शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

भोगावती नदीचे भोग संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:29 IST

राजेंद्र पाटील लोकमत न्यूज नेटवर्क भोगावती : राधानगरी, करवीरसह अनेक भागांची तहान भागविणाऱ्या नद्यांमध्ये भोगावती नदीचाही मोलाचा वाटा आहे. ...

राजेंद्र पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

भोगावती : राधानगरी, करवीरसह अनेक भागांची तहान भागविणाऱ्या नद्यांमध्ये भोगावती नदीचाही मोलाचा वाटा आहे. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांत वाढते अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे या नैसर्गिक स्रोताला बाधा पोहोचली आहे. नदी अरुंद होऊन हाहाकार माजविण्यास या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. भोगावतीच्या वाट्याला आलेले हे भोग संपणार कधी? या प्रश्नाचे उत्तर कोणी देईल, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कोल्हापूरच्या नैर्ऋत्येस सुमारे ४८ कि.मी. अंतरावरील फोंडाघाटाच्या बाजूला उगवादेवीच्या डोंगराळ आणि दाट जंगलाने व्याप्त असलेल्या भागातून भोगावती नदीचा प्रवाह सुरू होतो. अनेक वळणे घेत या नदीचा आणि तुळशी नदीचा महे येथे संगम होतो, पुढे प्रयाग चिखली येथे त्यांचा पंचगंगेत समावेश होतो. भोगावती नदीने महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कृषी आदी क्षेत्रांत क्रांती घडवून आणली. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे या नदीच्या प्रवाहात अनेक अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी नदीच्या पात्रात घुसून पाण्यात जिवंत राहणारी बच्चाची झाडे लावत आहेत. नदीकाठावरील उन्मळून पडणारी झाडांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे जमिनीशी संपर्क आल्यानंतर या झाडांना पालवी फुटून ती अस्ताव्यस्त पसरली जातात, तसेच नदीकाठावर पाण्याच्या मोटर असून, बऱ्याच शेतकऱ्यांनी मोटरीचे फौंडेशन ‌घट्ट रहावे म्हणून बांधकामे केली आहेत. त्याचबरोबर प्रवाहाच्या ८२ कि.मी. अंतराच्या नदीकाठावरील अनेक गावांमधील सांडपाणी थेट नदीत मिसळते, तसेच अन्य कचराही थेट नदीत टाकला जातो. या सर्वांमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याची शासनाच्या संबंधित विभागाने वेळीच दखल न घेतल्यास त्याचे भविष्यकाळात गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष का?

नदीच्या पाण्याचा सार्वजनिक वापर करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शासनाचा पाटबंधारे विभाग नियमित पाणीपट्टी वसूल करतो. असे असताना नैसर्गिक स्रोताला पोहोचत असलेल्या हानीकडे हा विभाग दुर्लक्ष का करीत आहे. जबाबदार घटकांवर कारवाई का होत नाही? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत.

(या बातमीला प्रतिक्रया देणार आहेत...)

फोटो ओळी : भोगावती नदीपात्रात कोसळलेल्या वृक्षामुळे नदीने आपली दिशा बदललेली दिसत आहे.