शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

...तर धार्मिक विधी कोण करणार?

By admin | Updated: July 2, 2015 00:45 IST

मुस्लिम समाजाची प्रतिक्रिया : मुस्लिमांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम समाजातील मुलांना त्यांच्या हक्कांपासून, तसेच शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे राज्य सरकारमधील अधिकारी सातत्याने प्रयत्न करीत असून, मदरशांमधील मुलांना आता शाळाबाह्य ठरविणे, हा त्याचाच एक भाग असल्याची संतप्त प्रतिक्रिया मुस्लिम समाजातून व्यक्त होत आहे. मदरसा बंद पडले, तर समाजातील धार्मिक विधी कोण करणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात कोणती भूमिका घ्यावी, याबाबत १६ जुलैला चॉँद कमिटीच्या बैठकीत ठरविले जाईल, असेही सांगण्यात आले. शिक्षणाचा हक्क प्राप्त करून देण्यासाठी ज्या गोष्टी सरकारला जमत नाहीत, त्या गोष्टी मदरशांमधून सुरू केल्या आहेत. मुस्लिम समाजातील मुलांच्या शिक्षणासंदर्भातील सरकारचे धोरण चुकीचे असल्याचा दावा समाजातील जाणकारांकडून करण्यात येतो. मदरशांमधील मुलांना धार्मिक शिक्षणाबरोबरच बाह्य जगातील सायन्स, गणित, भाषा, आदी विषय शिकविले जातात. भाषेमध्ये मराठी, हिंदी व उर्दू शिकविली जाते. उर्दू शिकायची असेल, तर कमीत कमी १८० विद्यार्थी पाहिजेत. तरच एका शिक्षकाला वेतन देण्यात येते. खुल्या शाळेतून उर्दू शिकवायला शिक्षक मिळत नाहीत. याबाबत मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी सांगितले की, मुस्लिम समाजातील केवळ एक टक्का मुले मदरशांमध्ये शिक्षण घेतात. त्यातही अनाथ, गरीब मुलांचा समावेश असतो. अन्य मुले ही खुल्या शाळेतूनच शिक्षण घेतात. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला, तर राज्य सरकारकडून मदरशांसाठी चार कोटींचा निधी मंजूर केला जातो, प्रत्यक्षात १४-१५ लाख रुपयेच दिले जातात. त्यामुळे ८० टक्के मदरसांना सरकारची मदतच मिळत नाही. एकीकडे उर्दू शिक्षक द्यायचे नाहीत आणि दुसरीकडे मदरशांमधील विद्यार्थ्यांना शाळाबाह्य ठरवायचे, हे सरकारचे धोरण चुकीचे आहे.मुस्लिम समाजात धार्मिक विधी केले जातात. या विधींचे शिक्षण मदरशांमध्ये दिले जाते. लग्नाचे विधी, नमाज पठण, इस्लामचे तत्त्वज्ञान हे खुल्या शाळेत शिकविले जात नाहीत. ते शिक्षण मदरशांमध्ये दिले जाते. जर मदरशांमधील विद्यार्थी शाळाबाह्य ठरविले, तर मदरसा बंद होतील; मग धार्मिक विधी करायला धर्मगुरू कसे मिळतील? असा सवाल शिरोली येथील मदरशाचे विश्वस्त कादर मलबारी यांनी उपस्थित केला. कोल्हापूर जिल्ह्यात १२ मदरसे कोल्हापूर जिल्ह्यात १९७८ पासून मदरशांची संकल्पना अस्तित्वात आहे. उदगाव येथे प्रथम मदरसा सुरू झाले. सध्या उदगाव येथे २, शिरोली १, आजरा ३, चंदगड २ , इचलकरंजी २, आळते १, कुरुंदवाड येथे १, असे मदरसा आहेत. उच्चपदस्थ अधिकारीमदरशांमध्ये शिक्षण घेणारी मुलं पुढे बाह्य जगातील विविध क्षेत्रांतील शिक्षण घेतात. स्पर्धा परीक्षेला बसतात. उत्तर प्रदेशातील आजमगढचे मौलाना वशीऊर रहेमान हे २००८ मध्ये झालेल्या परीक्षेत ४२२ क्रमांकाच्या रॅँक ने आयकर आयुक्त बनले आहेत. रहेमान यांनी दारुल उलूम देवबंद दिल्ली मदरसा येथे शिक्षण घेतले आहे. अशी अनेक मुले सध्या देशभरात उच्चपदस्थ अधिकारी आहेत, अशी माहिती कादर मलबारी यांनी दिली.