शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

आमदारकीपेक्षा पूरग्रस्तांना मदत मिळणार की नाही, हा विषय महत्त्वाचा : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:29 IST

इचलकरंजी, जि. कोल्हापूर : बारा आमदारांच्या यादीत माझे नाव आहे किंवा नाही यापेक्षा सध्या माझ्या दृष्टीने पूरग्रस्तांना मदत मिळणार ...

इचलकरंजी, जि. कोल्हापूर : बारा आमदारांच्या यादीत माझे नाव आहे किंवा नाही यापेक्षा सध्या माझ्या दृष्टीने पूरग्रस्तांना मदत मिळणार की नाही? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावर भाष्य करावे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेली आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची ही पदयात्रा शनिवारी सायंकाळी इचलकरंजीत आली. त्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. चार दिवसांपासून शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी ही पदयात्रा सुरू असली तरी जिल्हाधिकारी, मंत्री अथवा राज्य शासनाकडून साधी विचारपूसही झाली, मात्र मी सत्तेत नसताना पदयात्रेदरम्यान सर्वच ठिकाणी झालेले स्वागत सरकारला चपराकच आहे, असे शेट्टी म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी मी अनेकांचे उंबरे झिंजवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी सूचक म्हणूनही चालतो. मात्र पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे १ मिनिट वेळ नाही, ही शोकांतिका आहे. सरकारकडे बुडव्यांना देण्यासाठी पैसे आहेत; मात्र पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी, शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी निधी नाही. सरकारला ही भूमिका महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

स्वाभिमानीचा आज जलसमाधी मोर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जलसमाधी मोर्चा आज रविवारी नृसिंहवाडीत दाखल होणार असून, संघटनेचे नेते राजू शेट्टी व संघटनेच्या एकाही कार्यकर्त्याला नृसिंहवाडीत अथवा नदीक्षेत्र परिसरात प्रवेश करता येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चारशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नृसिंवाडीत प्रवेश करणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.