शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

जयसिंगपूरच्या समस्यांवर ‘नेम’ साधणार ?

By admin | Updated: March 4, 2015 23:43 IST

आमदारांनी घेतली बैठक : विविध पक्ष, संघटनांनी मांडल्या समस्या; शहरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या

जयसिंगपूर : शहरातील विविध पक्ष, सामाजिक संघटनांनी शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांच्यासमोर अनेक मूलभूत प्रश्न आणि समस्या मांडल्या. प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका आ. पाटील यांनी घेतल्यामुळे जयसिंगपूरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सत्ताधारी विरुद्ध नाराजगट या बैठकीत एकत्र आल्याने ‘एका दगडात दोन पक्षी मारण्याचा नेम’ आ. पाटील कसा साधतात हे येणाऱ्या काळात समजणार आहे.पालिकेच्या दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात आ. उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. शहरातील मूलभूत प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी राजकीय पक्ष, तरुण मंडळे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक व शहरवासीय असे बैठकीचे स्वरूप होते. शहरात उड्डाण पूल व्हावा, मोकाट जणावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, उपनगरातील रस्ते, गटारी, दिवाबत्ती, पाणी, अन्न सुरक्षा योजना, वाहतूक कोंडी, शिरोळ रस्त्याचे पालिकेकडे हस्तांतरण, ज्येष्ठांसाठी विरगुंळा केंद्र, क्रीडांगण, लक्ष्मीपार्कमधील समस्या, तंबाखूवरील वाढविण्यात आलेला व्हॅट यामुळे कामगारांच्या रोजगाराचा उभा राहिलेला प्रश्न, प्राथमिक आरोग्य केंद्रातून अत्याधुनिक सेवा मिळाव्यात यांसह अनेक मूलभूत प्रश्न आणि समस्या बैठकीत मांडण्यात आल्या. आ. पाटील यांनी प्रश्नाबाबतची गाऱ्हाणी ऐकून सकारात्मक भूमिका व्यक्त केली. प्रसंगी रस्त्यावर उतरू असाही इशारा त्यांनी दिला आहे. ‘आमदार आपल्या दारी’ या भूमिकेतून आ. पाटील यांनी जयसिंगपूर शहरापासून सुरुवात केली आहे. याचे जनतेतून स्वागत होत असले तरी शहरासाठी ते निधी कितपत खेचून आणतात, यावरच बरेच काही अवलंबून आहे. सत्ताधारी विरुद्ध नाराजगट या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले, अशीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आगामी काळात पालिकेची निवडणूकही होणार असल्यामुळे बैठकीच्या निमित्ताने आ. पाटील एका दगडात दोन पक्षी मारण्यात कसे यशस्वी होतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)शहरवासीयांच्या अपेक्षाउड्डाणपूल, मोकाट जणावरांचा बंदोबस्त, रस्ते, गटारी, दिवाबत्ती, पाणी, अन्न सुरक्षा योजना, वाहतूक कोंडी, ज्येष्ठांसाठी विरगुंळा केंद्र, क्रीडांगण, तंबाखूवरील व्हॅट.सत्ताधाऱ्यांकडे लक्षआमदार उल्हास पाटील यांनी आयोजित केलेल्या विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या बैठकीस सत्ताधारी गटाचे नगरसेवक अनुपस्थितीत होते. त्यामुळे आ. पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत सत्ताधारी विकासकामांतून उत्तर देणार की पत्रकबाजीतून, याकडे लक्ष लागून राहिले आहे.