शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

बस्तवडे बंधाऱ्याचे काम दोन वर्षांनंतर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:21 IST

म्हाकवे : कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील अंतिम टप्प्यात आलेल्या बस्तवडे-आणूरदरम्यान पुलाचे काम दोन वर्षांपासून बंद होते. पुलासाठी जमिनी संपादित ...

म्हाकवे

: कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील अंतिम टप्प्यात आलेल्या बस्तवडे-आणूरदरम्यान पुलाचे काम दोन वर्षांपासून बंद होते. पुलासाठी जमिनी संपादित करताना संबंधित शेतकऱ्यांशी भरपाईबाबत चर्चा, प्राथमिक बैठक, नोटीस अशी कोणतीही रीतसर कार्यवाही न करता त्यांना थेट अंतिम मूल्यांकनाच्या नोटिसा दिल्या. काहींच्या जमिनी बागायती असतानाही जिरायत दाखविली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले होते. भरपाईसंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत भरावाचे काम सुरू केले आहे. या पुलासाठी सुमारे दहा कोटींचा निधी मंजूर आहे.

१० जानेवारी २०१७ रोजी १०० मीटर लांब आणि साडेसात मीटर रुंदीचा पावसाळ्यातील वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन या पुलाचे काम सुरू केले. अत्याधुनिक यंत्रणा असल्यामुळे दीड-दोन वर्षांत हा पूल पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती.

गतवर्षी हा पूल उभारून दोन्ही बाजूला नळे टाकून भरावाचेही काही प्रमाणात काम झाले; परंतु दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी बंद पाडले होते.

चौकट

आणूरमधील १२ तर बस्तवडेमधील १५ शेतकऱ्यांचे नुकसान होते. काहीना भरपाई मिळाली; परंतु बागायती जमिनीच्या बांधाला बांध असणाऱ्या जमिनी जिरायती दाखवून भरपाईची रक्कम निम्म्यावर आणली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी ही भरपाई स्वीकारलेली नसल्याचे सचिन चौगुले व सुरेश चौगुले यांनी सांगितले.

२५ बस्तवडे पूल फोटो : आणूर-बस्तवडेदरम्यान वेदगंगा नदीवरील रखडलेल्या पुलानजीक भरावाचे सुरू असणारे काम.

(छाया : दत्तात्रय पाटील, म्हाकवे)