शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

प्रदूषण नियंत्रण मंडळ तक्रारीची वाट का पाहते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST

कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नागरिकांची तक्रार येण्याची वाट का पाहतात अशी ...

कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नागरिकांची तक्रार येण्याची वाट का पाहतात अशी विचारणा जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन परिषदेमध्ये शुक्रवारी करण्यात आली. यावर पुढच्या सभेमध्ये मंडळाच्या कामकाजाबाबत सादरीकरण करण्याचे ठरले. अध्यक्षस्थानी बजरंग पाटील होते.

समिती सभागृहात झालेल्या या बैठकीमध्ये सदस्य शिवाजी मोरे यांनी या विषयाला हात घातला. ते म्हणाले, तुम्ही अधिकारी फिरत असताना तुम्हाला कोणता कारखाना प्रदूषण करतोय, कुठे सांडपाणी सोडले जाते हे दिसत नाही का, तुम्ही नागरिकांच्या तक्रार अर्जाची वाट का पाहता. तुम्ही सांडपाणी व्यवस्थापनाबाबत गावांना मार्गदर्शन करण्याची गरज असताना याबाबत जनजागृती केली जात नाही. लोकांमध्ये जाऊन या विभागाने काम करण्याची गरज आहे.

वनविभागामुळे अनेक योजना अडचणीत आल्याचाही विषय यावेळी चर्चेत आला. आजरा पंचायत समितीचे सभापती उदयराज पोवार यांनी हा मुद्दा मांडला. पाणी योजनांचे पाइप टाकणे, वनविभागाच्या जागेतून जाणारे रस्ते आणि त्यांच्या क्षेत्रात बांधकाम करणे अशा तीन प्रकारच्या कामांना अनेकदा वनविभागाकडून आडकाठी होते. येथून प्रस्ताव नागपूर, भोपाळला जातात. यामुळे कामांना मोठा विलंब होतो. रस्त्याच्या कामांना ज्या पद्धतीने जिल्हा पातळीवर परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असाच निर्णय नळयोजनांबाबत घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, स्वाती सासने, सदस्य राणी खमलेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष पवार, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

चौकट

वन विभागाच्या हद्दीत अनेक सायपन योजना आहेत. त्या ठिकाणी बांधकामे करण्यात आली आहेत. या जुन्या कामांच्या दुरुस्तीसाठीही नव्याने परवानगी घ्यावी लागते. याबद्दल सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनीही संबंधितांना निर्देश दिले.