शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

महिला काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2016 00:52 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी : महागाईविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

कोल्हापूर : सेवाकरात ०.५ टक्के वाढ झाली असून, त्याला ‘कृषी कल्याण अधिभार’ असे नाव देण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्हा महिला काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.दुपारी साडेबाराच्या सुमारास काँग्रेसच्या महिला पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटल्या. या ठिकाणी महागाईविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. त्यानंतर महापौर अश्विनी रामाणे, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा सरला पाटील, जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले.दि. १ जूनपासून सेवाकरात ०.५ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय विनाअनुदानित सिलिंडरचे दरदेखील २१ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. दि. २६ मे २०१४ ला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १०८ डॉलर प्रतिबॅरेल होती, आता हीच किमत ५० डॉलरपेक्षाही कमी आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे ५५ टक्क्यांनी घसरल्या असताना केंद्र सरकार त्याचा लाभ भारतातील सामान्य पेट्रोल व डिझेल ग्राहकांना का मिळवून देत नाही? पेट्रोल, डिझेलच्या किमतीदेखील कच्च्या तेलाच्या किमतीच्या प्रमाणात कमी का होत नाहीत? असे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. सेवाकरातील करवाढीमुळे रेल्वे प्रवास, वैद्यकीय तपासणी, विमा, मोबाईल बिल, शिवनेरी व अन्य वातानुकूलित बसप्रवास, चित्रपटाची तिकिटे, बँकिंग, हॉटेल, आदी सेवा महागणार आहेत. विशेष म्हणजे सेवाकरातील या ०.५ टक्के करवाढीला ‘कृषी कल्याण अधिभार’ असे नाव देण्यात आले आहे. मागील दोन वर्षांत केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. अशा परिस्थितीत हा अधिभार लादण्याचा सरकारला काय नैतिक अधिकार आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. या निर्णयामुळे महागाईत प्रचंड वाढ होऊन सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसणार आहे. जनतेवर सरकारने लादलेली ही भाववाढ अन्यायी आहे. त्यामुळे केंद्राने ही सर्वप्रकारची दरवाढ व करवाढ मागे घ्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.आंदोलनात शहराध्यक्षा संध्या घोटणे, महापालिका महिला बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, करवीर पंचायत समिती सभापती स्मिता गवळी, जयश्री मेडशिंगे, दीपा पाटील, चंदा बेलेकर, सुलोचना नाईकवडे, लीला धुमाळ, विद्या घोरपडे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)