शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांतच शिवार गारठलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून, चार दिवसांतच शिवार गारठलं आहे. बांध फुटीसह पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून, चार दिवसांतच शिवार गारठलं आहे. बांध फुटीसह पाणी तुंबीमुळे अनेक ठिकाणचे पेरणी केलेले भात वाहून गेले आहे, तर काही ठिकाणी भातबियाणे कुजल्याने मोठे नुकसान झाले आहे. सरीत पाणी तुंबल्याने उसाच्या मुळांचा आधार तुटल्याने ऊस आडवे झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडील दहा-पंधरा वर्षांत खरीप पेरणीचे वेळापत्रक काहीसे बदलले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत भात, ज्वारी, सोयाबीन, भुईमुगाची पेरणी होते. साधारणत: ‘मृग’ नक्षत्रात पाऊस सुरू होतो, मात्र त्याला जोर नसायचा. जूनच्या शेवटचा आठवडा अथवा जुलैपासून पावसाला जोर येत होता. मात्र, यंदा वरुणराजाचा मूड काही वेगळाच दिसत आहे. माॅन्सूनची सुरुवात कोल्हापुरात वेळाने झाली, सुरू झाला तो दमदारच. गेल्या चार दिवसांत धुवाधार पाऊस कोसळत असल्याने सगळीकडे पाणी पाणी झाले आहे.

माॅन्सूनच्या अगोदर वळिवाच्या पाऊस जोरदार झाला होता. त्यात आता सुरू झाला तो थांबण्याचे नाव घेत नसल्याने जमिनीत पाणी मुरायला वेळच मिळत नाही. त्यामुळे पाणी सगळीकडे सैरभैर झाले आहे. वाट मिळेल तिकडे पाणी पळत आहे. शिवारात पाणी थांबेना, त्यातून बांध फुटी मोठ्या प्रमाणात झाली आहे. धूळवाफ पेरणी झालेल्या भाताची उगवण झाली आहे, मात्र ते सगळे पाण्याखाली गेले आहे. जे उगवावयचे आहे, ते कुजले आहे.

उसाच्या सरीत पाणी तुंबल्याने त्याच्या मुळांचा आधार तुटल्याने ऊस कोलमडले आहेत. नऊ-दहा महिने जोमाने वाढवलेला ऊस आडवा झाला आहे. अजून तीन-साडे तीन महिने पावसाळा असल्याने हा ऊस तग धरणार का? या विवंचनेत शेतकरी आहे. आतच पिके गारठल्याने त्याच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दुबार पेरणीचे संकट

नदी, ओढ्यांच्या काठावरील खरीप पेरणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. इतर ठिकाणांवरील भात, ज्वारी, भुईमुगाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

खताचा मिरगी डोस वाया जाणार

जिल्ह्यात साधारणत: जूनच्या पहिल्या पंधरावड्यात उसाला रासायनिक खताचा डोस दिला जातो. डोस दिल्यानंतर एकदमच पावसाला सुरुवात झाल्याने टाकलेले खत पिकाला लागण्यापूर्वीच ते वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झालेे आहेत.

सुगी लांबण्याची शक्यता

पेरणी केलेले भात, भुईमुगाचे बियाणे कुजल्याने नव्याने पेरणी करावी लागणार आहे, तर इतर ठिकाणी भुईमुगाची अद्याप पेरणीच करता आलेली नाही. त्यामुळे सुगी लांबण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.