शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

भाषणामधील ‘गोकुळ’शब्द झाला दूध व्यवसायातील ब्रँड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST

कोल्हापूर : एखाद्या संस्थेचे नाव वेगळे असते आणि त्या संस्थेच्या उत्पादनांचा ब्रँड वेगळा होतो. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा ...

कोल्हापूर : एखाद्या संस्थेचे नाव वेगळे असते आणि त्या संस्थेच्या उत्पादनांचा ब्रँड वेगळा होतो. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा ‘गोकुळ’ हा ब्रँड कसा तयार झाला याचीही कहाणी मनोरंजक आहे. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या एका भाषणात वापरलेला हा शब्द पुढे राष्ट्रीय पातळीवरचा दुध व्यवसायातील ब्रॅन्ड झाला.

दूध व्यवसाय वाढवण्यासाठी गावोगावी दूध संस्था उभारल्या जात होत्या. त्यांच्या इमारती बांधण्यासाठी शक्य ते अर्थसहाय्यही जिल्हा दूध संघाच्यावतीने दिले जात होते. आनंदराव पाटील-चुयेकर आणि १९८२-८३ च्या दरम्यान आमदार असलेले श्रीपतराव बोंद्रे यांचे चांगले संबंध. मुंबईत मंत्रालयात एखादे काम असेल, कोण्या मंत्र्यांना भेटायचे असेल तर चुयेकर बोंद्रे यांना घेऊन जात. याचदरम्यान गोकुळ शिरगाव येथील कृष्णा दूध संस्थेच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ होता. चुयेकर यांनी या इमारतीच्या उद्घाटनासाठी श्रीपतराव बोंद्रे यांना निमंत्रित केले होते. दूध संघाचे सर्व संचालक, अधिकारी, एनडीडीबीचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये भाषण करताना चुयेकर म्हणाले, ‘कोल्हापुरात दूध प्रकल्प सुरू झाला. त्याचबरोबर ‘आनंद पॅटर्न’ येथे राबविला गेला. दूध महापूर योजना सुरू झाली. या गोकुळ शिरगावमध्येच मुख्य डेअरीचे काम होत आहे म्हणजेच खऱ्या अर्थाने येथे ‘गोकुळ’ नांदणार आहे.’ चुयेकर यांच्या भाषणातील ‘गोकुळ’ हा शब्द अधिकाऱ्यांना भावला. त्यांनी सुचविले की या प्रकल्पाला आपण ‘गोकुळ’ हे नाव देऊया. सर्वांनाच ते मान्य झाले. सर्वसाधारण सभेत तसा ठराव झाला आणि हा ‘गोकुळ’ ब्रँड पुढे नावारूपाला आला.

चौकट

ग्रामविकासामध्ये’गोकुळ’चा मोठा सहभाग

वीस वर्षे जिल्हा दूध संघाचे आनंदराव पाटील यांनी नेतृत्व केल्यानंतर १९९० मध्ये अरुण नरके यांनी संघाची सूत्रे हाती घेतली. संघाला एक उच्चशिक्षित आणि नवी दृष्टी असणारे नेतृत्व लाभले. नरके यांनी केवळ दूध खरेदी, विक्री यातच लक्ष घातले नाही तर व्यवहाराला शिस्त लावली. गगनबावडा तालुक्यातील एका गावात ते एकदा कार्यक्रमाला गेले होते. पावसाळ्याचे दिवस होते. रस्त्यावरून गटार वाहत होते. तेथून आल्यानंतर नरके यांनी संघाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्या गावातून आपण दूध संकलन करतो त्या गावासाठीही काही तरी केले पाहिजे असे ठरले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर गावच्या विकासाला हातभार लावणारी ‘गोकुळ ग्रामविकास’ योजना सुरू झाली.