शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

मुख्यमंत्र्यांची हिंसेबाबत भूमिका काय?

By admin | Updated: March 25, 2015 00:41 IST

भारत पाटणकर : सामाजिक अन्याय प्रतिबंधक चळवळ, श्रमिक मुक्ती दलाची निर्धार सभा

कोल्हापूर : ‘राज्यात पुरोगामी नेत्यांचे एकापाठोपाठ खून होत आहेत, तसेच आणखी काही नेत्यांवर अशी वेळ येणार असल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसेबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी,’ असे आवाहन श्रमिक क्रांती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी मंगळवारी येथे बोलताना केले.‘सनातन प्रभात’सारख्या वृत्तपत्रातून विखारी लिखाण करून समाजात तेढ निर्माण केली जात असताना मुख्यमंत्री त्यांना का जाब विचारत नाहीत, असा संतप्त सवालही त्यांनी विचारला. येथील शाहू स्मारक भवनात सामाजिक अन्याय प्रतिबंधक चळवळ व श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आयोजित निर्धार सभेत डॉ. पाटणकर बोलत होते.राज्यातील नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या लोकांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांना मारले. आता आणखी काही कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊन मोर्चा काढायचे ठरविले तर त्याला बंदी घातली जाते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमचा मोर्चा बंदी घालून रोखला; पण हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्यांना आणि धार्मिक नक्षलवादी बनण्याचे आवाहन करणाऱ्यांना ते जाब विचारू शकत नाहीत. फडणवीस यांचे हे वागणे बरोबर नाही. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे डॉ. पाटणकर म्हणाले. विचारांची लढाई विचाराने व्हावी, अशी अपेक्षा असताना पाठीमागून येऊन गोळ्या झाडल्याने व्यक्तींचे विचार संपणार नाहीत, हे नथुरामवाद्यांनी लक्षात ठेवावे. जर युद्धच करायचे असेल तर समोर येऊन करा. आमचीही सांगून युद्ध करण्याची तयारी आहे. कष्टकरी, गरीब जनता त्यात कमी पडणार नाही; पण सरकारने ही वेळ जनतेवर आणू नये, असे आवाहन पाटणकर यांनी केले. जर सरकार दडपशाहीची भूमिका घेणार असेल तर आम्हाला नाठाळाच्या माथी काठी हाणण्याची तयारी ठेवावी लागेल, असा इशारा मोहन अनपट यांनी दिला. नथुरामाची पिलावळ तुमच्यात असेल, पण आमची औलाद ही समोर येऊन लढण्याची आहे, असे अनपट म्हणाले. पाठीमागून वार करणारी अवसानघातकी प्रवृत्ती आपलं डोकं वर काढत आहे; त्यामुळे आपला आवाज बुलंद करण्याची आवश्यकता असल्याचे जयंत निकम यांनी सांगितले. कष्टकऱ्यांची चळवळ कोणी मोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर देऊ, असे देसाई म्हणाले. डॉ. प्रशांत पन्हाळकर, दिगंबर सकट, कुंदा निळकंठ यांची भाषणे झाली. अनिल म्हमाणे यांनी स्वागत केले. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)आता उठवू सारे रानसभेला सुरुवात होण्यापूर्वी सभागृहात चळवळींवर आधारित गाणी म्हटली गेली. डॉ. भारत पाटणकर यांनीही स्वत: साने गुरुजींनी लिहिलेले एक गाणे म्हटले, त्यांच्या सुरात संपूर्ण सभागृहानेही सूर मिसळला. ‘आता उठवू सारे रान.. आता फु लवू सारे रान, कष्टकऱ्यांच्या राज्यासाठी.. कामकऱ्यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण..आता उठवू सारे रान’ या पाटणकरांनी गायलेल्या गाण्याने सभागृहातील उपस्थितांचा उत्साह वाढविला. ंमाझी छाती ६५ इंचांचीसामाजिक चळवळ लढताना कोणी गोळी झाडली तर ती झेलण्यास माझी तयारी आहे. तुमची छाती ५६ इंचांची असली तर माझी छाती ही ६५ इंचांची असून ती गरीब, श्रमिक, कष्टकऱ्यांनी निर्माण केलेली आहे. ती तुमच्या धमकीला घाबरणारी नाही, असे डॉ. पाटणकर म्हणाले.