शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

दु:ख बाजूला सारून कवितेत पेरले शब्द, कवितेतून व्यक्त झाल्या कवयित्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सर्व दु:ख बाजूला सारून आपल्या जगण्यात कवितेतून स्त्रीने सहजपणे शब्द पेरले आहेत. जर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सर्व दु:ख बाजूला सारून आपल्या जगण्यात कवितेतून स्त्रीने सहजपणे शब्द पेरले आहेत. जर संवेदनशून्यता आपल्या जीवनात आली तर आपण संवेदनशीलपणे जगू शकणार नाही, यामुळेच स्त्रियांनी माणूस उभा करण्यासाठी पुरेसे लेखन केलेले आहे हे मान्य करावे लागेल, असे मत ज्येष्ठ साहित्यिक कमल हर्डीकर यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कविसंमेलनात ज्येष्ठ साहित्यिक कमल हर्डीकर यांच्या हस्ते परिसरातील कवयित्रींना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक सभेच्या उपाध्यक्ष गौरी भोगले यांनी केले. सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे दमसाने प्रकाशित केलेले ग्रंथ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी झालेल्या कविसंमेलनात नीलांबरी कुलकर्णी, मंजूश्री गोखले, डॉ. प्रमिला जरग, कालिंदी कुलकर्णी, डॉ. प्रिया आमोद, सुजाता पेंडसे, डॉ. इला माटे, पूजा दिवाण, गौरी भोगले यांनी कवितांचे सादरीकरण केले. या कविसंमेलनात या कवयित्री व्यक्त झाल्या. स्वातंत्र्याचा, अत्याचाराचा, मानवतेच्या अपेक्षांचा, माणूस म्हणून जगू देण्याचा प्रश्न आहे. मनासारखे जगावे, असे वाटते, तरीही मनासारखे जगता येत नाही अशी खंत या कवयित्रींनी आपल्या कवितांमधून व्यक्त केली.

सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. नीला जोशी, सविता नाबर, खलील मोमीन, विक्रम राजवर्धन, रामहरी वरकले यांची उपस्थिती होती.

-------------------------------

फोटो : ०९०३२०२१-कोल-साहित्य सभा

फोटो ओळ : जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने आयोजित कविसंमेलनात ज्येष्ठ साहित्यिक कमल हर्डीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गौरी भोगले, डॉ. विनोद कांबळे उपस्थित हाेते.

(संदीप आडनाईक)

===Photopath===

090321\09kol_3_09032021_5.jpg

===Caption===

फोटो : ०९०३२०२१-कोल-साहित्य सभाफोटो ओळ : जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने आयोजित कविसंमेलनात ज्येष्ठ साहित्यिक कमल हर्डीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गौरी भोगले, डॉ. विनोद कांबळे उपस्थित हाेते.