शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

मुख्यमंत्र्यांची हिंसेबाबत भूमिका काय?

By admin | Updated: March 25, 2015 00:41 IST

भारत पाटणकर : सामाजिक अन्याय प्रतिबंधक चळवळ, श्रमिक मुक्ती दलाची निर्धार सभा

कोल्हापूर : ‘राज्यात पुरोगामी नेत्यांचे एकापाठोपाठ खून होत आहेत, तसेच आणखी काही नेत्यांवर अशी वेळ येणार असल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसेबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी,’ असे आवाहन श्रमिक क्रांती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी मंगळवारी येथे बोलताना केले.‘सनातन प्रभात’सारख्या वृत्तपत्रातून विखारी लिखाण करून समाजात तेढ निर्माण केली जात असताना मुख्यमंत्री त्यांना का जाब विचारत नाहीत, असा संतप्त सवालही त्यांनी विचारला. येथील शाहू स्मारक भवनात सामाजिक अन्याय प्रतिबंधक चळवळ व श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आयोजित निर्धार सभेत डॉ. पाटणकर बोलत होते.राज्यातील नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या लोकांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांना मारले. आता आणखी काही कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊन मोर्चा काढायचे ठरविले तर त्याला बंदी घातली जाते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमचा मोर्चा बंदी घालून रोखला; पण हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्यांना आणि धार्मिक नक्षलवादी बनण्याचे आवाहन करणाऱ्यांना ते जाब विचारू शकत नाहीत. फडणवीस यांचे हे वागणे बरोबर नाही. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे डॉ. पाटणकर म्हणाले. विचारांची लढाई विचाराने व्हावी, अशी अपेक्षा असताना पाठीमागून येऊन गोळ्या झाडल्याने व्यक्तींचे विचार संपणार नाहीत, हे नथुरामवाद्यांनी लक्षात ठेवावे. जर युद्धच करायचे असेल तर समोर येऊन करा. आमचीही सांगून युद्ध करण्याची तयारी आहे. कष्टकरी, गरीब जनता त्यात कमी पडणार नाही; पण सरकारने ही वेळ जनतेवर आणू नये, असे आवाहन पाटणकर यांनी केले. जर सरकार दडपशाहीची भूमिका घेणार असेल तर आम्हाला नाठाळाच्या माथी काठी हाणण्याची तयारी ठेवावी लागेल, असा इशारा मोहन अनपट यांनी दिला. नथुरामाची पिलावळ तुमच्यात असेल, पण आमची औलाद ही समोर येऊन लढण्याची आहे, असे अनपट म्हणाले. पाठीमागून वार करणारी अवसानघातकी प्रवृत्ती आपलं डोकं वर काढत आहे; त्यामुळे आपला आवाज बुलंद करण्याची आवश्यकता असल्याचे जयंत निकम यांनी सांगितले. कष्टकऱ्यांची चळवळ कोणी मोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर देऊ, असे देसाई म्हणाले. डॉ. प्रशांत पन्हाळकर, दिगंबर सकट, कुंदा निळकंठ यांची भाषणे झाली. अनिल म्हमाणे यांनी स्वागत केले. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)आता उठवू सारे रानसभेला सुरुवात होण्यापूर्वी सभागृहात चळवळींवर आधारित गाणी म्हटली गेली. डॉ. भारत पाटणकर यांनीही स्वत: साने गुरुजींनी लिहिलेले एक गाणे म्हटले, त्यांच्या सुरात संपूर्ण सभागृहानेही सूर मिसळला. ‘आता उठवू सारे रान.. आता फु लवू सारे रान, कष्टकऱ्यांच्या राज्यासाठी.. कामकऱ्यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण..आता उठवू सारे रान’ या पाटणकरांनी गायलेल्या गाण्याने सभागृहातील उपस्थितांचा उत्साह वाढविला. ंमाझी छाती ६५ इंचांचीसामाजिक चळवळ लढताना कोणी गोळी झाडली तर ती झेलण्यास माझी तयारी आहे. तुमची छाती ५६ इंचांची असली तर माझी छाती ही ६५ इंचांची असून ती गरीब, श्रमिक, कष्टकऱ्यांनी निर्माण केलेली आहे. ती तुमच्या धमकीला घाबरणारी नाही, असे डॉ. पाटणकर म्हणाले.