शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांतच शिवार गारठलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून, चार दिवसांतच शिवार गारठलं आहे. बांध फुटीसह पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून, चार दिवसांतच शिवार गारठलं आहे. बांध फुटीसह पाणी तुंबीमुळे अनेक ठिकाणचे पेरणी केलेले भात वाहून गेले आहे, तर काही ठिकाणी भातबियाणे कुजल्याने मोठे नुकसान झाले आहे. सरीत पाणी तुंबल्याने उसाच्या मुळांचा आधार तुटल्याने ऊस आडवे झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडील दहा-पंधरा वर्षांत खरीप पेरणीचे वेळापत्रक काहीसे बदलले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत भात, ज्वारी, सोयाबीन, भुईमुगाची पेरणी होते. साधारणत: ‘मृग’ नक्षत्रात पाऊस सुरू होतो, मात्र त्याला जोर नसायचा. जूनच्या शेवटचा आठवडा अथवा जुलैपासून पावसाला जोर येत होता. मात्र, यंदा वरुणराजाचा मूड काही वेगळाच दिसत आहे. माॅन्सूनची सुरुवात कोल्हापुरात वेळाने झाली, सुरू झाला तो दमदारच. गेल्या चार दिवसांत धुवाधार पाऊस कोसळत असल्याने सगळीकडे पाणी पाणी झाले आहे.

माॅन्सूनच्या अगोदर वळिवाच्या पाऊस जोरदार झाला होता. त्यात आता सुरू झाला तो थांबण्याचे नाव घेत नसल्याने जमिनीत पाणी मुरायला वेळच मिळत नाही. त्यामुळे पाणी सगळीकडे सैरभैर झाले आहे. वाट मिळेल तिकडे पाणी पळत आहे. शिवारात पाणी थांबेना, त्यातून बांध फुटी मोठ्या प्रमाणात झाली आहे. धूळवाफ पेरणी झालेल्या भाताची उगवण झाली आहे, मात्र ते सगळे पाण्याखाली गेले आहे. जे उगवावयचे आहे, ते कुजले आहे.

उसाच्या सरीत पाणी तुंबल्याने त्याच्या मुळांचा आधार तुटल्याने ऊस कोलमडले आहेत. नऊ-दहा महिने जोमाने वाढवलेला ऊस आडवा झाला आहे. अजून तीन-साडे तीन महिने पावसाळा असल्याने हा ऊस तग धरणार का? या विवंचनेत शेतकरी आहे. आतच पिके गारठल्याने त्याच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दुबार पेरणीचे संकट

नदी, ओढ्यांच्या काठावरील खरीप पेरणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. इतर ठिकाणांवरील भात, ज्वारी, भुईमुगाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

खताचा मिरगी डोस वाया जाणार

जिल्ह्यात साधारणत: जूनच्या पहिल्या पंधरावड्यात उसाला रासायनिक खताचा डोस दिला जातो. डोस दिल्यानंतर एकदमच पावसाला सुरुवात झाल्याने टाकलेले खत पिकाला लागण्यापूर्वीच ते वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झालेे आहेत.

सुगी लांबण्याची शक्यता

पेरणी केलेले भात, भुईमुगाचे बियाणे कुजल्याने नव्याने पेरणी करावी लागणार आहे, तर इतर ठिकाणी भुईमुगाची अद्याप पेरणीच करता आलेली नाही. त्यामुळे सुगी लांबण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.