शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

अर्जुनवाडमध्ये सर्व जागांवर महिलांना संधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST

राहूल मांगुरकर अर्जुनवाड : येथील ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गटबाजीच्या व परंपरागत पद्धतीला छेद देत येथील पुरोगामी ...

राहूल मांगुरकर

अर्जुनवाड : येथील ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गटबाजीच्या व परंपरागत पद्धतीला छेद देत येथील पुरोगामी मंडळींनी या निवडणुकीत सर्वच्या सर्व तेरा जागी गावातील महिलांना निवडणुकीत उभे करण्याचा चंग बांधला आहे. अर्जुनवाड ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारीला होत असल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत. गेली कित्येक वर्षे गावातील अंतर्गत गटबाजीमुळे अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. याचा फायदा घेत अनेक योजना शेजारील गावांनी उचलल्या. विविध समस्यांबरोबरच गेल्या चाळीस वर्षांत ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी वगळता कधीच उत्पन्न वाढीचा विचार केला नाही. यापूर्वी उमराव कोकणे यांच्या काळात नारळाची झाडे लावून शाळेच्या खोल्या बांधून उत्पन्न वाढविले, तर सध्या गावात असलेल्या मोठ्या औद्योगिक उद्योगाची नोंद ग्रामपंचायतीकडे नाही. तर अशा उद्योगांना साध्या पद्धतीने कर आकारणी करून राजकीय दबावाखाली उत्पन्न बुडविले जात आहे. एकाच ठेकेदाराला कामे देणे, नैसर्गिक समतोल पाहता झाडे लावण्याचा बनाव करत ती जगविण्याऐवजी योजनेतुन अनेकांनी आर्थिक विकास साधला.

ग्रामपंचायतीमध्ये तेरा सदस्य निवडून आले असले तरी प्रामुख्याने दोन ते तीन सदस्यच कारभार पाहतात, तर बाकीचे सदस्य नाममात्र राहतात. त्यामुळे गावचा विकास साधण्याऐवजी स्वत:चा विकास साधला गेला. याची पुनरावृती टाळण्यासाठी तसेच गावातील बहुतांश मोठ्या घरातील अनेक सदस्य ग्रामपंचायत सेवा संस्था, पाणीपुरवठा संस्था, पतसंस्था, इतर संस्थांमध्ये यापूर्वी निवडून येऊन एकाच घरात सरपंच, अध्यक्ष, सदस्य अशी घराणेशाही चालत आलेली आहे; पण त्याच समाजातील दुर्बल घटकांना या पदापासुन वंचित ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे या निवडणुकीत ज्या कुटुंबात कोणतेही पद दिले गेले नाही, अशा वंचित घरातील होतकरू महिलांना संधी देऊन सर्वच्या सर्व तेरा जागी महिलांना उभे करण्याचा आणि पारंपरिक पद्धतीला छेद देण्यासाठी पुरोगामी मंडळी व्यूहरचना करत आहेत.