शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘गोकुळ’च काय सर्वच निवडणुकीत युनिटी राहणार : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाविकास आघाडी ताकदीने उतरल्यानंतर काय होते, हे या निवडणुकीने विरोधकांना दाखवून दिले. ‘गोकुळ’च काय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महाविकास आघाडी ताकदीने उतरल्यानंतर काय होते, हे या निवडणुकीने विरोधकांना दाखवून दिले. ‘गोकुळ’च काय येणाऱ्या सर्वच निवडणुकीत ही युनिटी कायम राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

नूतन आमदार अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे प्रमुख उपस्थित होते. आघाडीतील प्रत्येक घटक एकसंधपणे राबल्याचे फळ मिळाल्याचे सांगत आगामी महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक व ‘गोकुळ’ची निवडणूक ही आघाडी कायम राहावी, अशी अपेक्षा खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केली. हाच धागा पकडत पालकमंत्री पाटील म्हणाले, धैर्यशील, तुम्ही राजाराम साखर कारखान्याच्या मागील निवडणुकीत आमच्या सोबत असता तर त्याचवेळी कारखाना ताब्यात आला असता. आता हातात हात घालून काम करायचे आहे, ‘गोकुळ’च काय सर्वच निवडणुकीत ही युनिटी कायम राहणार.

शिवसेनेची नाराजी अन्‌ मुश्रीफ यांचा सल्ला

शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने तुम्ही दोघे निवडून आलात, त्याचा आम्हाला आनंद आहे. निवडून आल्यानंतर मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील यांचे आभाराचे फोन आले, मात्र जिल्हाप्रमुख म्हणून एक फोन करणे अपेक्षित होते. अशी नाराजी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केली. यावर, दोघांनी एक दिवस बाजूला काढून सर्वांच्या भेटी घेण्याचा सल्ला मंत्री मुश्रीफ यांनी दिला.

राजेश पाटील यांचा इशारा

‘बरं पेक्षा खरं बोलण्याची शिकवण स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व नरसिंगराव पाटील यांनी आम्हाला दिली. निवडणुकीत आमचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे राबले, त्यांची कामे व्हावीत. नाही तर सहा वर्षांनंतर आपल्याबद्दल पुन्हा विचार करायला लावू नका,’ असा इशाराच आमदार राजेश पाटील यांनी दिला.

चांगल्या दिवशी चंद्रकांत पाटीलांचे नाव नको

सत्काराचा चांगला दिवस असल्याने आज चंद्रकांत पाटील यांचे नाव घेणार नाही. मात्र, अनेक वेळा आपण सांगत आलोय, सत्तेची सूज जास्त दिवस टिकत नाही. जिवाभावाची माणसं तयार करण्यासाठी आयुष्य वेचावे लागते. कोणीही उठून पैसे देऊन अशी माणसे तयार होत नसल्याचा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.

- राजाराम लोंढे