शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

चार दिवसांतच शिवार गारठलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून, चार दिवसांतच शिवार गारठलं आहे. बांध फुटीसह पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून, चार दिवसांतच शिवार गारठलं आहे. बांध फुटीसह पाणी तुंबीमुळे अनेक ठिकाणचे पेरणी केलेले भात वाहून गेले आहे, तर काही ठिकाणी भातबियाणे कुजल्याने मोठे नुकसान झाले आहे. सरीत पाणी तुंबल्याने उसाच्या मुळांचा आधार तुटल्याने ऊस आडवे झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडील दहा-पंधरा वर्षांत खरीप पेरणीचे वेळापत्रक काहीसे बदलले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत भात, ज्वारी, सोयाबीन, भुईमुगाची पेरणी होते. साधारणत: ‘मृग’ नक्षत्रात पाऊस सुरू होतो, मात्र त्याला जोर नसायचा. जूनच्या शेवटचा आठवडा अथवा जुलैपासून पावसाला जोर येत होता. मात्र, यंदा वरुणराजाचा मूड काही वेगळाच दिसत आहे. माॅन्सूनची सुरुवात कोल्हापुरात वेळाने झाली, सुरू झाला तो दमदारच. गेल्या चार दिवसांत धुवाधार पाऊस कोसळत असल्याने सगळीकडे पाणी पाणी झाले आहे.

माॅन्सूनच्या अगोदर वळिवाच्या पाऊस जोरदार झाला होता. त्यात आता सुरू झाला तो थांबण्याचे नाव घेत नसल्याने जमिनीत पाणी मुरायला वेळच मिळत नाही. त्यामुळे पाणी सगळीकडे सैरभैर झाले आहे. वाट मिळेल तिकडे पाणी पळत आहे. शिवारात पाणी थांबेना, त्यातून बांध फुटी मोठ्या प्रमाणात झाली आहे. धूळवाफ पेरणी झालेल्या भाताची उगवण झाली आहे, मात्र ते सगळे पाण्याखाली गेले आहे. जे उगवावयचे आहे, ते कुजले आहे.

उसाच्या सरीत पाणी तुंबल्याने त्याच्या मुळांचा आधार तुटल्याने ऊस कोलमडले आहेत. नऊ-दहा महिने जोमाने वाढवलेला ऊस आडवा झाला आहे. अजून तीन-साडे तीन महिने पावसाळा असल्याने हा ऊस तग धरणार का? या विवंचनेत शेतकरी आहे. आतच पिके गारठल्याने त्याच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दुबार पेरणीचे संकट

नदी, ओढ्यांच्या काठावरील खरीप पेरणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. इतर ठिकाणांवरील भात, ज्वारी, भुईमुगाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

खताचा मिरगी डोस वाया जाणार

जिल्ह्यात साधारणत: जूनच्या पहिल्या पंधरावड्यात उसाला रासायनिक खताचा डोस दिला जातो. डोस दिल्यानंतर एकदमच पावसाला सुरुवात झाल्याने टाकलेले खत पिकाला लागण्यापूर्वीच ते वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झालेे आहेत.

सुगी लांबण्याची शक्यता

पेरणी केलेले भात, भुईमुगाचे बियाणे कुजल्याने नव्याने पेरणी करावी लागणार आहे, तर इतर ठिकाणी भुईमुगाची अद्याप पेरणीच करता आलेली नाही. त्यामुळे सुगी लांबण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.