शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

विश्वविजेती नेमबाज ‘राही’ चार वर्षे पगारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST

कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबत हिने काॅमनवेल्थ, जागतिक विश्वचषक नेमबाजी स्पर्धा, आशियाई नेमबाजी स्पर्धा आदींमध्ये सुवर्णपदक पटकावित भारताचा झेंडा जगभरात ...

कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबत हिने काॅमनवेल्थ, जागतिक विश्वचषक नेमबाजी स्पर्धा, आशियाई नेमबाजी स्पर्धा आदींमध्ये सुवर्णपदक पटकावित भारताचा झेंडा जगभरात फडकाविला आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेत ऑगस्ट २०१६ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून राहीला उपजिल्हाधिकारी म्हणून थेट नेमणूक दिली. सेवा काळात परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करणे अधिकारी कर्मचाऱ्यांना बंधनकारक असते. त्याला राही ही अपवाद ठरली नाही. तिचा हा कालावधी २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तिच्या सातत्यापूर्ण स्पर्धा आणि त्यासाठी लागणाऱ्या सरावासाठी तिला भारतीय नेमबाजी फेडरेशनने आयोजित केलेले सराव शिबिर आणि परदेशात सातत्याने होणाऱ्या स्पर्धेत सहभागी व्हावे लागले. त्यात तिने अत्युच्च कामगिरी करीत सुवर्णपदकाची लयलूट केली. या कालावधीत तिला हा परिविक्षाधीन कालावधी तिला पूर्ण करता आला नाही. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार हा कालावधी पूर्ण न केल्याबद्दल तिचा पगार रोखण्यात आला. ही बाब तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालण्यात आली. त्यानंतर तिला हा कालावधी वाढवून मिळाला. त्यानंतर तिचा हा कालावधी विभागीय आयुक्तांनी वाढवून दिला. पुन्हा तिच्या व्यस्त स्पर्धा, सरावामधून वाढवून दिलेला कालावधीही तिला पूर्ण करता आला नाही. त्यानंतर ही २०२० मध्ये तिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालावधी वाढवून दिला. जागतिक विश्वचषक स्पर्धा गाजवित असली तरी पगार मिळणे गरजेचे आहे, असे मत क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

जमिनीवर पाय असलेली सुवर्णकन्या

एखाद्या खेळाडूने जर इतकी पदके मिळवून देशाचा झेंडा अटकेपार केल्यानंतर त्याच्या वागण्यात आणि स्वभावात फरक पडतो. मात्र, राही या सर्वाला अपवाद ठरली आहे. विशेष म्हणजे हा कालावधी मला सरकारने माफ करू नये, हा मी पूर्ण करणार आहे. कामाचा अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. या परिविक्षाधीन कालावधीमधून सूट नको आहे. कारण भविष्यात मला ही नोकरी करून बढतीही मिळवायची आहे. त्याकरीता अनुभवही महत्त्वाचा आहे. असेही ती याबाबत बोलताना आवर्जुन सांगते.

(राही सरनोबतचा संग्रहीत फोटो वापरणे)