शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मृतदेहांची हेळसांड थांबविणार कोण?

By admin | Updated: November 6, 2014 22:57 IST

यंत्रणेला जाग : उपाययोजना सुरू, कायद्यातील त्रुटींमुळे शासकीय स्तरावर गोंधळ--लोकमत विशेष

शीतल पाटील - सांगलीसांगलीतील दोन बेवारस मृतदेहांच्या झालेल्या हेळसांड प्रकरणावरून बरेच वादंग निर्माण झाले आहे. मृतदेहांची विल्हेवाट कोणी लावायची, पोलीस, शासकीय रुग्णालय व महापालिका या तीनही शासकीय यंत्रणांपैकी ही जबाबदारी कोणाची? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत. पोलीस, पालिका कायद्यात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे नेमकी जबाबदारी निश्चित करणे अडचणीचे आहे. त्यासाठी तीनही विभागांनी एकत्रित येऊन समन्वयाने उपाययोजना आखण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यानुसार महापालिका व पोलीस प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शासकीय रुग्णालय प्रशासनानेही स्वयंसेवी संस्थांना साद घातली आहे. मिरज हे रेल्वेचे जंक्शन व कर्नाटक सीमेवरील शहर असल्याने मिरजेत बेवारस मृतदेहांची संख्या मोठी आहे. त्यातच सांगलीतील बेवारस मृतदेह दफन करण्यासाठी मिरजेला पाठवून त्यांची हेळसांड करण्यात येत आहे. नुकतेच सांगलीतील दोन बेवारस मृतदेह पोलिसांनी महापालिका आरोग्य विभागाच्या मजुरांच्या ताब्यात अंत्यसंस्कारासाठी दिले होते. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कापडात गुंडाळून दिले जातात. मात्र हे बेवारस दोन्ही मृतदेह नग्नावस्थेत, शववाहिकेऐवजी कचरा कंटेनरमधून मिरजेतील पंढरपूर रोड स्मशानभूमित आणण्यात आले. या मृतदेहांच्या पायाला दोरी बांधून ते फरफटत नेऊन तीन फुटांच्या एकाच खड्ड्यात दोन्ही मृतदेह दफन करण्यात आले. या प्रकाराने खळबळ उडाली होती. पोलीस, शासकीय रुग्णालय व महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. या घटनेला जबाबदार धरत दोघांना महापालिकेने निलंबित केले. पण केवळ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणारा नाही. बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी निश्चित धोरण आखण्याची गरज आहे. बेवारस मृतदेहाचे शासकीय रुग्णालयाकडे देहदान केल्यास त्याची हेडसांड होणार नाही. भविष्यात मृत व्यक्तीचे नातेवाईकांचा शोध लागल्यास त्यांना मृतदेह परत देता येऊ शकतो. तशी व्यवस्था झाली पाहिजे. मृतदेहाच्या विल्हेवाटीची जबाबदारी पोलीस व महापालिकेची आहे. पालिकेनेही मृतदेह नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध करून दिली पाहिजे. शासकीय रुग्णालयांना मोफत रुग्णसेवा देताना आर्थिक अडचण भासत आहे. त्यात बेवारस मृतदेहांना कापड अथवा चादर देण्यासाठी तरतूद नाही. या कामासाठी शहरातील कापड व्यापारी, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा. - डॉ. दीप्ती डोणगावकर, अधिष्ठाता, वसंतदादा शासकीय रुग्णालयबेवारस मृतदेहाच्या विल्हेवाटीबाबत पोलीस प्रशासनाकडून नवीन नियमावली तयार केली आहे. ही नियमावली महापालिका व शासकीय रुग्णालयाकडेही पाठविण्यात आली आहे. वस्तुत: बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी प्रामुख्याने पोलिसांवर येते. त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेहाचे दफन झाले पााहिजे. पोलीस आल्याशिवाय मृतदेहाचे दफन करू नये. तशी सूचनाही सर्वच पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहे. अनेक बेवारस मृतदेह विवस्त्र अवस्थेत असतात. त्यांच्या कापडासाठी पाचशे रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे भविष्यात विवस्त्र मृतदेह दफन करण्याची वेळ येणार नाही - दिलीप सावंत, जिल्हा पोलीसप्रमुख, सांगलीसमन्वयाची भूमिका आवश्यकपोलीस, पालिका व शासकीय रुग्णालयाची नेमकी जबाबदारी काय?, त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, या अनुषंगाने विचार करण्याची वेळ आली आहे. एकमेकांवर जबाबदारी टाकून चालणार नाही. या प्रकरणानंतर तीनही शासकीय यंत्रणांनी आपापल्या पातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाहीमृतदेहाच्या हेडसांडप्रकरणी महापालिकेची सर्वात जास्त बदनामी झाली. महापालिकेकडे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. एक वाहनचालक व एक सफाई कामगार दोघेच विल्हेवाट लावण्याचे काम करतात. वास्तविक याची एकावरही निश्चित जबाबदारी नाही. त्यात सफाई कामगाराला मृतदेह विल्हेवाटीच्या प्रक्रियेची माहिती असेलच असे नाही. अनेकदा पोलीस कर्मचारी येईपर्यंतही कर्मचारी थांबत नाहीत. त्याला कारणेही अनेक आहेत. एकतर बऱ्याच दिवसांचा सडलेला मृतदेह असेल तर त्याला हाताळण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. त्यात अनेक मृतदेहांना असाध्य आजार असतो. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. मृतदेह हाताळण्याची साधनेही त्यांच्याकडे नाहीत. एकूणच पालिकेने सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त होत होती. आता आयुक्त अजिज कारचे यांनी त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी लवकरच महापालिकेचे धोरण निश्चित केले जाणार आहे. ओळख पटविण्यात अडचणबेवारस मृतदेहाचे दफन करताना त्यावर मार्किंग केले जात नाही. अनेक प्रकरणात मृतदेह दुसऱ्यांदा बाहेर काढून त्याची तपासणी करावी लागते. पण मार्किंग नसल्याने, नेमका हा कोणता मृतदेह? असा प्रश्न पडतो. अनेकवेळा तर मृतदेहाचे दफन केल्यानंतर कित्येक महिन्यांनी नातेवाईकांचा शोध लागतो. तेव्हाही मृतदेहाची ओळख पटविण्यात अडचण येते. त्यासाठी मार्किंग केल्याशिवाय मृतदेहाचे दफन करायचे नाही, असा आदेशच जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी काढला आहे.