शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

प्राणीमित्रांनी बैलजोडी कधी सांभाळली?

By admin | Updated: January 9, 2016 00:38 IST

सदाभाऊ खोत : राजू शेट्टी संसदेतही बैलगाडी शर्यत बंदी उठविण्याचा कायदा संमत करतील

सांगली : आलिशान बंगल्यात राहणाऱ्यांना गावाकडील शेतकरी कशा पद्धतीने बैलांवर प्रेम करतात, हे कसे कळणार? प्राणीमित्रांनी बैलजोडी संभाळली असती, म्हणजे त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळले असते. मग त्यांनी बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी कधीच केली नसती, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा वटहुकूम काढला असून, सहा महिन्यात संसदेत तो संमत होणार आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी देशातील खासदारांना एकत्र करून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा कायदा संमत करून घेतील, असेही खोत यांनी सांगितले.ते म्हणाले की, खिलार गाई व बैलांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर बैलगाडी शर्यती चालू राहिल्या पाहिजेत, या मागणीसाठी आम्ही २०१२ पासून राज्यभर आंदोलने केली आहेत. खासदार शेट्टी यांनीही या शर्यतीवरील बंदी उठविण्याची मागणी संसदेत केली होती. आताही आम्ही आळंदी येथे राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला होता. मात्र, शासनाने त्यापूर्वीच शर्यतीवरील बंदी उठविल्यामुळे, आळंदी येथे विजय मेळावा साजरा करणार आहोत. केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यांत शर्यतीवरील बंदी उठविण्याचा कायदा राज्यसभा व लोकसभेमध्ये संमत झाला पाहिजे. त्यादृष्टीने खासदार शेट्टी देशातील खासदारांना बैलगाडी शर्यतींचे शेतकऱ्यांच्यादृष्टीने किती महत्त्व आहे ते पटवून देतील. त्यामुळे दोन्ही सभागृहांत हा कायदा संमत होऊन कायदेशीरदृष्ट्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यास मदत होणार आहे. या निर्णयाविरोधात आता तरी प्राणीमित्रांनी कुरघोड्या करू नयेत. त्यांनी बैलगाडी शर्यत बंदीची मागणी करण्यापूर्वी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत, असेही खोत म्हणाले. (प्रतिनिधी)समाजसेवकांचा देशभर सुळसुळाटकाखेत शबनम बॅग अडकविली की लगेच समाजकारणी झालो, असा आव आणणाऱ्यांची संख्या देशात मोठी आहे. या समाजसेवकांचा देशभर सुळसुळाट झाला आहे. आलिशान बंगल्यात राहायचे, शेती करायची नाही, पशुधन सांभाळायचे नाही पण, त्यांच्या व्यथा आम्हालाच खूप कळतात, असा आव मात्र आणायचा. गावगाडा कसा चालतो, हेही त्यांना माहीत नसते. यांच्या अशा भूमिकेमुळेच खिलार जनावरे संपण्याच्या मार्गावर आहेत, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी प्राणीमित्रांवर केली.