शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
3
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
4
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
5
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
6
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
7
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
8
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
9
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
10
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
11
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
12
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
13
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
14
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
15
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
16
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
17
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
18
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
19
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
20
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसतील तर सत्तेचा काय फायदा?

By admin | Updated: January 1, 2015 00:01 IST

राजू शेट्टी : साखर आयुक्तांच्या दारात बसणार

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी कारखानदारांचा काँग्रेसच्या राजवटीत जसा व्यवहार होता तसाच तो राहणार असेल आणि राज्य सरकार नुसते बघ्याचीच भूमिका घेणार असेल, तर आम्हाला गप्प बसून चालणार नाही. आम्ही सत्तेत गेलो व सत्तेचा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होणार नसेल, तर अशी सत्ता काय कामाची, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली. एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी यासाठी साखर आयुक्तांच्या दारात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेट्टी यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे आणि सहकार सचिव राजगोपाल देवरा यांच्याशी यंदाच्या ऊसदरप्रश्नी चर्चा झाली. आम्ही फार काळ वाट पाहू शकत नाही व सरकारनेही आमचा अंत पाहू नये, असा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. केंद्र सरकारने मदत करावी म्हणून पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना यापूर्वीच निवेदन दिले आहे. ऊसदर मंडळाच्या बैठकीतही जे कारखाने एफआरपी एकरकमी देणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा निर्णय झाला आहे. कायद्यानुसार एफआरपी द्यावीच लागेल, असेही बैठकीत स्पष्ट केले होते, असे असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने वगळता अन्य जिल्ह्यांतील कारखाने सोयीनुसार व जमेल तेवढे पैसे शेतकऱ्यांना देऊ लागले आहेत. काही कारखान्यांनी दीड महिन्यांत शेतकऱ्यांना दमडीही दिलेली नाही. अशा स्थितीत सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज होती; परंतु सरकार वेळकाढू भूमिका घेणार असेल तर आम्हाला गप्प बसून चालणार नाही. सोलापुरात मोर्चा झाला. सांगलीत कालच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. आता आम्ही पुण्यात साखर आयुक्त कार्यालयाच्या दारात जाऊन ठिय्या मारू. ती वेळ सरकारने आमच्यावर आणू नये, असे आमचे सरकारला सांगणे आहे.राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून, सहभागाविषयी विचारले असता शेट्टी म्हणाले, त्यासंदर्भातील चर्चा अजूनही मोघम स्वरूपात आहे. (प्रतिनिधी)