शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पाहरा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

चांदोली अभयारण्यग्रस्तांना न्याय कधी?

By admin | Updated: April 2, 2015 00:39 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : सतराव्या दिवशीही आंदोलन सुरूच

कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीच दखल न घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत ठिय्या आंदोलन बुधवारी सतराव्या दिवशीही सुरू होते.शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडीचे ठरल्याप्रमाणे खास पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन बुधवारी सतराव्या दिवशीही सुरूहोते. त्याचबरोबर वनविभागाने मंत्रालयात बैठक घेण्याबाबत कोणतीच भूमिका न घेतल्याने वनविभागाने मंत्रालयात बैठक घेण्याचा निर्णय न झाल्याने शनिवारी आंदोलकांनी अभयारण्याकडे जाणाऱ्या अंबाईवाडी व खुंदलापूर या दोन्ही फाटकांवर ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाचा बुधवारचा तिसरा दिवस आहे.प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्रातील जमीन संपादन, बुडित गावातील घरे, ताली व जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी ३४ कोटी ८५ लाख ९८ हजार १५५ रुपये इतका निधी तातडीने मिळावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. गेली १७ वर्षे प्रकल्पग्रस्तांना स्थलांतरित करून शासनाने अद्याप पुनर्वसन न केल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली डी. के. बोडके, शंकर पाटील, शिवाजी पाटील, वसंत पाटील, भागोजी गावडे, धोंडिबा बडेकर, अशोक सोनार, चंद्रकांत बेलवनकर, आदींसह प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. मदतीच्या हातांची गरजआपल्या जमिनी देऊन पुनर्वसनासाठी कित्येक वर्षे संघर्ष करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचा वनवास अजून संपलेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सतराव्या दिवशीही त्यांचे आंदोलन सुरु आहे. सध्या चटके देणारे रणरणते उन्ह असतानाही साध्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. गावाकडून जेवण आले तर ठीक, नाही तर सकाळच्या एकवेळच्या जेवणावरच आपली भूक भागवून त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली आहे. सामाजिक बांधीलकीतून कोल्हापूरवासीयांनी त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.