शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

भाषणामधील ‘गोकुळ’शब्द झाला दूध व्यवसायातील ब्रँड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST

कोल्हापूर : एखाद्या संस्थेचे नाव वेगळे असते आणि त्या संस्थेच्या उत्पादनांचा ब्रँड वेगळा होतो. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा ...

कोल्हापूर : एखाद्या संस्थेचे नाव वेगळे असते आणि त्या संस्थेच्या उत्पादनांचा ब्रँड वेगळा होतो. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा ‘गोकुळ’ हा ब्रँड कसा तयार झाला याचीही कहाणी मनोरंजक आहे. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या एका भाषणात वापरलेला हा शब्द पुढे राष्ट्रीय पातळीवरचा दुध व्यवसायातील ब्रॅन्ड झाला.

दूध व्यवसाय वाढवण्यासाठी गावोगावी दूध संस्था उभारल्या जात होत्या. त्यांच्या इमारती बांधण्यासाठी शक्य ते अर्थसहाय्यही जिल्हा दूध संघाच्यावतीने दिले जात होते. आनंदराव पाटील-चुयेकर आणि १९८२-८३ च्या दरम्यान आमदार असलेले श्रीपतराव बोंद्रे यांचे चांगले संबंध. मुंबईत मंत्रालयात एखादे काम असेल, कोण्या मंत्र्यांना भेटायचे असेल तर चुयेकर बोंद्रे यांना घेऊन जात. याचदरम्यान गोकुळ शिरगाव येथील कृष्णा दूध संस्थेच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ होता. चुयेकर यांनी या इमारतीच्या उद्घाटनासाठी श्रीपतराव बोंद्रे यांना निमंत्रित केले होते. दूध संघाचे सर्व संचालक, अधिकारी, एनडीडीबीचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये भाषण करताना चुयेकर म्हणाले, ‘कोल्हापुरात दूध प्रकल्प सुरू झाला. त्याचबरोबर ‘आनंद पॅटर्न’ येथे राबविला गेला. दूध महापूर योजना सुरू झाली. या गोकुळ शिरगावमध्येच मुख्य डेअरीचे काम होत आहे म्हणजेच खऱ्या अर्थाने येथे ‘गोकुळ’ नांदणार आहे.’ चुयेकर यांच्या भाषणातील ‘गोकुळ’ हा शब्द अधिकाऱ्यांना भावला. त्यांनी सुचविले की या प्रकल्पाला आपण ‘गोकुळ’ हे नाव देऊया. सर्वांनाच ते मान्य झाले. सर्वसाधारण सभेत तसा ठराव झाला आणि हा ‘गोकुळ’ ब्रँड पुढे नावारूपाला आला.

चौकट

ग्रामविकासामध्ये’गोकुळ’चा मोठा सहभाग

वीस वर्षे जिल्हा दूध संघाचे आनंदराव पाटील यांनी नेतृत्व केल्यानंतर १९९० मध्ये अरुण नरके यांनी संघाची सूत्रे हाती घेतली. संघाला एक उच्चशिक्षित आणि नवी दृष्टी असणारे नेतृत्व लाभले. नरके यांनी केवळ दूध खरेदी, विक्री यातच लक्ष घातले नाही तर व्यवहाराला शिस्त लावली. गगनबावडा तालुक्यातील एका गावात ते एकदा कार्यक्रमाला गेले होते. पावसाळ्याचे दिवस होते. रस्त्यावरून गटार वाहत होते. तेथून आल्यानंतर नरके यांनी संघाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्या गावातून आपण दूध संकलन करतो त्या गावासाठीही काही तरी केले पाहिजे असे ठरले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर गावच्या विकासाला हातभार लावणारी ‘गोकुळ ग्रामविकास’ योजना सुरू झाली.