शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम समित्या सक्रिय होणार कधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:23 IST

शुभम गायकवाड उदगाव : कोरोनाने सध्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असली तरी कोरोना ...

शुभम गायकवाड

उदगाव : कोरोनाने सध्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असली तरी कोरोना प्रतिबंधासाठी खास नेमलेल्या ग्राम समित्या अजूनही निद्रावस्थेत दिसून येत आहेत. त्यामुळे काेरोनाला आळा घालायचा असेल तर ग्राम समित्यांना सक्रिय होण्याची गरज आहे.

ग्रामीण भाग हा सद्य:स्थितीत रुग्णसंख्येच्या बाबतीत कमी दिसत असला तरी सध्या वाढणारी संख्या ही नक्कीच चिंताजनक आहे. सुरुवातीला कोरोना रुग्ण सापडल्यास त्याचे घर कंटेन्टमेंट करणे, घरातील इतरांची टेस्ट करण्यास भाग पाडणे, शेजारील नागरिकांना समुपदेशन करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला मदत करणे, व्यापारी व भाजीपाला व्यावसायिकांना आचारसंहिता घालून देणे, परगावातून किंवा राज्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी झाली आहे की, नाही याची पडताळणी करणे ही कामे स्थानिक पोलीस व आरोग्य विभाग करत होता; परंतु रुग्णांची संख्या हाताबाहेर गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम समिती ही संकल्पना गावागावात राबविण्याचे आदेश दिले; परंतु तद्नंतर रुग्णसंख्या कमी झाल्याने या समित्यांनी आपले काम बंद केले आहे. ते तातडीने सुरू केले तरच ग्रामीण भागात कोरोनाला रोखले जाऊ शकते.

चौकट : अशी असते समिती

सरपंच- अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी, भाजीपाला व्यावसायिक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक.

कोट : ग्रामीण भागात सध्या रुग्णसंख्या नसली तरी तिसऱ्या लाटेमुळे चिंतेचे वातावरण आहे. गावातील सर्वसमावेशक नागरिकाचा ग्राम समितीमध्ये समावेश असल्याने शासनाच्या निर्णयांची योग्य अंमलबजावणी होऊ शकते. आम्ही तात्काळ समितीच्या माध्यमातून काम

सुरू करणार आहोत.

- कलीमून नदाफ, सरपंच, ग्रामपंचायत उदगाव