शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

मटकाप्रकरणी बड्या धेंड्यांवर कारवाई कधी?

By admin | Updated: May 13, 2016 00:57 IST

इचलकरंजीचे पोलिस गप्प का? : नावे जाहीर, कोणतीच हालचाल नाही

इचलकरंजी : शहरात अवैध व्यवसाय जोरदारपणे सुरू असल्याचे दाखवून देत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कारवाई करून मटका व्यवसायातील बड्या बुकीचालकांची नावे जाहीर केली. त्यामुळे स्थानिक पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. एवढे होऊनही अद्याप नावे जाहीर झालेल्या बड्या प्रमुख मटकाचालकांवर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुखांचा येथील पोलिसांवर वचक नसल्याची चर्चा नागरिकांतून सुरू आहे.काही वर्षांपूर्वी अवैध व्यवसायातून वारेमाप पैसा मिळवून मोठे झालेल्या या बड्या धेंड्यांनी शहरात आपली दहशत निर्माण करीत गुन्हेगारी प्रस्थ वाढविले होते. या गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिस दलात हालचाली होऊन या ठिकाणी आयपीएस अधिकारी एस. चैतन्य यांची नियुक्ती झाली. त्यांनी रुजू झालेल्या दिवसापासूनच कारवाईचा धडाका सुरू केला. स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह पोलिसही अवैध व्यवसायिकांना पाठीशी घालत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी मानसिंग खोचे यांच्या नेतृत्वाखाली एक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) स्थापन केली.दोघांनी मिळून कारवाया करीत शहरात फोफावलेल्या या गुंडगिरीचा बीमोड केला. त्यानंतर बरेच दिवस शहरात निर्भयपणाचे वातावरण होते. दरम्यान, दोन्ही अधिकाऱ्यांच्या येथून बदल्या झाल्या. त्यानंतर पोलिस ठाण्यातील स्थानिक अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे हे अवैध व्यावसायिक पुन्हा डोके वर काढू लागले. शहरात सर्व काही आलबेल असल्याचे वरिष्ठांना भासवले जाऊ लागले. मात्र, सोमवारी रात्री कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने शहरातील वैरण बाजार, शाहू पुतळा, लिगाडे मळा, भोने माळ, मराठा चौक या ठिकाणी राजरोसपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापे मारत सातजणांना अटक केली. यामध्ये नगरसेवक संजय तेलनाडे, मनीष अग्रवाल, राकेश अग्रवाल, वैजनाथ पाटील, आसिफमुल्ला, सुनील पवार, सुदर्शन बाबर यांचा बुकीमालक म्हणून समावेश आहे. तसेच या बुकीमालकांकडे प्रकाश ढेरे, सुनील गायकवाड, शीतल इजारे, संतोष कुपटे, बाळू कोरवी हे एजंट म्हणून काम करीत असल्याची माहितीही तपासांत समोर आली आहे. या कारवाईनंतर स्थानिक पोलिसांनी पुढील कारवाई करणे आवश्यक होते. मात्र, याबाबत कोणतीच हालचाल दिसून येत नाही. (वार्ताहर)कारवाईबाबत चर्चाचकारवाईबाबत जिल्हा पोलिसप्रमुखांचे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे धोरण आहे का? यापुढील कारवाईबाबत निर्णय कोण घेणार? असे अनेक उलट-सुलट प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहेत.