शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

भाषणामधील ‘गोकुळ’शब्द झाला दूध व्यवसायातील ब्रँड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST

कोल्हापूर : एखाद्या संस्थेचे नाव वेगळे असते आणि त्या संस्थेच्या उत्पादनांचा ब्रँड वेगळा होतो. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा ...

कोल्हापूर : एखाद्या संस्थेचे नाव वेगळे असते आणि त्या संस्थेच्या उत्पादनांचा ब्रँड वेगळा होतो. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा ‘गोकुळ’ हा ब्रँड कसा तयार झाला याचीही कहाणी मनोरंजक आहे. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या एका भाषणात वापरलेला हा शब्द पुढे राष्ट्रीय पातळीवरचा दुध व्यवसायातील ब्रॅन्ड झाला.

दूध व्यवसाय वाढवण्यासाठी गावोगावी दूध संस्था उभारल्या जात होत्या. त्यांच्या इमारती बांधण्यासाठी शक्य ते अर्थसहाय्यही जिल्हा दूध संघाच्यावतीने दिले जात होते. आनंदराव पाटील-चुयेकर आणि १९८२-८३ च्या दरम्यान आमदार असलेले श्रीपतराव बोंद्रे यांचे चांगले संबंध. मुंबईत मंत्रालयात एखादे काम असेल, कोण्या मंत्र्यांना भेटायचे असेल तर चुयेकर बोंद्रे यांना घेऊन जात. याचदरम्यान गोकुळ शिरगाव येथील कृष्णा दूध संस्थेच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ होता. चुयेकर यांनी या इमारतीच्या उद्घाटनासाठी श्रीपतराव बोंद्रे यांना निमंत्रित केले होते. दूध संघाचे सर्व संचालक, अधिकारी, एनडीडीबीचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये भाषण करताना चुयेकर म्हणाले, ‘कोल्हापुरात दूध प्रकल्प सुरू झाला. त्याचबरोबर ‘आनंद पॅटर्न’ येथे राबविला गेला. दूध महापूर योजना सुरू झाली. या गोकुळ शिरगावमध्येच मुख्य डेअरीचे काम होत आहे म्हणजेच खऱ्या अर्थाने येथे ‘गोकुळ’ नांदणार आहे.’ चुयेकर यांच्या भाषणातील ‘गोकुळ’ हा शब्द अधिकाऱ्यांना भावला. त्यांनी सुचविले की या प्रकल्पाला आपण ‘गोकुळ’ हे नाव देऊया. सर्वांनाच ते मान्य झाले. सर्वसाधारण सभेत तसा ठराव झाला आणि हा ‘गोकुळ’ ब्रँड पुढे नावारूपाला आला.

चौकट

ग्रामविकासामध्ये’गोकुळ’चा मोठा सहभाग

वीस वर्षे जिल्हा दूध संघाचे आनंदराव पाटील यांनी नेतृत्व केल्यानंतर १९९० मध्ये अरुण नरके यांनी संघाची सूत्रे हाती घेतली. संघाला एक उच्चशिक्षित आणि नवी दृष्टी असणारे नेतृत्व लाभले. नरके यांनी केवळ दूध खरेदी, विक्री यातच लक्ष घातले नाही तर व्यवहाराला शिस्त लावली. गगनबावडा तालुक्यातील एका गावात ते एकदा कार्यक्रमाला गेले होते. पावसाळ्याचे दिवस होते. रस्त्यावरून गटार वाहत होते. तेथून आल्यानंतर नरके यांनी संघाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्या गावातून आपण दूध संकलन करतो त्या गावासाठीही काही तरी केले पाहिजे असे ठरले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर गावच्या विकासाला हातभार लावणारी ‘गोकुळ ग्रामविकास’ योजना सुरू झाली.