शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

प्राणीमित्रांनी बैलजोडी कधी सांभाळली?

By admin | Updated: January 9, 2016 00:38 IST

सदाभाऊ खोत : राजू शेट्टी संसदेतही बैलगाडी शर्यत बंदी उठविण्याचा कायदा संमत करतील

सांगली : आलिशान बंगल्यात राहणाऱ्यांना गावाकडील शेतकरी कशा पद्धतीने बैलांवर प्रेम करतात, हे कसे कळणार? प्राणीमित्रांनी बैलजोडी संभाळली असती, म्हणजे त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळले असते. मग त्यांनी बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी कधीच केली नसती, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा वटहुकूम काढला असून, सहा महिन्यात संसदेत तो संमत होणार आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी देशातील खासदारांना एकत्र करून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा कायदा संमत करून घेतील, असेही खोत यांनी सांगितले.ते म्हणाले की, खिलार गाई व बैलांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर बैलगाडी शर्यती चालू राहिल्या पाहिजेत, या मागणीसाठी आम्ही २०१२ पासून राज्यभर आंदोलने केली आहेत. खासदार शेट्टी यांनीही या शर्यतीवरील बंदी उठविण्याची मागणी संसदेत केली होती. आताही आम्ही आळंदी येथे राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला होता. मात्र, शासनाने त्यापूर्वीच शर्यतीवरील बंदी उठविल्यामुळे, आळंदी येथे विजय मेळावा साजरा करणार आहोत. केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यांत शर्यतीवरील बंदी उठविण्याचा कायदा राज्यसभा व लोकसभेमध्ये संमत झाला पाहिजे. त्यादृष्टीने खासदार शेट्टी देशातील खासदारांना बैलगाडी शर्यतींचे शेतकऱ्यांच्यादृष्टीने किती महत्त्व आहे ते पटवून देतील. त्यामुळे दोन्ही सभागृहांत हा कायदा संमत होऊन कायदेशीरदृष्ट्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यास मदत होणार आहे. या निर्णयाविरोधात आता तरी प्राणीमित्रांनी कुरघोड्या करू नयेत. त्यांनी बैलगाडी शर्यत बंदीची मागणी करण्यापूर्वी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत, असेही खोत म्हणाले. (प्रतिनिधी)समाजसेवकांचा देशभर सुळसुळाटकाखेत शबनम बॅग अडकविली की लगेच समाजकारणी झालो, असा आव आणणाऱ्यांची संख्या देशात मोठी आहे. या समाजसेवकांचा देशभर सुळसुळाट झाला आहे. आलिशान बंगल्यात राहायचे, शेती करायची नाही, पशुधन सांभाळायचे नाही पण, त्यांच्या व्यथा आम्हालाच खूप कळतात, असा आव मात्र आणायचा. गावगाडा कसा चालतो, हेही त्यांना माहीत नसते. यांच्या अशा भूमिकेमुळेच खिलार जनावरे संपण्याच्या मार्गावर आहेत, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी प्राणीमित्रांवर केली.