शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
2
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
3
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे
5
'या' आयपीओचं बंपर लिस्टिंग! पहिल्याच दिवशी ९ टक्क्यांचा नफा, गुंतवणूकदार मालामाल
6
५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
7
Budh Gochar 2025: २४ ऑक्टोबर बुध गोचर; १० नोव्हेंबरपर्यंत 'वृश्चिक' राशीच्या लोकांनी घ्या 'ही' काळजी!
8
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
9
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
10
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
11
अ‍ॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अ‍ॅप! काय आहे कारण?
12
गरिबीवर मात! शेजाऱ्याकडून १०० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय; आता कोट्यवधींची मालकीण
13
Piyush Pandey: 'अब की बार, मोदी सरकार', 'हमारा बजाज'सारख्या टॅगलाइनचे जनक, मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं निधन; 'पद्मश्री'ने झाला होता गौरव
14
"हो, मी प्लास्टिक सर्जरी केली...", जान्हवी कपूरने जाहीररित्या स्वीकारलं; म्हणाली, "आईनेच मला..."
15
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
16
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
17
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
18
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
19
दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू
20
Australia Squads vs India : ऑस्ट्रेलियन संघात फेरबदल! टीम इंडियाविरुद्ध मॅक्सवेलही उतरणार मैदानात

संकल्पपूर्तीसाठी आवश्यकता इच्छाशक्तीची

By admin | Updated: January 1, 2015 00:26 IST

--लोकमत सर्वेक्षण

इंदुमती गणेश -कोल्हापूर -यंदा मी अभ्यास टॉप करणार, यावर्षी मला अमुक नोकरी लागली पाहिजे, मी कुटुंबीयांना विशेषत: मुलांना वेळ देईन, लवकर उठेन, रोज पहाटे नियमित व्यायाम करीन, असे कितीतरी संकल्प आपण नववषार्निमित्त करतो; पण वर्षाखेरीस हा संकल्प फक्त करण्यापुरताच राहिलेला आहे, हे जाणवते; तर बहुतांश व्यक्तींना संकल्प करण्याची गरज आहे, असे वाटत नाही. संकल्पपूर्ती होण्यामागे इच्छाशक्ती आणि जबाबदारीच्या जाणिवेची आवश्यकता आहे; शिवाय काहीवेळा भोवतालची परिस्थिती तशी असावी लागते. संकल्पपूर्तीसाठी अपेक्षित साथ मिळत नाही, असे प्रांजळ मत वाचकांनी व्यक्त केले. नववर्षानिमित्त लोकमतने नववर्षाचे संकल्प या विषयावर शंभर वाचकांचे सर्वेक्षण केले. यात त्यांना तुम्ही कोणत्या प्रकारच्या संकल्पांना प्राधान्य देता, संकल्प पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न करता, संकल्प पूर्ण करण्यात कोणते अडथळे येतात, संकल्पपूर्तीसाठी काय उपाय सुचवाल, असे प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे देत ५० जणांनी आम्ही केलेला संकल्प वर्षाखेरीस पूर्ण झालेला नाही, हे मान्य केले. तीस टक्के वाचकांनी संकल्प काही प्रमाणात, तर २० टक्के वाचकांनी ठरल्याप्रमाणे संकल्प पूर्ण झाल्याचे सांगितले. आयुष्यात किंवा वर्षभरात काय करायचे आहे, हे ठरवून एकदा त्या दिशेने प्रवास सुरू झाला की त्यात सुरुवातीला सातत्य राहते; नंतर मात्र दिवसागणिक हा संकल्प मागे पडत जातो; पण अनेकदा हा मार्गच ठरलेला नसल्याने ‘काय संकल्प करायचा,’ हा प्रश्नही अनेकांना पडला. चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर नवीन वर्षाचाच मुहूर्त धरला पाहिजे असे नाही; त्यामुळे २५ टक्के व्यक्तींनी आम्ही या दिवशी काही संकल्प करीत नाही, असे सांगितले. संकल्प पूर्ण न होण्यामागे इच्छाशक्तीचा आणि जबाबदारीच्या जाणिवेचा अभावही असतो, हे अनेकांनी मान्य केले. संकल्प पूर्ण होताना त्याचा इतरांना त्रास होता कामा नये किंवा कौटुंबिक स्वास्थ्य बिघडायला नको, अशीही अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. संकल्पपूर्ती केलेल्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे जाणवले. संकल्प जरूर पूर्ण होतात; फक्त त्यासाठी स्वत:वर विश्वास हवा, परिश्रम हवेत, स्वयंशिस्त हवी. वर्तमानाचे भान ठेवून भविष्याचा वेध घेतला तर स्वावलंबी, सुखी, समाधानी व आनंदी जगता येते, हा अनुभवही यानिमित्ताने आल्याचे काहीजणांनी सांगितले. इतरांकडून चेष्टाआम्ही काही संकल्प केला आणि तो इतरांना सांगून त्याची अंमलबजावणी सुरू केली की मित्र-मैत्रिणी अगदी कुटुंबीयांकडूनही त्याची काहीवेळा चेष्टा होते, असा अनुभवही काहीजणांनी विशेषत: तरुणांनी व्यक्त केला. सामाजिक संकल्प असेल तर ‘हा काय आम्हाला ज्ञान शिकवतो!...’ असा कुत्सित भाव आणला जातो; त्यामुळेही अनेकदा मानसिक खच्चीकरण होते. अडथळा मित्रांचासंकल्प पूर्ण न होण्यामागे मित्रांचा फार मोठा अडथळा असतो, असे मत बऱ्याच महाविद्यालयीन तरुणाईने मांडले आहे. उदाहरणार्थ, एका व्यक्तीने मी दारू सोडण्याचा संकल्प केला. तो अमलातही आणला; पण मित्रांमुळे तो पुन्हा तुटला, असे मत मांडले. याशिवाय आपण ज्या परिसरात राहतो तेथील वातावरणामुळे किंवा तशी कौटुंंबिक स्थिती नसल्यानेदेखील संकल्प पूर्ण करता येत नाहीत, असेही काहीजणांचे म्हणणे आहे.