नूल : परकीयांना समजलेले यशवंतराव महाराष्ट्राला कधीच समजले नाहीत. त्यांच्याबद्दल अज्ञान पसरवणारे साहित्य आज उपलब्ध आहे. जगातल्या संकल्पना त्यांनी देशात आणल्या. समाजरचनेच्या भेदांमुळे ते पंतप्रधानपदापासून दूर राहिले, असे मत गोवा विद्यापीठाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. आनंद पाटील यांनी व्यक्त केले.नूल (ता. गडहिंग्लज) येथे पुष्पावती चौगुले विश्वस्त निधीतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राला माहीत नसलेला ‘महापुरुष : यशवंतराव चव्हाण’ या विषयावर ते बोलत होते. अनंत बांदेकर अध्यक्षस्थानी होते.विश्वस्त निधीतर्फे भि. आ. चौगुले आदर्श शिक्षक पुरस्कार अर्चना देसाई, दुंडाप्पा चौगुले, साथी पुरस्कार राम आपटे (बेळगाव), जिद्द पुरस्कार सुभाष सावंत, राधाबाई शिंदे आदर्श माता पुरस्कार प्रभावती चव्हाण, गुणीजन पुरस्कार शंकरराव नाईकवाडी, कर्मयोगी पुरस्कार शिवाजी घाटगे यांना प्रदान करण्यात आला. सुंदर हिरवी शाळा पुरस्कार खणदाळ प्राथमिक शाळेस देण्यात आला. दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू, काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी अॅड. आपटे, बांदेकर, अर्चना देसाई, वसुधा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. श्रीपतराव शिंदे, सुरेश शिपूरकर, जयवंत शिंपी, विलास बागी, प्र. कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण, बी. एन. पाटील. शि. नी. हंचनाळे, विनोद नाईकवाडी, जयसिंग चव्हाण, श्रीरंग चौगुले, नागेश चौगुले, मोहन यादव, एस. डी. जाधव, व्ही. एस. कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
यशवंतराव महाराष्ट्राला समजले नाहीत
By admin | Updated: December 16, 2014 23:52 IST