शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावड्याचा मागासलेपणा कधी दूर होणार ?

By admin | Updated: November 5, 2014 23:43 IST

नव्या सरकारकडून अपेक्षा : तालुक्याची नेहमीच उपेक्षा; मोठी वनसंपदा, संधी असूनही दुर्लक्षित--गगनबावडा तालुका

एम. ए. शिंदे ल्ल साळवण --डोंगराळ, दुर्गम, कमी लोकसंख्येचा छोटा तालुका म्हणून जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सदैव उपेक्षित राहिलेल्या गगनबावड्याचे मागासलेपण दूर होऊन विकासाची गंगा कधी वाहणार हाच खरा प्रश्न आहे. छोटेपणामुळे तालुक्याला लोकसभा, विधानसभेचे दरवाजे प्रतिनिधींच्या रूपाने कधी ठोठावताच आले नाहीत. प्रत्येक निवडणुकीत तर तालुक्यातील उपऱ्या उमेदवारांचाच जयघोष करावा लागतो. वनसंपदेने नटलेल्या तालुक्याला ना पर्यटन क्षेत्राचे भाग्य लाभले, ना उद्योगधंद्याची चव चाखायला मिळाली. मिनी महाबळेश्वर म्हणवत असताना विकासाकडे मात्र आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी पाठ फिरविली. रेंगाळलेले प्रश्न सोडवून नवे सरकार तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार का? हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल.तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्यात एक अधिकारी आणि ४३ कर्मचारी असणे अपेक्षित आहे. मात्र, येथे सध्या केवळ एक अधिकारी व २७ कर्मचारी कार्यरत आहेत. अद्याप १६ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तालुक्याचा बहुतेक भाग डोंगराळ, दुर्गम असल्यामुळे कामांचा निपटारा होण्यासाठी सर्व रिक्त जागा भरणे गरजेचे आहे. नव्याने पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, त्यात विभागनिहाय खोल्या नाहीत. अद्याप तेथे तीन ते चार खोल्यांची कमतरता असून, मिटिंग हॉल असणे आवश्यक होते. कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. सर्व दरवाजे आणि खिडक्या मोडल्या आहेत. काही खोल्यांना केवळ चौकटी उभ्या असलेल्या दिसतात. खोल्यांच्या आतील बाजूस, तसेच स्लॅबवर गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे. व्हरांड्याचा कठडा तुटला आहे. तसेच सर्व भिंती खराब झाल्या आहेत. सर्व खोल्या वापरण्यास अयोग्य झाल्या असून, तेथे सध्या सापांचे वास्तव्य आहे. कर्मचाऱ्यांच्या निवासाची मोठी अडचण निर्माण झाली असून, सध्या अनेकजण भाडोत्री खोल्यांतून राहत आहेत. कर्मचारी निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबित असून, तो मार्गी लागणे आवश्यक आहे.केंद्र शासनाच्या निधीतून मंजूर झालेले आणि तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेमार्फत चालविले जात असलेले साखरी येथील ‘मॉडेल स्कूल’ सर्वार्थाने मॉडेल कधी बनणार? या शाळेला ग्रामपंचायतीने गायरानमधील जागा दिलेली आहे. ही शाळा निवासी स्वरूपाची होणार असून, तिचे कामकाज नवोदयच्या धर्तीवर चालविणे अपेक्षित आहे. सध्या येथे अध्यापक वर्ग हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून मानधनावर भरला आहे. या ठिकाणी पूर्ण क्षमतेने काम करणारा व निवासी स्वरूपाचा कर्मचारी वर्ग नियुक्त होणे अपेक्षित आहे. तीन वर्षे झाली तरी जुन्याच प्राथमिक शाळेच्या इमारतीत ही शाळा भरत आहे. शाळेसाठी नव्या जागेत इमारत, क्रीडांगण व निवासासाठी अद्ययावत वसतिगृह होणे गरजेचे आहे. अनेक प्रश्न पोटात सामावून घेऊन जगणाऱ्या गगनबावड्याला न्याय कधी मिळणार आणि प्रश्नांची सोडवणूक बदललेली राजकीय समीकरणे सोडविणार काय? हाच खरा प्रश्न आहे; अन्यथा ‘कुठे मागे नेऊन ठेवलात गगनबावडा माझा’, असे म्हणण्याची वेळ गगनबावडावासीयांवर येईल.गगनबावडा येथे २००८ साली तत्कालीन मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते क्रीडासंकुलाचे उद्घाटन झाले होते. २५ लाखांच्या निधीमधील या क्रीडासंकुलावरती सुमारे १२ लाखांचा निधी खर्ची पडला आहे. मात्र, संकुलाचे काम अर्धवट आहे. धावपट्टी तयार केली आहे. मात्र, या धावपट्टीच्या कडा अनेक ठिकाणी ढासळल्या आहेत. मैदानावर झाडे-झुडपे आणि गवत प्रचंड प्रमाणात वाढले आहे. क्रीडासंकुलाचे ठिकाण तालुक्याच्या एका टोकाला जिथे तीन महिने पाऊस पडतो, अशा गगनबावड्यात आहे. साळवण या मध्यवर्ती ठिकाणी हे क्रीडासंकुल झाले असते, तर खेळाडूंना त्याचा लाभ झाला असता.पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचा अपवाद वगळता तालुक्यात शेतीशिवाय कोणताच उद्योगधंदा नाही. महाविद्यालये आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून बाहेर पडणाऱ्या युवकांच्या हाताला कामधंदा नाही. अनेकांचे मन निसर्गाचा लहरीपणा आणि तोट्यात जाणाऱ्या शेतीमध्ये रमत नाही. मिनी एमआयडीसीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला, तर बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. येथील रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू झाले, तर महिलांना काम मिळून बचत गटांना बळकटी येईल.टेकवाडीचे दुर्दैवपुरामुळे दरवर्षी टेकवाडीला बेटाचे स्वरूप प्राप्त होते. तेथील ग्रामस्थांचा महापुरात संपर्क तुटतो. लोकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते. कुंभी नदीच्या वेगवान प्रवाहामुळे टेकवाडीची नदीकडील बाजूची सतत झीज होत आहे. येथील संरक्षण भिंतीचा प्रस्ताव प्रस्तावित होणे महत्त्वाचे आहे.तालुक्याला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले आहे. सह्याद्रीच्या रांगेत विसावलेल्या तालुक्यात पर्यटनदृष्ट्या विकास करता येण्यासारखे असे अनेक स्पॉट आहेत. भुरळ पाडणारी पळसंब्याची पांडवकालीन लेणी, मोरजाईचे विस्तीर्ण पठार, खुणावणारे कोदे, अणदूर, लखमापूर, लघू पाटबंधारे, साळवण येथे कुंभी- सरस्वतीच्या संगमावर वसलेले ऐतिहासिक भवानी मातेचे मंदिर, आजूबाजूचा परिसर यांच्या सुशोभीकरणाचा प्रश्न रखडला आहे. वनविभागाच्या कार्यक्षेत्रात हा परिसर येत असल्यामुळे वनविभागाने अनेकवेळा या परिसराचा विकास आराखडा बनविला. मात्र, अद्याप हा आराखडा कागदावरच राहिला आहे.