शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्ष सत्तेत असताना तुम्ही का गप्प बसलात..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST

कोल्हापूर : राज्यात पाच वर्षे भाजपची सत्ता होती त्यावेळी त्यांना सरकारमधील नेत्यांची, त्यांनी केेलेल्या गुन्ह्यांची माहिती नव्हती का, महाविकास ...

कोल्हापूर : राज्यात पाच वर्षे भाजपची सत्ता होती त्यावेळी त्यांना सरकारमधील नेत्यांची, त्यांनी केेलेल्या गुन्ह्यांची माहिती नव्हती का, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावरच आरोप का केले जात आहेत. गुन्हा न सांगणे हा जसा गुन्हा आहे तसाच तो लपवणे हादेखील गुन्हा आहे. तुम्हाला सगळं माहीत होतं तर मग पाच वर्षे गप्प का बसला होता, अशी विचारणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे केली.

नारायण राणे मंत्री झाले त्यावेळी भाजपला खात्री झाली की आता कोणताही पक्ष आपल्यासोबत येणार नाही. तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे राहणार आहे. त्यामुळे आरोप करून सरकार अस्थिर करायचे, सुरूंग लावायचा यासाठी एवढा आटापिटा सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप, तसेच त्यांना केलेली जिल्हा बंदी यासंबंधी ते म्हणाले, भ्रष्टाचाराबाबतची तक्रार दिल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून त्याचा तपास केला जाईल. त्यासाठी तक्रारदार स्वत: सगळीकडे तक्रार करत फिरत नाही. तक्रारदाराला चौकशी करण्याचा अधिकार नाही. कायद्यानुसार सगळ्या गोष्टी घडतील, यंत्रणा त्यांचे काम करेल, आपल्या हट्टासाठी विनाकारण एखाद्या जिल्ह्याची शांतता भंग करणे योग्य नाही. माझे किरीट सोमय्या यांना आवाहन आहे की, त्यांनी जिल्ह्याची शांतता बिघडवू नये.

---

सुरक्षा देणे शक्य नव्हते..

गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडव्यात यासाठी गेली दहा दिवस पोलीस यंत्रणा काम करत होती., नियोजन करत होते. पहाटेपर्यंत सगळे पोलीस बंदोबस्तात गुंतले होते. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी सोमय्या यांना झेड सुरक्षा देणे शक्य झाले नसते. त्यामुळे त्यांना कोल्हापूर बंदी करावी लागली, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

--

...म्हणून १४४ कलम

किरीट सोमय्या येणार म्हणून जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले याबद्दल ते म्हणाले, जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी प्रशासनासोबत चर्चा करून हे कलम लावले जाते. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे आपण अनेकदा हे कलम लागू केले आहे. एखादी व्यक्ती किंवा कारणामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये ही त्यामागची भूमिका आहे. जिल्ह्याची शांतता अबाधित राखणे ही पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पाेलीस प्रशासनाची जबाबदारी आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र चर्चा करून हे कलम लागू केले.

---