शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्र्यांची हिंसेबाबत भूमिका काय?

By admin | Updated: March 25, 2015 00:41 IST

भारत पाटणकर : सामाजिक अन्याय प्रतिबंधक चळवळ, श्रमिक मुक्ती दलाची निर्धार सभा

कोल्हापूर : ‘राज्यात पुरोगामी नेत्यांचे एकापाठोपाठ खून होत आहेत, तसेच आणखी काही नेत्यांवर अशी वेळ येणार असल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसेबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी,’ असे आवाहन श्रमिक क्रांती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी मंगळवारी येथे बोलताना केले.‘सनातन प्रभात’सारख्या वृत्तपत्रातून विखारी लिखाण करून समाजात तेढ निर्माण केली जात असताना मुख्यमंत्री त्यांना का जाब विचारत नाहीत, असा संतप्त सवालही त्यांनी विचारला. येथील शाहू स्मारक भवनात सामाजिक अन्याय प्रतिबंधक चळवळ व श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आयोजित निर्धार सभेत डॉ. पाटणकर बोलत होते.राज्यातील नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या लोकांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांना मारले. आता आणखी काही कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊन मोर्चा काढायचे ठरविले तर त्याला बंदी घातली जाते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमचा मोर्चा बंदी घालून रोखला; पण हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्यांना आणि धार्मिक नक्षलवादी बनण्याचे आवाहन करणाऱ्यांना ते जाब विचारू शकत नाहीत. फडणवीस यांचे हे वागणे बरोबर नाही. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे डॉ. पाटणकर म्हणाले. विचारांची लढाई विचाराने व्हावी, अशी अपेक्षा असताना पाठीमागून येऊन गोळ्या झाडल्याने व्यक्तींचे विचार संपणार नाहीत, हे नथुरामवाद्यांनी लक्षात ठेवावे. जर युद्धच करायचे असेल तर समोर येऊन करा. आमचीही सांगून युद्ध करण्याची तयारी आहे. कष्टकरी, गरीब जनता त्यात कमी पडणार नाही; पण सरकारने ही वेळ जनतेवर आणू नये, असे आवाहन पाटणकर यांनी केले. जर सरकार दडपशाहीची भूमिका घेणार असेल तर आम्हाला नाठाळाच्या माथी काठी हाणण्याची तयारी ठेवावी लागेल, असा इशारा मोहन अनपट यांनी दिला. नथुरामाची पिलावळ तुमच्यात असेल, पण आमची औलाद ही समोर येऊन लढण्याची आहे, असे अनपट म्हणाले. पाठीमागून वार करणारी अवसानघातकी प्रवृत्ती आपलं डोकं वर काढत आहे; त्यामुळे आपला आवाज बुलंद करण्याची आवश्यकता असल्याचे जयंत निकम यांनी सांगितले. कष्टकऱ्यांची चळवळ कोणी मोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर देऊ, असे देसाई म्हणाले. डॉ. प्रशांत पन्हाळकर, दिगंबर सकट, कुंदा निळकंठ यांची भाषणे झाली. अनिल म्हमाणे यांनी स्वागत केले. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)आता उठवू सारे रानसभेला सुरुवात होण्यापूर्वी सभागृहात चळवळींवर आधारित गाणी म्हटली गेली. डॉ. भारत पाटणकर यांनीही स्वत: साने गुरुजींनी लिहिलेले एक गाणे म्हटले, त्यांच्या सुरात संपूर्ण सभागृहानेही सूर मिसळला. ‘आता उठवू सारे रान.. आता फु लवू सारे रान, कष्टकऱ्यांच्या राज्यासाठी.. कामकऱ्यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण..आता उठवू सारे रान’ या पाटणकरांनी गायलेल्या गाण्याने सभागृहातील उपस्थितांचा उत्साह वाढविला. ंमाझी छाती ६५ इंचांचीसामाजिक चळवळ लढताना कोणी गोळी झाडली तर ती झेलण्यास माझी तयारी आहे. तुमची छाती ५६ इंचांची असली तर माझी छाती ही ६५ इंचांची असून ती गरीब, श्रमिक, कष्टकऱ्यांनी निर्माण केलेली आहे. ती तुमच्या धमकीला घाबरणारी नाही, असे डॉ. पाटणकर म्हणाले.