शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

कागणी ते कालकुंद्री रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:22 IST

चंदगड : वर्षभरापूर्वी अनेक आंदोलने करून कागणी ते कालकुंद्री या दोन कि.मी. रस्त्याचे काम ग्रामस्थांनी सुरू करायला लावले ...

चंदगड : वर्षभरापूर्वी अनेक आंदोलने करून कागणी ते कालकुंद्री या दोन कि.मी. रस्त्याचे काम ग्रामस्थांनी सुरू करायला लावले होते. मात्र, ठेकेदाराने फक्त खडीकरण (बीबीएम) केले आहे. वर्ष उलटले तरी त्यावर डांबरीकरणाचा पत्ता नाही. ठेकेदाराने केलेले खडीकरण पूर्णत: उखडून गेले आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कालकुंद्री, कागणी परिसरातील ग्रामस्थांनी याप्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे. चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कागणी ते कालकुंद्री हा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा रस्ता दोन वर्षांपासून डांबरीकरणाअभावी रखडला आहे.

गडहिंग्लज, आजरा ते बेळगाव मुख्य मार्गाला कुदनूर, राजगोळी, दड्डी ते हत्तरगी येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. १५ वर्षे दुरवस्थेत असलेल्या या रस्त्याप्रश्नी शिवसेनेसह विविध संघटनांनी अनेकदा आंदोलने केल्यानंतर बांधकाम विभागाने नवीन पद्धतीने हा रस्ता डिसेंबर २०१८ मध्ये केला होता. २०१९ मधील अतिवृष्टी व पुरात बांधकाम विभागाच्या नव्या ‘मेथड’सह रस्त्याचाही फज्जा उडाला. पुन्हा आंदोलनानंतर नव्याने रस्त्याचे काम सुरू झाले. गेल्या मार्च महिन्यात खडीकरण व बीबीएमनंतर डांबरीकरण रखडले आहे. तेही उखडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

दोन दिवसांत साखर कारखाना हंगाम संपल्यानंतर ऊस वाहतूक थांबून कामातील अडथळेही कमी होतील. त्यामुळे संबंधित विभागाने २० मार्चपूर्वी डांबरीकरण व साईड पट्टयांचे काम सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

-----------------------

* फोटो ओळी : कागणी ते कालकुंद्री (ता. चंदगड) दरम्यानच्या रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे.

क्रमांक : १४०२२०२१-गड-०४