेचा एन. पी. ए. कमी झालाच नाही. या आर्थिक वर्षात बॅँकेला सुमारे २५२ कोटींची एन. पी. ए.ची तरतूद करावी लागणार आहे. रिझर्व्ह बॅँकेने मार्च २०१५ पर्यंत बॅँकेला सात टक्के सी. आर. ए. आर. पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. या आर्थिक वर्षात बॅँकेचा सी. आर. ए. आर. आठ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मार्च २०१७ पर्यंत तो नऊ टक्क्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. प्रशासकांनी प्रशासकीय खर्चाला कात्री लावल्याने हा खर्च तीन टक्क्यांपेक्षा खाली येऊ शकतो. भुदरगड नागरी पतसंस्थेकडे सुमारे १३ कोटींचे येणे बाकी आहे. पतसंस्थेच्या जागा विक्रीतील पैसे जमा आहेत; पण न्यायालयाच्या आदेशाशिवाय काहीच व्यवहार करता येत नसल्याने वसुली होऊ शकलेली नाही. यासाठी बॅँकेने सहकार आयुक्तांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. हे १३ कोटी वसूल झाले, तर बॅँकेचा संचित तोटा ९४ कोटींपर्यंत राहू शकतो, अन्यथा तो १०० कोटींच्या पुढे जाईल, असे समजते. बॅँक अजूनही सक्षम झालेली नाही, तोपर्यंत बॅँकेची निवडणूक लागल्याने येणाऱ्या संचालक मंडळासमोर आव्हानांचा डोंगर आहे. संचालकांनी आपली मानसिकता बदलून काम केले, तरच आगामी वर्ष-दोन वर्षांत बॅँक पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.(प्रतिनिधी)