शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

प्राणीमित्रांनी बैलजोडी कधी सांभाळली?

By admin | Updated: January 9, 2016 00:38 IST

सदाभाऊ खोत : राजू शेट्टी संसदेतही बैलगाडी शर्यत बंदी उठविण्याचा कायदा संमत करतील

सांगली : आलिशान बंगल्यात राहणाऱ्यांना गावाकडील शेतकरी कशा पद्धतीने बैलांवर प्रेम करतात, हे कसे कळणार? प्राणीमित्रांनी बैलजोडी संभाळली असती, म्हणजे त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळले असते. मग त्यांनी बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी कधीच केली नसती, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा वटहुकूम काढला असून, सहा महिन्यात संसदेत तो संमत होणार आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी देशातील खासदारांना एकत्र करून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा कायदा संमत करून घेतील, असेही खोत यांनी सांगितले.ते म्हणाले की, खिलार गाई व बैलांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर बैलगाडी शर्यती चालू राहिल्या पाहिजेत, या मागणीसाठी आम्ही २०१२ पासून राज्यभर आंदोलने केली आहेत. खासदार शेट्टी यांनीही या शर्यतीवरील बंदी उठविण्याची मागणी संसदेत केली होती. आताही आम्ही आळंदी येथे राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला होता. मात्र, शासनाने त्यापूर्वीच शर्यतीवरील बंदी उठविल्यामुळे, आळंदी येथे विजय मेळावा साजरा करणार आहोत. केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यांत शर्यतीवरील बंदी उठविण्याचा कायदा राज्यसभा व लोकसभेमध्ये संमत झाला पाहिजे. त्यादृष्टीने खासदार शेट्टी देशातील खासदारांना बैलगाडी शर्यतींचे शेतकऱ्यांच्यादृष्टीने किती महत्त्व आहे ते पटवून देतील. त्यामुळे दोन्ही सभागृहांत हा कायदा संमत होऊन कायदेशीरदृष्ट्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यास मदत होणार आहे. या निर्णयाविरोधात आता तरी प्राणीमित्रांनी कुरघोड्या करू नयेत. त्यांनी बैलगाडी शर्यत बंदीची मागणी करण्यापूर्वी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत, असेही खोत म्हणाले. (प्रतिनिधी)समाजसेवकांचा देशभर सुळसुळाटकाखेत शबनम बॅग अडकविली की लगेच समाजकारणी झालो, असा आव आणणाऱ्यांची संख्या देशात मोठी आहे. या समाजसेवकांचा देशभर सुळसुळाट झाला आहे. आलिशान बंगल्यात राहायचे, शेती करायची नाही, पशुधन सांभाळायचे नाही पण, त्यांच्या व्यथा आम्हालाच खूप कळतात, असा आव मात्र आणायचा. गावगाडा कसा चालतो, हेही त्यांना माहीत नसते. यांच्या अशा भूमिकेमुळेच खिलार जनावरे संपण्याच्या मार्गावर आहेत, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी प्राणीमित्रांवर केली.