शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
5
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
6
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
7
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
8
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
9
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
10
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
11
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
12
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
13
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
14
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
15
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
16
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
17
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
18
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
19
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
20
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसतील तर सत्तेचा काय फायदा?

By admin | Updated: January 1, 2015 00:01 IST

राजू शेट्टी : साखर आयुक्तांच्या दारात बसणार

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी कारखानदारांचा काँग्रेसच्या राजवटीत जसा व्यवहार होता तसाच तो राहणार असेल आणि राज्य सरकार नुसते बघ्याचीच भूमिका घेणार असेल, तर आम्हाला गप्प बसून चालणार नाही. आम्ही सत्तेत गेलो व सत्तेचा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होणार नसेल, तर अशी सत्ता काय कामाची, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली. एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी यासाठी साखर आयुक्तांच्या दारात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेट्टी यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे आणि सहकार सचिव राजगोपाल देवरा यांच्याशी यंदाच्या ऊसदरप्रश्नी चर्चा झाली. आम्ही फार काळ वाट पाहू शकत नाही व सरकारनेही आमचा अंत पाहू नये, असा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. केंद्र सरकारने मदत करावी म्हणून पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना यापूर्वीच निवेदन दिले आहे. ऊसदर मंडळाच्या बैठकीतही जे कारखाने एफआरपी एकरकमी देणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा निर्णय झाला आहे. कायद्यानुसार एफआरपी द्यावीच लागेल, असेही बैठकीत स्पष्ट केले होते, असे असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने वगळता अन्य जिल्ह्यांतील कारखाने सोयीनुसार व जमेल तेवढे पैसे शेतकऱ्यांना देऊ लागले आहेत. काही कारखान्यांनी दीड महिन्यांत शेतकऱ्यांना दमडीही दिलेली नाही. अशा स्थितीत सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज होती; परंतु सरकार वेळकाढू भूमिका घेणार असेल तर आम्हाला गप्प बसून चालणार नाही. सोलापुरात मोर्चा झाला. सांगलीत कालच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. आता आम्ही पुण्यात साखर आयुक्त कार्यालयाच्या दारात जाऊन ठिय्या मारू. ती वेळ सरकारने आमच्यावर आणू नये, असे आमचे सरकारला सांगणे आहे.राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून, सहभागाविषयी विचारले असता शेट्टी म्हणाले, त्यासंदर्भातील चर्चा अजूनही मोघम स्वरूपात आहे. (प्रतिनिधी)