शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

भोगावती नदीचे भोग संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:29 IST

राजेंद्र पाटील लोकमत न्यूज नेटवर्क भोगावती : राधानगरी, करवीरसह अनेक भागांची तहान भागविणाऱ्या नद्यांमध्ये भोगावती नदीचाही मोलाचा वाटा आहे. ...

राजेंद्र पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

भोगावती : राधानगरी, करवीरसह अनेक भागांची तहान भागविणाऱ्या नद्यांमध्ये भोगावती नदीचाही मोलाचा वाटा आहे. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांत वाढते अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे या नैसर्गिक स्रोताला बाधा पोहोचली आहे. नदी अरुंद होऊन हाहाकार माजविण्यास या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. भोगावतीच्या वाट्याला आलेले हे भोग संपणार कधी? या प्रश्नाचे उत्तर कोणी देईल, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कोल्हापूरच्या नैर्ऋत्येस सुमारे ४८ कि.मी. अंतरावरील फोंडाघाटाच्या बाजूला उगवादेवीच्या डोंगराळ आणि दाट जंगलाने व्याप्त असलेल्या भागातून भोगावती नदीचा प्रवाह सुरू होतो. अनेक वळणे घेत या नदीचा आणि तुळशी नदीचा महे येथे संगम होतो, पुढे प्रयाग चिखली येथे त्यांचा पंचगंगेत समावेश होतो. भोगावती नदीने महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कृषी आदी क्षेत्रांत क्रांती घडवून आणली. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे या नदीच्या प्रवाहात अनेक अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी नदीच्या पात्रात घुसून पाण्यात जिवंत राहणारी बच्चाची झाडे लावत आहेत. नदीकाठावरील उन्मळून पडणारी झाडांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे जमिनीशी संपर्क आल्यानंतर या झाडांना पालवी फुटून ती अस्ताव्यस्त पसरली जातात, तसेच नदीकाठावर पाण्याच्या मोटर असून, बऱ्याच शेतकऱ्यांनी मोटरीचे फौंडेशन ‌घट्ट रहावे म्हणून बांधकामे केली आहेत. त्याचबरोबर प्रवाहाच्या ८२ कि.मी. अंतराच्या नदीकाठावरील अनेक गावांमधील सांडपाणी थेट नदीत मिसळते, तसेच अन्य कचराही थेट नदीत टाकला जातो. या सर्वांमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याची शासनाच्या संबंधित विभागाने वेळीच दखल न घेतल्यास त्याचे भविष्यकाळात गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष का?

नदीच्या पाण्याचा सार्वजनिक वापर करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शासनाचा पाटबंधारे विभाग नियमित पाणीपट्टी वसूल करतो. असे असताना नैसर्गिक स्रोताला पोहोचत असलेल्या हानीकडे हा विभाग दुर्लक्ष का करीत आहे. जबाबदार घटकांवर कारवाई का होत नाही? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत.

(या बातमीला प्रतिक्रया देणार आहेत...)

फोटो ओळी : भोगावती नदीपात्रात कोसळलेल्या वृक्षामुळे नदीने आपली दिशा बदललेली दिसत आहे.