शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी पवारांचे पाय कोणी चाटले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:20 IST

कोल्हापूर : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे पाय चाटायला कोण गेले होते, याचे उत्तर आधी द्या, ...

कोल्हापूर : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे पाय चाटायला कोण गेले होते, याचे उत्तर आधी द्या, अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी आशिष शेलार यांच्यावर पलटवार केला आहे. सत्ता हातातून गेल्यानेच शेलार व त्यांच्या टोळक्यांची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली आहे. तुणतुणे वाजवायची वेळ त्यांच्यावर आली आहे, आमच्यावर नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

येडेमच्छिंद्र येथे किसान आत्मनिर्भर यात्रेच्या प्रारंभ कार्यक्रमात आशिष शेलार यांनी, विधानपरिषदेच्या आमिषासाठी शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या राजू शेट्टी यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे, आडत दलालासाठी ते तुणतुणे घेऊन उभे आहेत, अशी टीका केली होती. त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनीही, आम्ही शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे म्हणून रस्त्यावरची लढाई करत आहोत. ज्या शेतकऱ्यांच्या घरात दोन जनावरे आहेत, त्यांना व्यावसायिक दराने वीज बिल आकारण्याचा निर्णय उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने घेतला आहे. भाजपचे सरकार शेतकऱ्यांसाठी हेच करत आले आहे, यावर आशिष शेलार गप्प का, असा सवालही त्यांनी केला. शेतकऱ्यांविषयी असे वागणाऱ्या भाजपच्या मागे शेतकऱ्यांनी का यावे, याचे आधी शेलारांनी उत्तर द्यावे. आम्हाला कुणाचे तुणतुणे हातात घेऊन बसायची सवय नाही. ते हातात घेण्याची वेळ कुणावर आली आहे, याचे स्वत: शेलारांनीच आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.