शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकीपेक्षा पूरग्रस्तांना मदत मिळणार की नाही, हा विषय महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:29 IST

: इचलकरंजीचा पाणीप्रश्न सोडवणे कुण्या बाजारबुणग्याचे काम नाही : इचलकरंजीत पदयात्रेचे जल्लोषी स्वागत इचलकरंजी : राजू शेट्टींचे १२ आमदारांच्या ...

: इचलकरंजीचा पाणीप्रश्न सोडवणे कुण्या बाजारबुणग्याचे काम नाही :

इचलकरंजीत पदयात्रेचे जल्लोषी स्वागत

इचलकरंजी : राजू शेट्टींचे १२ आमदारांच्या यादीत नाव आहे किंवा नाही, यापेक्षा सध्या माझ्या दृष्टीने पूरग्रस्तांना मदत मिळणार की नाही? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावर भाष्य करावे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. तसेच इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर कटकारस्थान करून मला खलनायक केले. ते आता निवडणूक झाल्यानंतर कुठे गेले असा सवाल करत शहराचा पाणीप्रश्न सोडवण्याचे काम कुण्या बाजारबुणग्यांचे नाही, हा प्रश्न सोडवण्यासाठी मलाच संघर्ष करावा लागणार आहेे, असे स्पष्ट केले.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेली आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची ही पदयात्रा पट्टणकोडोली, रुई, चंदूरमार्गे शनिवारी सायंकाळी इचलकरंजीत आली. येथील तीन बत्ती चौकात या पदयात्रेचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही पदयात्रा मुख्य मार्गावरून गावभागातील महादेव मंदिर चौकात पोहोचल्यावर त्याचे सभेत रूपांतर झाले. ४ दिवसांपासून शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी ही पदयात्रा सुरू असली तरी जिल्हाधिकारी, मंत्री अथवा राज्य शासनाकडून साधी विचारपूसही झाली, मात्र मी सत्तेत नसताना पदयात्रेदरम्यान सर्वच ठिकाणी झालेले स्वागत सरकारला चपराकच आहे.

पंतप्रधानांनी गुजरातच्या आपत्ती निवारणासाठी १ हजार कोटी रुपये दिले; मात्र त्यांना महाराष्ट्र आणि कोकणातील पूरग्रस्त का दिसले नाहीत? केंद्राचे पथक गुजरातला तातडीने पोहोचले; मात्र महाराष्ट्रात ते का आले नाहीत?, आपत्तीच्या काळातही महाराष्ट्र आणि गुजरात असा भेदभाव का?

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी मी अनेकांचे उंबरे झिंजवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी सूचक म्हणूनही चालतो. मात्र पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे १ मिनीट वेळ नाही, ही शोकांतिका आहे. सरकारकडे बुडव्यांना देण्यासाठी पैसे आहेत; मात्र पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी, शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी निधी नाही. सरकारला ही भूमिका महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शहराध्यक्ष रामदास कोळी, गोवर्धन दबडे, दीपाली बेडक्याळे, राजवर्धन नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर ही पदयात्रा शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथे मुक्कामी गेली.

चौकट - केंद्राकडून महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाबाबत महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांपैकी कोणीच काही बोलत नाही. कारण, बोलले की त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लागते, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

फोटो ओळी

1) इचलकरंजी येथील सभेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रामदास कोळी, गोवर्धन दबडे, दीपाली बेडक्याळे, राजवर्धन नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

2) इचलकरंजीत पदयात्रेचे जल्लोषी स्वागत करण्यात आले, यावेळी कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टीही केली.