शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

...तर धार्मिक विधी कोण करणार?

By admin | Updated: July 2, 2015 00:45 IST

मुस्लिम समाजाची प्रतिक्रिया : मुस्लिमांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम समाजातील मुलांना त्यांच्या हक्कांपासून, तसेच शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे राज्य सरकारमधील अधिकारी सातत्याने प्रयत्न करीत असून, मदरशांमधील मुलांना आता शाळाबाह्य ठरविणे, हा त्याचाच एक भाग असल्याची संतप्त प्रतिक्रिया मुस्लिम समाजातून व्यक्त होत आहे. मदरसा बंद पडले, तर समाजातील धार्मिक विधी कोण करणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात कोणती भूमिका घ्यावी, याबाबत १६ जुलैला चॉँद कमिटीच्या बैठकीत ठरविले जाईल, असेही सांगण्यात आले. शिक्षणाचा हक्क प्राप्त करून देण्यासाठी ज्या गोष्टी सरकारला जमत नाहीत, त्या गोष्टी मदरशांमधून सुरू केल्या आहेत. मुस्लिम समाजातील मुलांच्या शिक्षणासंदर्भातील सरकारचे धोरण चुकीचे असल्याचा दावा समाजातील जाणकारांकडून करण्यात येतो. मदरशांमधील मुलांना धार्मिक शिक्षणाबरोबरच बाह्य जगातील सायन्स, गणित, भाषा, आदी विषय शिकविले जातात. भाषेमध्ये मराठी, हिंदी व उर्दू शिकविली जाते. उर्दू शिकायची असेल, तर कमीत कमी १८० विद्यार्थी पाहिजेत. तरच एका शिक्षकाला वेतन देण्यात येते. खुल्या शाळेतून उर्दू शिकवायला शिक्षक मिळत नाहीत. याबाबत मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी सांगितले की, मुस्लिम समाजातील केवळ एक टक्का मुले मदरशांमध्ये शिक्षण घेतात. त्यातही अनाथ, गरीब मुलांचा समावेश असतो. अन्य मुले ही खुल्या शाळेतूनच शिक्षण घेतात. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला, तर राज्य सरकारकडून मदरशांसाठी चार कोटींचा निधी मंजूर केला जातो, प्रत्यक्षात १४-१५ लाख रुपयेच दिले जातात. त्यामुळे ८० टक्के मदरसांना सरकारची मदतच मिळत नाही. एकीकडे उर्दू शिक्षक द्यायचे नाहीत आणि दुसरीकडे मदरशांमधील विद्यार्थ्यांना शाळाबाह्य ठरवायचे, हे सरकारचे धोरण चुकीचे आहे.मुस्लिम समाजात धार्मिक विधी केले जातात. या विधींचे शिक्षण मदरशांमध्ये दिले जाते. लग्नाचे विधी, नमाज पठण, इस्लामचे तत्त्वज्ञान हे खुल्या शाळेत शिकविले जात नाहीत. ते शिक्षण मदरशांमध्ये दिले जाते. जर मदरशांमधील विद्यार्थी शाळाबाह्य ठरविले, तर मदरसा बंद होतील; मग धार्मिक विधी करायला धर्मगुरू कसे मिळतील? असा सवाल शिरोली येथील मदरशाचे विश्वस्त कादर मलबारी यांनी उपस्थित केला. कोल्हापूर जिल्ह्यात १२ मदरसे कोल्हापूर जिल्ह्यात १९७८ पासून मदरशांची संकल्पना अस्तित्वात आहे. उदगाव येथे प्रथम मदरसा सुरू झाले. सध्या उदगाव येथे २, शिरोली १, आजरा ३, चंदगड २ , इचलकरंजी २, आळते १, कुरुंदवाड येथे १, असे मदरसा आहेत. उच्चपदस्थ अधिकारीमदरशांमध्ये शिक्षण घेणारी मुलं पुढे बाह्य जगातील विविध क्षेत्रांतील शिक्षण घेतात. स्पर्धा परीक्षेला बसतात. उत्तर प्रदेशातील आजमगढचे मौलाना वशीऊर रहेमान हे २००८ मध्ये झालेल्या परीक्षेत ४२२ क्रमांकाच्या रॅँक ने आयकर आयुक्त बनले आहेत. रहेमान यांनी दारुल उलूम देवबंद दिल्ली मदरसा येथे शिक्षण घेतले आहे. अशी अनेक मुले सध्या देशभरात उच्चपदस्थ अधिकारी आहेत, अशी माहिती कादर मलबारी यांनी दिली.