शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

अर्जुनवाडमध्ये सर्व जागांवर महिलांना संधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST

राहूल मांगुरकर अर्जुनवाड : येथील ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गटबाजीच्या व परंपरागत पद्धतीला छेद देत येथील पुरोगामी ...

राहूल मांगुरकर

अर्जुनवाड : येथील ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गटबाजीच्या व परंपरागत पद्धतीला छेद देत येथील पुरोगामी मंडळींनी या निवडणुकीत सर्वच्या सर्व तेरा जागी गावातील महिलांना निवडणुकीत उभे करण्याचा चंग बांधला आहे. अर्जुनवाड ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारीला होत असल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत. गेली कित्येक वर्षे गावातील अंतर्गत गटबाजीमुळे अनेक समस्या सुटलेल्या नाहीत. याचा फायदा घेत अनेक योजना शेजारील गावांनी उचलल्या. विविध समस्यांबरोबरच गेल्या चाळीस वर्षांत ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी वगळता कधीच उत्पन्न वाढीचा विचार केला नाही. यापूर्वी उमराव कोकणे यांच्या काळात नारळाची झाडे लावून शाळेच्या खोल्या बांधून उत्पन्न वाढविले, तर सध्या गावात असलेल्या मोठ्या औद्योगिक उद्योगाची नोंद ग्रामपंचायतीकडे नाही. तर अशा उद्योगांना साध्या पद्धतीने कर आकारणी करून राजकीय दबावाखाली उत्पन्न बुडविले जात आहे. एकाच ठेकेदाराला कामे देणे, नैसर्गिक समतोल पाहता झाडे लावण्याचा बनाव करत ती जगविण्याऐवजी योजनेतुन अनेकांनी आर्थिक विकास साधला.

ग्रामपंचायतीमध्ये तेरा सदस्य निवडून आले असले तरी प्रामुख्याने दोन ते तीन सदस्यच कारभार पाहतात, तर बाकीचे सदस्य नाममात्र राहतात. त्यामुळे गावचा विकास साधण्याऐवजी स्वत:चा विकास साधला गेला. याची पुनरावृती टाळण्यासाठी तसेच गावातील बहुतांश मोठ्या घरातील अनेक सदस्य ग्रामपंचायत सेवा संस्था, पाणीपुरवठा संस्था, पतसंस्था, इतर संस्थांमध्ये यापूर्वी निवडून येऊन एकाच घरात सरपंच, अध्यक्ष, सदस्य अशी घराणेशाही चालत आलेली आहे; पण त्याच समाजातील दुर्बल घटकांना या पदापासुन वंचित ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे या निवडणुकीत ज्या कुटुंबात कोणतेही पद दिले गेले नाही, अशा वंचित घरातील होतकरू महिलांना संधी देऊन सर्वच्या सर्व तेरा जागी महिलांना उभे करण्याचा आणि पारंपरिक पद्धतीला छेद देण्यासाठी पुरोगामी मंडळी व्यूहरचना करत आहेत.